एक रूपयात एक दिवसाची व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा, BSNLने लाँच केला जबरदस्त प्लान

मुंबई: खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान महाग झाल्यानंतर आता BSNL बाजारात पुनरागमन करत आहे. BSNL सातत्याने स्वस्त प्लान लाँच करत आहे. एक महिन्याच्या आत कोट्यावधी लोकांनी BSNLमध्ये आपला नंबर पोर्ट केला आहे. BSNLचे प्लान खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. दरम्यान, ४जी लाँच केल्यानंतर बीएसएनएलचे कव्हरेजही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत चांगले होण्याची आशा आहे.


यातच बीएसएनएलने असा प्लान लाँच केला आहे की यात एक रूपयाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानसोबत डेटाही मिळतो. जाणून घेऊया या प्लानबद्दल...



BSNLने सादर केला ९१ रूपयांचा प्लान


BSNLचा १०० रूपयांच्या आतील प्लान जबरदस्त आहे. यातच कंपनीने ९१ रूपयांचा आणखी एक प्लान सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. खास बाब म्हणजे केवळ १ रूपयांत एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलचा हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे. या प्लानअंतर्गत १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते. सोबतच ११ पैसे दराने १ एमबी डेटा मिळेल.



१०७ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार हे फायदे


बीएसएनएलकडे १०७ रूपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग नाही तर सर्व नेटवर्कवर २०० मिनिटचे कॉलिंगचे फायदे मिळतात. सोबतच या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात ३१ ऑक्टोबरपर्यंत भव्य ग्रंथ प्रदर्शन

मुंबई : अभिजात मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने व मॅजेस्टिक ग्रंथ दालनाच्या

महापालिका आयुक्तांनी घेतला मुंबईतील दोन प्रमुख रस्ते प्रकल्प कामांचा आढावा, दिले असे निर्देश

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई किनारी रस्ता (उत्तर) अंतर्गत वेसावे ते भाईंदर प्रकल्पाचे काम सुरू करण्यासाठी आवश्यक

मुंबई २०३० पर्यंत रेबीजमुक्त करणार, महापालिकेचा निर्धार

मुंबई खास प्रतिनिधी : मुंबई महानगरपालिकेतील आरोग्य संस्थांमधील रेबीज प्रतिबंधक लसीकरण केंद्रे, लसीकरण आणि

थरारक! मेट्रो स्टेशनखालील खड्ड्यात अडकला तरूणाचा पाय, मोठ्या प्रयत्नाने केली सुटका

मुंबई: मुंबईत शुक्रवारी रात्री थरारक सुटकेची घटना घडली. जोगेश्वरी मेट्रो स्टेशनखाली असलेल्या खड्ड्यात तरूणाचा

गिरगावात आगीच्या दुर्घटनेत फूड स्टॉल जळून खाक

मुंबई: दक्षिण मुंबईतील गिरगाव येथे एका फूड स्टॉलला मोठी आग लागल्याची घटना घडली. या आगीच्या दुर्घटनेत हा फूड स्टॉल

भूखंड पालिकेचा की, खासगी विकासकांचा ?

पालिकेच्या नावाचे फलक बसवण्याची मागणी मुंबई (प्रतिनिधी) : उपनगरात बहुतांश ठिकाणी मनपा प्रशासनाचे मोकळे भूखंड,