मुंबईत पुन्हा हिट अँड रन, वर्सोवा बीचवर झोपलेल्या व्यक्तीला कारने चिरडले

दोन आरोपी अटकेत


मुंबई : मुंबईच्या वर्सोवा बीचवर झोपेत असताना एका वेगवान एसयूव्हीने दोघांना चिरडले. यामध्ये एका ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेनंतर वर्सोवा पोलिसांनी नागपूरहून आलेला कोरिओग्राफर आणि इव्हेंट ऑर्गनायझरला अटक केली आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक गणेश यादव आणि बबलू श्रीवास्तव हे दोघे मित्र वर्सोवा समुद्रकिनाऱ्यावर झोपले होते. तेव्हा हा अपघात घडला. ही घटना १२ ऑगस्टच्या पहाटे घडली.


बबलू श्रीवास्तवच्या डोक्यावर आणि हातावर जोरदार दणका बसल्यानंतर त्याला जाग आली. तेव्हा त्याने पाहिले की, शेजारी झोपलेल्या गणेशला चिरडून कार त्याच्या अंगावरून पुढे गेली, असे बबलूने पोलिसांना सांगितले.


या घटनेत बबलूच्या डोक्याला आणि चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली असून तो त्यानंतर बेशुद्ध पडला होता.


अपघात घडल्यानंतर कारमधील दोघेजण खाली उतरले. परंतु, यादव गंभीर जखमी झाल्याचे व प्रतिसाद देत नसल्याचे पाहून आणि घटनास्थळी लोक जमा होऊ लागल्याने त्यांनी त्यांच्या कारमधून घटनास्थळावरून पळ काढला, असे पोलीस म्हणाले.


कोरिओग्राफर असलेला निखिल जावडे, हा अपघात घडला त्यावेळी कार चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत कारमध्ये त्याचा मित्र शुभम डोंगरे हा देखिल होता. दरम्यान पोलिसांनी या दोघांवरही गुन्हा दाखल केला आहे.


गणेश यादव हा वर्सोवा येथील सागर कुटीर येथे राहत होता. रविवारी रात्री खूप उकाडा जाणवत असल्याने गणेश आणि त्याचा मित्र बबलू श्रीवास्तव वर्सोवा बीचवर झोपायला गेले.


सोमवारी पहाटे पाचच्या सुमारास एमएच-३२-एफई-३०३३ क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या एसयूव्हीने समुद्रकिनाऱ्यावर झोपलेल्या गणेश आणि त्याचा मित्र बबलू या दोघांना चिरडले. यात गणेशचा मृत्यू झाला, तर त्याचा साथीदार बबलू जखमी झाला.

Comments
Add Comment

वांद्रे–वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडवर हेलिपॅड उभारा

मंत्री आशिष शेलार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई : पुणे–मुंबई द्रुतगती मार्गावर दोन दिवसांपूर्वी गॅस

डोंगरी, मांडवी,मोहम्मद अली रोड परिसरात महापालिकेच्या या अधिकाऱ्याची घुसून कारवाई... महापालिकेच्या नवख्या सहाय्यक आयुक्ताने मुंबईकरांची तोंडे केली गप .

मुंबई : मुंबई महापालिका आयुक्तांच्या निर्देशानुसार मुंबईतील काही विभागांमध्ये महापालिकेच्या वतीने अनधिकृत

दोन प्रवाशांच्या भांडणात तरुणाने कायमचा गमावला डोळा; जाणून घ्या नेमकं प्रकरण

मुंबई : मुंबईची लोकल ही मुंबईची लाईफलाईन आहे. मुंबईची शान आहे, पण याच रेल्वेवर हल्ली प्रवाशांचा ताण वाढत चालला आहे.

Pariksha Pe Charcha 2026: 'परीक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सांगलीच्या मातीचा, महाराष्ट्राच्या लेकराचा गौरव; मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजेच शुक्रवार ६ फेब्रुवारी रोजी 'परीक्षा पे चर्चा' च्या निमित्ताने

हार्बर मार्गावरील वातानुकूलित लोकलमुळे वाहतूक विस्कळीत

मुंबई : हार्बर मार्गावर वातानुकूलित लोकल सेवा सुरू झाल्यानंतर, प्रवाशांना दररोज लोकलच्या विस्कळीत झालेल्या

महापौर, उपमहापौरपदासाठी काँग्रेसकडूनही उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु

मुंबई : मुंबईच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी येत्या ११ फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून यासाठी शनिवारी ०७