CM Eknath Shinde : शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळतेच, पण याचं कुठलंही समर्थन करणार नाही!

ठाकरेंच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिक्रिया


ठाणे : ठाण्यात (Thane) गडकरी रंगायतन या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा (Thackeray Group) मेळावा पार पडला. यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रमस्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. मनसे व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. तसेच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण, नारळ व बांगड्या फेकल्या. त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील कारच्या काचाही फोडल्या. यामुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.


एकनाथ शिंदे म्हणाले, "राज ठाकरेंच्या मराठवाडा दौऱ्यात ठाकरे गटाने याची सुरूवात केली. ही महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा नाही. दगडफेक करणं, सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलं नाही. शेवटी 'अ‍ॅक्शनला-रिअ‍ॅक्शन' मिळते. पण, याचं कुठलंही समर्थन करणार नाही", असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.


"आम्ही सत्तेत आल्यापासून हे 'सरकार घटनाबाह्य आहे, एक महिन्यात पडणार' असं बोललं जातं. दोन वर्षे झाली, सरकार अधिकाधिक मजबूत होत गेले. कारण, आम्ही बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार सोडले नाहीत. त्यामुळे लोक आमच्यासोबत येत आहेत. ज्यांनी विचार सोडले, त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. म्हणून आपले ध्येय, विचार ठरवले पाहिजे. सत्तेसाठी कुठलीही तडतोड आम्ही केली नाही," असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.


"धनुष्यबाण वाचविण्यासाठी आम्ही बंड करण्याचा निर्णय घेतला. आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना पक्ष भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकावर होता. लोकसभेला 'स्ट्राइक रेट' पाहिला, तर लोकांनी पसंती आणि मान्यता कुणाला दिली, हे सांगण्याची आवश्यकता नाही," अशी कोपरखळी मुख्यमंत्री शिंदे यांनी ठाकरे गटाला मारली आहे.

Comments
Add Comment

Ahilyanagar : जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीला उच्च न्यायालयात आव्हान ; निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह, राजकीय वातावरण तापले

अहिल्यानगर (राहुरी प्रतिनिधी) : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (Ahilyanagar District Central Cooperative Bank) होवू घातलेल्या

Ahilyanagar : श्रीरामपूरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेची सलग दुसऱ्या दिवशी मोठी कारवाई; एमडी तस्कर जेरबंद, अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

अहिल्यानगर (श्रीरामपूर) : श्रीरामपूर शहरात अंमली पदार्थांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने सलग दुसऱ्या दिवशी मोठी

Ketan Agrawal Murder Case : 'मला त्याला स्लो पॉयझन देऊन मारायचं होतं..';केतन हत्याकांड प्रकरणातील 'त्या' गुप्त कटामागचा मास्टरमाइंड कोण?

केतन अग्रवाल हत्याकांडात धक्कादायक दावा; 'स्लो पॉयझन' देण्याचाही कट असल्याची तपासात चर्चा पुणे : केतन

Minister Radhakrishna Vikhe Patil : मतदार यादीत घुसखोरांना जागा नाही ; पुनरिक्षण मोहिमेत कार्यकर्त्यांनी पुढे या : ना. राधाकृष्ण विखे पाटील

Ahilyanagar (Shevgaon) : मतदार यादीची सखोल पुनरिक्षण मोहीम भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण आहे.सरकारी स्तरावर काम सुरू असले

Wardha Murder : वर्ध्यात काळजाचा थरकाप उडवणारी घटना! 12 वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून निर्घृण हत्या; नराधमांनी ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा

वर्धा : वर्धा  (wardha) जिल्ह्यातील रोठा गावातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली

Pune Metro : पुणेकरांसाठी गुड न्यूज! हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रोला नवा मुहूर्त; वाहतूक कोंडीतून लवकरच सुटका!

पुणे : पुण्यातील ट्रॅफिक जॅम, विशेषतः हिंजवडी आयटी पार्क परिसरात होणाऱ्या रोजच्या वाहतूक कोंडीने त्रस्त