IndiGo Airline: इंडिगो महिलांना देणार नवे पंख, एअरलाईनमध्ये १०००हून अधिक होणार पायलट

मुंबई: इंडिगो एअरलाईनने आपल्या कामाच्या ठिकाणी महिलांना अधिकाधिक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. इंडिगोने एका वर्षाच्या आत महिला पायलटची संख्या १०००हून अधिक करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, एअरलाईनमध्ये ८००हून अधिक महिला पायलट आहेत. इंडिगोचे काही पायल संख्येमध्ये महिलांचा आकडा साधारण १४ टक्के आहे. हे प्रमाण जागतिक सरासरीने ७ ते ९ टक्क्यांपेक्षा अधिक आहे. कंपनीला ही संख्या अधिक वाढवायची आहे.



पुढील वर्षापर्यंत गाठायचेय ध्येय


देशातील सर्वात मोठी एअरलाईन इंडिगोचे चीफ ह्यूमन रिसोर्स मॅनेजर सुखजीत एस पसरीचाने गुरूवारी सांगितले की महिलांना ते सातत्याने संधी देत आहेत. आत आमचे लक्ष्य पायलटची संख्या १०००च्या वर जाणे आहे. हा आकडा आम्ही पुढील वर्षापर्यंत गाठायचा आहे. यामुळे आमच्या वर्कफोर्समध्ये विविधता आणि अधिक वाढेल. एअरलाईन आपल्या फ्लीट आणि नेटवर्कमध्ये विस्तार करत आहे.



इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफमध्ये मिळणार संधी


सुखजीत एस पसरीचाने सांगितले की इंडिगो इंजीनियरिंग आणि फ्लाईंग स्टाफमध्ये मोठे बदल करत आहेत. आम्ही प्रत्येक ठिकाणी महिलांना संधी देत आहोत. आमच्या इंजीनियरिंग टीममध्येही महिलांची संख्या साधारण ३० टक्के वाढली आहे. एअरलाईनकडे देशातील सर्वाधिक ८०० महिला पायलट आहे.



स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण झाल्यावर ७७ महिला पायलटना दिली नोकरी


इंडिगोने बुधवारी ७७ महिला पायलटना नोकरी दिली आहे. या महिला कंपनीच्या एअरबस आणि एटीआर विमाने उडवतील. स्वातंत्र्याला ७७ वर्षे पूर्ण होण्यानिमित्त महिला पायलटना नोकरी देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

मध्य रेल्वेद्वारे दिवाळी आणि छठ उत्सवानिमित्त विशेष सेवा

मुंबई (प्रतिनिधी): मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विजय कुमार यांनी सांगितले की, मध्य रेल्वेद्वारे २८ ऑक्टोबर २०२५

आजपासून मुंबईत 'इंडिया मेरीटाईम सप्ताह', केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई (प्रतिनिधी) : शंभराहून अधिक देशातील एक लाखापेक्षा अधिक प्रतिनिधी, ५०० प्रदर्शक, २०० पेक्षा अधिक तज्ज्ञ

दिवाळीनंतर मुंबई–पुणे–कोल्हापूर मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा !

मुंबई : दिवाळी सुट्टीनंतर परतीचा प्रवास आता मुंबई, पुणे आणि कोल्हापूरकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठी

सलमान खानच्या रियाधमधील भाषणावर वाद: पाकिस्तानच्या दहशतवादी यादीत नाव असल्याचे दावे खोटे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या अलीकडील एका आंतरराष्ट्रीय कार्यक्रमातील विधानामुळे सोशल मीडियावर वाद

समुद्रात जाणे टाळा ! हवामान विभागाचा मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा

मुंबई : राज्यातील सागरकिनाऱ्यावरील सर्व मच्छीमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा: मुंबई आणि कोकणात जोरदार पावसाचा इशारा

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार,