स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये प्लास्टिक बॉटल्समधून पाणी देण्याऐवजी काचेच्या बॉटल्समधून पाणी देण्याची सूचनाच महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांकरता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स पुरवल्या जातात. प्रत्येक सदस्यांच्या समोर टेबलवर मिनरल वॉटरच्या प्लास्टिक बॉटल्स ठेवल्या जातात. मात्र, याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत यापुढे प्रत्येक सभांमध्ये सदस्यांना पुरवले जाणारे पाण्याचा बॉटल्स त्वरीत बंद करण्यात याव्या. या प्लास्टिक बॉटल्समधून पाणी न पुरवता महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून ज्या काचेच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या बॉटल्समधून सदस्यांना पाणी दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केली. येत्या पुढील सभांमध्ये काचेच्या बॉटल्स पाणी सदस्यांना दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल प्रशासनाने घेऊन याची त्वरीत कार्यवाही केली जावी असे आदेश दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स आता बाद झालेल्या दिसतील.
Comments
Add Comment

Rain Update : वेळेआधीच मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात २ ते ५ जून दरम्यान पावसाच्या आगमनाचा अंदाज

मुंबई : देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा 'अल निनो'चे

Weather Alert : मुंबई, ठाणे, पालघर, रायगडमध्ये उष्णतेची लाट

मुंबई : राज्यात सध्या एकीकडे अवकाळी पाऊस तर दुसरीकडे कडाक्याचे ऊन अशी दुहेरी हवामान स्थिती पाहायला मिळत आहे. याच

मुलुंड कालिदास नाट्य गृह परिसरातील टर्फसह अनधिकृतरित्या बांधकामांवर कारवाई

महापौरांचे आदेश आणि दुसऱ्याच दिवशी कारवाईला सुरुवात मुंबई :मुलुंड येथील प्रियदर्शिनी इंदिरा गांधी क्रीडा

विभागातील नागरी कामांसोबतच सहायक आयुक्तांच्या खांद्यावर आरोग्य इमारतींची जबाबदारी

रुग्णालय, दवाखाना परिसर अतिक्रमण मुक्त ठेवून स्वच्छ आणि सुंदर राखण्याचे निर्देश रुग्णालयांमधील कामांवर सहायक

पीपीपी धोरणांतर्गत वाटप केलेल्या ५ शाळांच्या भूखंडांचे वाटप तात्काळ रद्द करा

मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अमीत साटम यांचे महापौर आणि महापालिका आयुक्तांना पत्र मुंबई : शाळांसाठी राखीव असलेले

बारव संवर्धनाला प्राधान्य देऊन अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवा; मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई : राज्यातील ऐतिहासिक बारवांचे जतन व संवर्धन करण्यास पुरातत्व विभागाने प्राधान्य द्यावे, यासाठी कृती