Metro railway project : दहिसर ते भाईंदर मेट्रो रेल्वे प्रकल्प डिसेंबर २०२५ पर्यंत होणार पूर्ण!

Share

भाईंदर : मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा क्रमांक ९ दहिसर ते भाईंदर या कामाला ९ सप्टेंबर २०१९ रोजी सुरवात झाली होती. त्या दिवसापासून मीरा भाईंदर शहरातील नागरिक आतुरतेने वाट पाहत असलेल्या मेट्रो रेल्वेची सेवा त्यांना डिसेंबर २०२५ पर्यंत मिळण्याची शक्यता आहे तर काशी गावा पर्यंतचा पहिला टप्पा या वर्ष अखेर पर्यंत सुरू होणार असल्याची माहिती एमएमआरडीएने दिली आहे.

मीरा भाईंदर मुंबई शहराला जोडण्यासाठी दहिसर ते भाईंदर मेट्रो मार्ग क्र.९ ला शासनाने मंजुरी दिल्यावर ९ सप्टेंबर २०१९ ला मेट्रोचे काम सुरू झाले होते. ते काम पूर्ण करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी देण्यात आला होता. आता या कामाला दोन वर्षे उशीर झाला आहे. मीरा भाईंदर शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर मुंबईत प्रवास करत असतात. मेट्रो रेल्वे सेवा लवकर सुरू होण्यासाठी माजी नगरसेवक अजित पाटील यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

त्यांना पाठविलेल्या उत्तरात एमएमआरडीएने नमूद केले आहे की, दहिसर-भाईंदर मेट्रो मार्ग दोन टप्प्यात सुरू करण्याची योजना असून पहिल्या टप्प्यात दहिसर ते काशीगाव स्थानक डिसेंबर २०२४ पर्यंत आणि दुसऱ्या टप्प्यात काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान स्थानकापर्यंत डिसेंबर २०२५ पर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत. स्थानकांचे आतील व रुळ टाकण्याचे काम वेगाने सुरू असून मेट्रोचे ८७ टक्के काम पूर्ण झाले आहे. दहिसर ते भाईंदर दरम्यान आठ मुख्य स्थानके आहेत. पहिल्या टप्प्यात दहिसर, पांडुरंग वाडी, मीरागाव आणि काशीगाव या चार स्थानकांपर्यंत मेट्रो सुरू करण्याची तयारी आहे, तर उर्वरित चार स्थानकांपर्यंत वर्षभरानंतर म्हणजे डिसेंबर २०२५ पर्यंत मेट्रो रेल्वे सुरू होईल.

नागपूरच्या धर्तीवर दहिसर-भाईंदर मेट्रो प्रकल्प उभारण्यात येत आहे. मेट्रो रेल्वे खाली तीन उड्डाण पूल बांधले जात असून, त्यापैकी प्लेझेंट पार्क ते साईबाबा नगर हा उड्डाण पूल तयार झाला आहे. लवकरच हा पूल वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे.

मेट्रो मार्ग ९ प्रकल्पाचे स्थापत्य काम ८७% पूर्ण झाले आहे व स्थानकांची अंतर्गत कामे व मेट्रो ट्रॅकची कामे प्रगतीपथावर आहे. मेट्रो मार्ग ९ प्रकल्प २ टप्यात सुरु करण्यात येणार असून दहिसर ते काशीगाव (टप्पा १) हा डिसेंबर, २०२४ व काशीगाव ते नेताजी सुभाषचंद्र बोस स्टेडियम स्थानक (टप्पा २) हा डिसेंबर, २०२५ पर्यंत सुरु करण्यास प्रयत्नशील आहे.

Recent Posts

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

24 minutes ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

24 minutes ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

26 minutes ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

38 minutes ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

43 minutes ago

LSG vs DC, IPL 2025: लखनऊचे दिल्लीला १६० धावांचे आव्हान

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात टक्कर…

1 hour ago