Uddhav Thackeray : मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या मेळाव्याआधी विरोधकांकडून डिवचणारे पोस्टर्स!

  125

पोस्टर्समध्ये उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यावरुन करण्यात आली टीका 


ठाणे : आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील आज याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मेळावा आयोजित केला आहे. मात्र, या मेळाव्यापूर्वीच ठाण्यामध्ये ठाकरेंच्या विरोधकांकडून त्यांना डिवचणारे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दिल्ली दौऱ्यावरुन या बॅनर्समधून टीका करण्यात आली आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधींसमोर लोटांगण घालताना दिसत आहेत. सोबतच या पोस्टर्सवर 'घालीन लोटांगण, वंदिन चरण' असं लिहिण्यात आलं आहे.


उद्धव ठाकरे हे आज ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. गडकरी रंगायतन येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेआधी उद्धव ठाकरे यांच्या व्यंगचित्रांचे मोठे होर्डिंग अनेक ठिकाणी लागले आहेत. ठाकरेंना डिवचणारे बॅनर्स लावण्यात आल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.


दरम्यान, हे बॅनर्स कोणी लावले हे समोर आले नसले तरी या बॅनर्समुळे ठाण्यामध्ये राजकीय वाद उफाळण्याची शक्यता आहे, त्यामुळे पोलिसांकडून हे बॅनर्स हटवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच आजच्या ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Comments
Add Comment

बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे.

Sassoon Hospital : पुण्यातील ससून रूग्णालयातील डॉक्टरचा मृत्यू

पुणे : पुण्यातील ससून रुग्णालयातील मनोविकारतज्ञ आणि विभागप्रमुख डॉ. नितीन अभिवंत यांचे हिमालयातील

Rainy Season Picnic : पर्यटनस्थळ परिसरात ३१ ऑगस्ट पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू!

पुणे : पुणे जिल्ह्यातील लोणावळा परिसरातील तसेच मावळ तालुक्यातील ऐतिहासिक वास्तू, गड, किल्ले व स्मारके,

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या मुळावर याल, तर खबरदार!

मनसेविरोधात संतप्त वृत्तपत्र विक्रेत्यांची ठाणे स्थानकाबाहेर निदर्शने ठाणे : मुंब्रा रेल्वे दुर्घटनेच्या

मान्सून पुन्हा सक्रीय होण्याची चिन्हे

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने दडी मारली आहे. खरीप हंगामाची तयारी केलेली असतानाच अचानक पावसाने

आषाढी यात्रेसाठी एसटीकडून ५,२०० विशेष बसचे नियोजन

पंढरपूर :आषाढी यात्रेच्या सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी च्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक