Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या मेळाव्याआधी विरोधकांकडून डिवचणारे पोस्टर्स!

पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन करण्यात आली टीका 


ठाणे : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आज याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या मेळाव्यापूर्वीच ठाण्यामध्ये ठाकरेंच्या विरोधकांकडून त्यांना डिवचणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. सोबतच या पोस्टर्सवर 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' असं लिहिण्यात आलं आहे.


उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडकरी रंगायतन येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत. ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले हे समोर आले नसले तरी या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Four years Degree Course : आता पदवी अभ्यासक्रम चार वर्षांचा - नव शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी; पदवीस्तरावरच मिळणार संशोधनाची संधी

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणणाऱ्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (२०२०) अंमलबजावणी

CM Devendra Fadnavis : “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ

- उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती मुंबई : जागतिक आरोग्य दिनाच्या

Transfers Of IAS Officers : राज्यातील ११ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : राज्य शासनाने मंगळवारी प्रशासकीय स्तरावर मोठे फेरबदल करत ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे (Transfers Of IAS Officers)

Export of fruits and vegetables : उपलब्ध निर्यात सुविधा केंद्रांचा प्रभावी वापर करून फळे व भाजीपाल्याची निर्यात वाढवावी - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यात निर्यातक्षम फळे व भाजीपाला मोठ्या प्रमाणावर उत्पादित होतो. या पार्श्वभूमीवर उपलब्ध निर्यात

अवकाळीने झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना १२८ कोटी ६५ लाखांची मदत

जानेवारीपासून झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू मुंबई : राज्यात ऑक्टोंबर ते डिसेंबर २०२५

Chipi-Mumbai Flights चिपी–मुंबई विमानसेवा जलदगतीने सुरू करा - सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांचे निर्देश

सकाळी व संध्याकाळी अशी दोनदा विमानसेवा देण्याबाबत विचार करण्याच्या ही दिल्या सूचना मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा