स्थायी समितीच्या सभांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स हद्पार

मुंबई: मुंबई महापालिकेत भाजपची सत्ता आल्यानंतर आता कारभारात अमुलाग्र बदल केला जात असून सभा बैठकीमध्ये प्लास्टिक बॉटल्समधून पाणी देण्याऐवजी काचेच्या बॉटल्समधून पाणी देण्याची सूचनाच महापालिका सभागृहनेते गणेश खणकर यांनी प्रशासनाला दिले आहेत.

महापालिका स्थायी समितीच्या बैठकीमध्ये सदस्यांकरता पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स पुरवल्या जातात. प्रत्येक सदस्यांच्या समोर टेबलवर मिनरल वॉटरच्या प्लास्टिक बॉटल्स ठेवल्या जातात. मात्र, याला सभागृहनेते गणेश खणकर यांनी हरकत घेत यापुढे प्रत्येक सभांमध्ये सदस्यांना पुरवले जाणारे पाण्याचा बॉटल्स त्वरीत बंद करण्यात याव्या. या प्लास्टिक बॉटल्समधून पाणी न पुरवता महापालिका नियोजन विभागाच्या माध्यमातून ज्या काचेच्या बॉटल्स उपलब्ध करून दिल्या आहेत, त्या बॉटल्समधून सदस्यांना पाणी दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केली. येत्या पुढील सभांमध्ये काचेच्या बॉटल्स पाणी सदस्यांना दिले जावे अशी सूचना खणकर यांनी केल्यानंतर स्थायी समिती अध्यक्षांनी याची दखल प्रशासनाने घेऊन याची त्वरीत कार्यवाही केली जावी असे आदेश दिले. त्यामुळे स्थायी समितीच्या बैठकांमधून प्लास्टिक पाण्याचा बॉटल्स आता बाद झालेल्या दिसतील.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र