Mazi Ladki Bahin : लाडक्या बहिणींसाठी आनंदवार्ता! ३१ नव्हे आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई : महाराष्ट्रात १ जुलै २०२४ पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना (Mukhyamantri Mazi Ladki Bahin Yojana) सुरु करण्यात आली. या योजनेला महिलांचा प्रचंड प्रतिसाद मिळत असून अजूनही अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. अशातच काल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळण्यास प्रारंभ झाला आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांच्या बँक खात्यात ३ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली. दरम्यान, या योजनेसंदर्भात एक महत्वाची माहिती समोर आली आहे. महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याची मुदत सरकारने दिली होती. मात्र आता ती मुदत आणखी वाढवण्यात येणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात आतापर्यंत १ कोटी ६४ लाख ४० हजारपेक्षा अधिक महिलांची नोंदणी पूर्ण झाली आहे. यातील जवळपास १ कोटी ३६ लाख पात्र महिला आहेत. तर अजूनही नोंदणी आणि पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. परंतु अद्याप ज्या महिलांच्या अर्जामध्ये त्रुटी होत्या किंवा ज्या महिलांना अर्ज करता आले नाही, त्यांच्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता या योजनेसाठी महिलांना सप्टेंबर महिन्यापर्यंत अर्ज करण्यात येणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितले. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व गरजू महिलांना मिळावा, हाच यामागे सरकारचा हेतू आहे,असेही एकनाथ शिंदे यांनी म्हटले.



अर्ज कसा करावा?


माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सरकारने आता https://ladakibahin.maharashtra.gov.in/ ही नवीन वेबसाइट सुरू केली आहे. नवीन वेबसाईटमुळे महिलांना गाव, वॉर्ड आणी तालुक्याची निवड करणे आता सोपे होणार आहे.

Comments
Add Comment

NEET Paper Leak Case : पुण्यात ‘मोटेगावकर’ RCC क्लासवर महापालिकेची मोठी कारवाई; ३.२० कोटींचा कर थकीत, क्लास सील

पुणे : नीट पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरात चर्चेत आलेले प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या पुण्यातील प्रसिद्ध

Online Fraud : शेअर मार्केटमध्ये ‘डबल रिटर्न’चं आमिष; अलिबागमधील व्यक्तीची तब्बल ६६ लाखांची ऑनलाइन फसवणूक

रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये सायबर फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीवर मोठा

अनुदानित खतांसोबत विना अनुदानित खतांची सक्तीची विक्री बंद

कृषी विभागाचा निर्णय; नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार मुंबई : "राज्यात काही खत उत्पादक आणि पुरवठादार

भूमी अभिलेख विभागाचा; राज्यात ५० नवी कार्यालये सुरु होणार; १० हजार पदांच्या आकृतीबंधालाही मूर्तरूप

मुंबई : प्रशासकीय कामकाज लोकाभिमुख आणि वेगवान करण्यासाठी, भूमी अभिलेख विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार

Maharashtra Heat Wave : महाराष्ट्रात उष्णतेचा कहर! IMD चा हाय अलर्ट; ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, नागरिकांना इशारा

महाराष्ट्रात पुन्हा एकदा उष्णतेची तीव्र लाट उसळली असून राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमानाने अक्षरशः

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “घाबरून खरेदी करू नका, राज्यात...

मुंबई : राज्यात पेट्रोल-डिझेल तुटवड्याच्या अफवा पसरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी