एक रूपयात एक दिवसाची व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा, BSNLने लाँच केला जबरदस्त प्लान

  208

मुंबई: खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान महाग झाल्यानंतर आता BSNL बाजारात पुनरागमन करत आहे. BSNL सातत्याने स्वस्त प्लान लाँच करत आहे. एक महिन्याच्या आत कोट्यावधी लोकांनी BSNLमध्ये आपला नंबर पोर्ट केला आहे. BSNLचे प्लान खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. दरम्यान, ४जी लाँच केल्यानंतर बीएसएनएलचे कव्हरेजही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत चांगले होण्याची आशा आहे.


यातच बीएसएनएलने असा प्लान लाँच केला आहे की यात एक रूपयाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानसोबत डेटाही मिळतो. जाणून घेऊया या प्लानबद्दल...



BSNLने सादर केला ९१ रूपयांचा प्लान


BSNLचा १०० रूपयांच्या आतील प्लान जबरदस्त आहे. यातच कंपनीने ९१ रूपयांचा आणखी एक प्लान सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. खास बाब म्हणजे केवळ १ रूपयांत एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलचा हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे. या प्लानअंतर्गत १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते. सोबतच ११ पैसे दराने १ एमबी डेटा मिळेल.



१०७ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार हे फायदे


बीएसएनएलकडे १०७ रूपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग नाही तर सर्व नेटवर्कवर २०० मिनिटचे कॉलिंगचे फायदे मिळतात. सोबतच या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

जेजे रुग्णालयाच्या पीआयसीयूमध्ये ३ मुलांचा मृत्यू: डॉक्टर आणि विभाग प्रमुखांमध्ये वाद?

मुंबई : जेजे रुग्णालयातील बालरोग अतिदक्षता विभाग गेल्या २४ तासांत तीन मुलांच्या मृत्यूमुळे तीव्र तपासणीच्या

आरपीएफची मोठी कारवाई: दिव्यांगांच्या डब्यात घुसणाऱ्यांना दणका!

ठाणे : दिव्यांगांसाठी आरक्षित असलेल्या लोकल ट्रेनच्या डब्यात बेकायदेशीरपणे प्रवास करणाऱ्या निरोगी व्यक्तींवर

शर्ट फोटो कोड वापरून ड्रग्जची तस्करी: ४३४ कोटींच्या रॅकेटचा पर्दाफाश!

मुंबई : मुंबईतील साकीनाका पोलिसांनी एका ड्रग्ज टोळीने मेफेड्रोन (एमडी) नावाचे ड्रग म्हैसूरमधील उत्पादन

Vastu Tips: 'या' गोष्टी टाळा, नाहीतर लक्ष्मीमाता होईल नाराज, घरात येईल गरिबी!

मुंबई: प्रत्येक व्यक्तीला आपल्या घरात धन, सुख आणि समृद्धी हवी असते. वास्तूशास्त्रानुसार, काही अशा सवयी आहेत,

सात वर्षांपूर्वी बांधलेला २७ कोटींचा उड्डाणपूल तोडणार? कारण काय?

मुंबई : मुंबई महानगरपालिका (BMC) गोरेगावमधील वीर सावरकर उड्डाणपूल, जो फक्त सात वर्षांपूर्वी बांधला होता, तो

बीएमसीचा 'मराठी' फलकांसाठी धडाका: दुकानदारांना मोठा दणका!

मुंबई : मुंबईत मराठी भाषेचा मुद्दा सध्या चांगलाच गाजत आहे आणि बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) दुकाने आणि आस्थापनांना