Nagpur MNS : नागपुरात टोलनाक्यावरुन मनसेचा पुन्हा एकदा राडा!

नेमकं काय घडलं?


नागपूर : राज ठाकरे यांच्या मनसेने काही महिन्यांपूर्वी टोलचा मुद्दा उचलून धरला होता. याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटही घेतली होती. टोल कमी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर हा मुद्दा शांत झाला होता. मात्र आता पुन्हा एकदा मनसैनिकांनी टोलनाक्यावरुन नागपुरात राडा केला आहे. शहराच्या तीस किलोमीटरच्या परिसरात टोलनाका नको असा नियम असताना वाहनधारकांकडून टोल आकारला जात असल्याचा आरोप करत मनसेने हे आंदोलन केले.


याबाबत अधिक माहिती अशी की, नागपूरजवळच्या वाडी शहराच्या अवतीभवती राज्य महामार्गावर १० किलोमीटरच्या अंतरामध्येच तीन टोलनाके आहेत. या तीनही टोलनाक्यांवर खासगी वाहनांकडून टोल वसूल केला जात नाही. मात्र, मालवाहतूक करणार्‍या वाहनांकडून टोल वसूल केला जातो. त्यामुळे अगदी जवळ जवळ असलेल्या टोलनाक्यांमुळे माल वाहतूकदार त्रस्त झाले होते. माल वाहतूकदारांच्या या तक्रारीनंतर मनसेने आज येथील टोलनाक्यावर जाऊन खळ खट्याक स्टाईलने आंदोलन केले. टोलनाक्याची तोडफोड करण्यात आली. यावेळी पोलिसांनी ५ मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.


गेल्या काही दिवसांपासून मनसे पुन्हा एकदा अॅक्शन मोडमध्ये आली आहे. त्यामुळे, लोकसभेवेळी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारी मनसे विधानसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा मूळ अवतारात आल्याचं पाहायला मिळत आहे. अकोला येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या गाडीवर दगडफेक करत काचा फोडल्या होत्या. त्यानंतर, ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावेळी त्यांच्या कारवर नारळ आणि शेण फेकल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या प्रत्त्युत्तराची पाठराखण करत, जसाश तसे उत्तर दिलं जाईल, असं म्हटलं आहे.

Comments
Add Comment

रब्बी हंगामातील 'ई-पीक पाहणी'ला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

- ४५ टक्के शेतकरी अजूनही प्रक्रियेबाहेर; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा मुंबई : राज्यातील रब्बी

ग्रामीण भागातील घरबांधणी आता होणार सुलभ; बांधकाम परवानगीचे अधिकार तालुका स्तरावर देण्याचे संकेत!

- मंत्री उदय सामंत यांचे विधानपरिषदेत आश्वासन मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या घराच्या

Jalna: गॅस एजन्सीचे गोडाऊन फोडले अन् ११० सिलिंडर चोरले, जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

जालना: जालना तालुक्यातील रामनगर परिसरात गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये चक्क गॅस सिलिंडरची मोठी चोरी झाल्याचा

Weather Update: महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना अलर्ट, ताशी ३० ते ५० किमी वेगाने वारे वाहणार

मुंबई: महाराष्ट्रावर ऐन उन्हाळ्यात अस्मानी संकट घोंघावत आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला उष्णतेच्या लाटेने

लालपरीचा कायापालट, २२ हजार बसेस पूर्णपणे बदलणार; मंत्री सरनाईकांची माहिती

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची लाईफलाईन मानली जाणारी लालपरी आता मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत आहे. राज्य

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, गॅस बुकींगनंतर ९६ तासांत सिलेंडर घरपोच होणार; जिल्हाधिकाऱ्यांचे एजन्सींना आदेश

पुणे: मराठी नववर्षारंभ म्हणजेच गुढी पाडव्याचा सण अवघ्या दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपला असताना गॅस टंचाईमुळे