Vijay Kadam : ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांचे निधन!

मराठी कलाविश्वावर पसरली शोककळा


मुंबई : मराठी चित्रपट असो वा मालिका वा नाटक, प्रत्येक गोष्टीतून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे दिग्गज अभिनेते विजय कदम (Vijay Kadam) यांचं आज १० ऑगस्ट रोजी निधन झालं आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनविश्वातील सगळ्यांनाच मोठा धक्का बसला आहे. विजय हे गेले दीड वर्ष कर्करोगाने त्रस्त होते. त्यांच्यावर उपचार सुरू होते परंतु आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी सिनेसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार गमावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


विजय कदम यांच्या चार केमिओथेरपी व दोन सर्जरी झाल्यानंतर त्यांनी नुकतीच कर्करोगाशी यशस्वी झुंज दिली होती. मात्र, आज सकाळी त्यांचं निधन झालं. विजय कदम यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन वाजता अंधेरी ओशिवरा येथील स्मशानभूमीत दुपारी २ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.


विजय दत्ताराम कदम यांनी १९८० च्या दशकात लहानसहान विनोदी भूमिका साकारून त्यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली. लहानपणी 'राजा भिकारी माझी टोपी चोरली' या बाल नाटकात हवालदाराची भूमिका करून त्यांनी रंगभूमीवर पदार्पण केले. 'विच्छा माझी पुरी करा', 'रथचक्र', व 'टूरटूर' ही त्यांची नाटकं प्रचंड गाजली. तर 'हळद रुसली कुंकू हसलं' आणि 'चष्मेबहाद्दूर' या सिनेमांतील त्यांचं कामही प्रचंड गाजलं.



कसा होता विजय कदम यांचा अभिनयक्षेत्रातील प्रवास?


मुंबईच्या रूपारेल महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर विजय कदम रंगभूमीचा मार्ग निवडला. विजय कदम हे त्यांच्या विनोदी पात्रांमुळे अधिक लक्षात राहिले. त्यांची अनेक नाटकं रंगभूमीवर गाजली. 'टूरटूर' या नाटकाने त्यांना लोकमान्यता, तर 'विच्छा माझी पुरी करा' या नाटकाने राजमान्यता मिळवून दिली. या नाटकाचे विजय कदम यांनी १९८६ पासून ७५० हून जास्त प्रयोग केले.


दरम्यान, मराठी चित्रपट क्षेत्रावरही त्यांनी स्वतःची पकड मजबूत ठेवली होती. 'चष्मेबहाद्दूर', 'पोलीसलाईन', 'हळद रुसली कुंकू हसलं' आणि 'आम्ही दोघं राजा राणी' या सारख्या चित्रपटांत त्यांनी अभियनाची छाप उमटवली. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Comments
Add Comment

Railway LPG Shortage : इंधन संकटाचा रेल्वे खानपान सेवेला फटका; वडापाव-समोसे मेन्यूमधून गायब होणार?

मुंबई : एलपीजीच्या सध्याच्या कमतरतेचा परिणाम रेल्वे स्थानकांमधील रेस्टॉरंट्सवर होऊ लागला आहे, अनेक

येत्या ३१ मार्च २०२६ पूर्वी पाण्याचे बिल न भरल्यास पाण्याची लाइन कापणार

मुंबई: महानगरपालिकेमार्फत नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यात येत असून सर्व जलजोडणीधारकांनी प्रलंबित

स्थापत्य समिती शहर अध्यक्षपदी यामिनी जाधव, उपनगरे समिती अध्यक्षपदी संगिता शर्मा यांची निवड

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थापत्य समिती (शहर) अध्यक्षपदी शिवसेनेच्या यामिनी यशवंत जाधव तर उपाध्यक्षपदी

महापालिका शाळांमध्ये पोषक आहार अद्याप तरी सुरळीतच; संस्थांना सिलिंडर पुरवण्यासाठी रेशनिंग कंट्रोलला महापालिका प्रशासनाच्या सूचना

मुंबई: मुंबईत इंधनाचा तुटवडा जाणवू लागल्यानंतर महापालिका शाळांमध्ये गॅस सिलिंडरमुळे मुलांच्या तोंडची खिचडी

स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये

कांदळवन क्षेत्रात अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, झेप्टोची बेकायदा गोदामे

आमदार संजय उपाध्याय यांचा गंभीर आरोप; पाहणीसाठी गेलेल्या लोकप्रतिनिधींना बाऊन्सर्सकडून दमदाटी मुंबई : मुंबईची