एक रूपयात एक दिवसाची व्हॅलिडिटी आणि भरपूर डेटा, BSNLने लाँच केला जबरदस्त प्लान

मुंबई: खाजगी कंपन्यांचे रिचार्ज प्लान महाग झाल्यानंतर आता BSNL बाजारात पुनरागमन करत आहे. BSNL सातत्याने स्वस्त प्लान लाँच करत आहे. एक महिन्याच्या आत कोट्यावधी लोकांनी BSNLमध्ये आपला नंबर पोर्ट केला आहे. BSNLचे प्लान खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त आहेत. दरम्यान, ४जी लाँच केल्यानंतर बीएसएनएलचे कव्हरेजही इतर टेलिकॉम कंपन्यांच्या तुलनेत चांगले होण्याची आशा आहे.


यातच बीएसएनएलने असा प्लान लाँच केला आहे की यात एक रूपयाला एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळत आहे. या प्लानसोबत डेटाही मिळतो. जाणून घेऊया या प्लानबद्दल...



BSNLने सादर केला ९१ रूपयांचा प्लान


BSNLचा १०० रूपयांच्या आतील प्लान जबरदस्त आहे. यातच कंपनीने ९१ रूपयांचा आणखी एक प्लान सादर केला आहे. याची व्हॅलिडिटी ९० दिवसांची आहे. खास बाब म्हणजे केवळ १ रूपयांत एक दिवसाची व्हॅलिडिटी मिळते. बीएसएनएलचा हा प्लान त्या लोकांसाठी फायदेशीर आहे ज्यांना आपला नंबर सुरू ठेवायचा आहे. या प्लानअंतर्गत १५ पैसे प्रति मिनिट दराने कॉलिंग करता येते. सोबतच ११ पैसे दराने १ एमबी डेटा मिळेल.



१०७ रूपयांच्या प्लानमध्ये मिळणार हे फायदे


बीएसएनएलकडे १०७ रूपयांचा प्लान आहे. यात ग्राहकांना ३५ दिवसांची व्हॅलिडिटी मिळते. या प्लानअंतर्गत ग्राहकांना अनलिमिटेड कॉलिंग नाही तर सर्व नेटवर्कवर २०० मिनिटचे कॉलिंगचे फायदे मिळतात. सोबतच या प्लानमध्ये ३५ दिवसांसाठी ३ जीबी डेटा मिळतो.

Comments
Add Comment

महाविद्यालयीन शुल्कातील गैरप्रकारांची निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधानसभेत घोषणा; दोषींवर गुन्हे दाखल करण्याचे संकेत मुंबई :

'गॅस तुटवड्याविषयी सरकारने उपाययोजना कराव्यात'

मुंबई : आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशासह राज्यात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याचे पडसाद बुधवारी

नागरिकांना विनासायास डिजिटल सेवा मिळण्यासाठी व्यापक धोरण तयार करा; माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासकीय ई-सेवा आणि आधार संबंधित सेवा कोणत्याही अडथळ्याविना मिळाव्यात,

माजी सैनिक आणि भूमिहीनांच्या जमिनी वर्ग १ होणार, महसूलमंत्री बावनकुळेंची घोषणा

मुंबई : राज्यातील माजी सैनिक, भूमिहीन शेतकरी आणि शेतमजुरांना महाराष्ट्र शेत जमीन (सीलिंग) अधिनियमांतर्गत वाटप

प्रवासी आरक्षण सेवा इतके तास बंद राहणार

मुंबई : मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) दिनांक १२.०३.२०२६ रोजी २३.४५ वाजल्यापासून दिनांक १३.०३.२०२६ रोजी

एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! महामंडळात १७,७४२ पदांची होणार जंगी भरती

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा (एसटी)