मुंबईत पुन्हा हिट अँड रन, वर्सोवा बीचवर झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले

दोन आरोपी अटकेत


मुंबई : मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपेत असताना एका वेगवान एसयूव्हीने दोघांना चिरडले. यामध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वर्सोवा पोलिसांनी नागपूरहून आलेला कोरिओग्राफर आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव हे दोघे मित्र वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपले होते. तेव्हा हा अपघात घडला. ही घटना १२ ऑगस्टच्या पहाटे घडली.


बबलू श्रीवास्तवच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार दणका बसल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा त्याने पाहिले की, शेजारी झोपलेल्या गणेशला चिरडून कार त्याच्या अंगावरून पुढे गेली, असे बबलूने पोलिसांना सांगितले.


या घटनेत बबलूच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून तो त्यानंतर बेशुद्ध पडला होता.


अपघात घडल्यानंतर कारमधील दोघेजण खाली उतरले. परंतु, यादव गंभीर जखमी झाल्याचे व प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आणि घटनास्थळी लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलीस म्हणाले.


कोरिओग्राफर असलेला निखिल जावडे, हा अपघात घडला त्यावेळी कार चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मित्र शुभम डोंगरे हा देखिल होता. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.


गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले.


सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-३२-एफई-३०३३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश आणि त्याचा मित्र बबलू या दोघांना चिरडले. यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार बबलू जखमी झाला.

Comments
Add Comment

'या' तारखेला दिसणार महराष्ट्रात खग्रास आणि खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार

मुंबई : यावर्षी जगात २ सूर्यग्रहण आणि २ चंद्रग्रहण दिसत असली, तरी भारतातून ३ मार्च २०२६ रोजी दिसणारे केवळ एकच

उच्च व तंत्रशिक्षण मध्ये पदभरती प्रक्रियेत बदल करण्याच्या सूचनेचा विचार करू – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई : शालेय शिक्षण विभागातील शिक्षकांप्रमाणेच उच्च व तंत्रशिक्षणमध्ये पदभरती प्रक्रिया राबविण्याबाबत शासन

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि

कोल्हापूर–रत्नागिरी जोडणाऱ्या घाटमार्गांच्या कामांना गती द्या; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे निर्देश

मुंबई : कोल्हापूर आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या प्रमुख तीन घाटमार्गांच्याम कामांना गती देण्याचे

माहिती तंत्रज्ञान प्रकल्पांसाठी उच्चाधिकार समितीचे पुनर्गठन; पाच ते १०० कोटींपर्यंत खर्चास मान्यता

मुंबई : राज्यातील माहिती तंत्रज्ञानविषयक धोरण व प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी

मुंबई–पुण्यात बॉम्बस्फोटाच्या धमक्या; पासपोर्ट कार्यालय व दहिसरमधील शाळा अलर्टवर

मुंबई : राज्यातील दोन महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या धमकीचे ई-मेल प्राप्त मिळाल्याने सुरक्षा