Mhada Lottery : सर्वसामान्यांसाठी खूशखबर! म्हाडा मुंबईत काढणार २ हजारहून अधिक घरांची सोडत

जाणून घ्या कोणत्या भागात आहे घरांचा समावेश?


मुंबई : मुंबईत घराच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मुंबईत घर घेणे अशक्य होते. यासाठी सर्वसामान्य नागरिकांना सिडकोसह (Cidco) म्हाडाच्या (Mhada Lottery) घरांच्या लॉटरीची वाट पाहत असतात. त्यामुळे दरवर्षी म्हाडाकडून सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घर मिळण्यासाठी विविध भागात घरे उपलब्ध करुन दिली जातात. गतवर्षीही म्हाडाने तब्बल ४ हजार घरांसाठी लॉटरी काढली होती. त्याचा उत्तम प्रतिसाद पाहता यंदाही म्हाडाने मुंबईत घरांसाठी लॉटरी काढली आहे. यंदा म्हाडा मुंबईतील विविध भागात २हजार ३० घरांची लॉटरी जारी करणार आहे. तर यामध्ये मध्यम गटासाठी सर्वाधिक घरे असणार आहेत.


म्हाडा मुंबई मंडळाकडून येत्या दोन दिवसांत लॉटरीची जाहिरात प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर तातडीने अर्जविक्री आणि स्वीकृतीला सुरुवात होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मुंबई मंडळाची लॉटरी जाहीर होणार असल्यामुळे १३ सप्टेंबर रोजी घरं सोडतीची तारीख असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे अर्जदारांना अर्ज दाखल करण्यासाठी केवळ एक महिन्याचा कालावधी मिळणार आहे.


दरम्यान, म्हाडाने यंदा गोरेगाव, पवई, विक्रोळी या भागातील घरांचा समावेश सोडतीत केला आहे. या घरांसाठी अर्जदार म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकणार आहेत. त्यासाठी अर्जदारांना आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे.

Comments
Add Comment

मुंबई महापालिकेच्या १० कंत्राटी समुदाय संघटकांनी दिला राजीनामा

नव्याने कंत्राटी भरती करण्याऐवजी ५५ संघटकांना पुन्हा ११ महिन्यांची मुदत दिली वाढवून मुंबई (खास

भांडुपमध्ये मनसे गळाला लावणार तीन प्रभाग

खासदार कन्येला कुठल्या प्रभागात स्थान भाजपाच्या गडात की मनसेच्या वाट्याला जाणाऱ्या प्रभागात मुंबई (सचिन

Maharashtra Weather Updates : स्वेटर बाहेर काढा! वीकेंडला मुंबईकर गारठणार, पारा घसरला; थंडीचा जोर वाढल्याने 'हुडहुडी' भरणार, कसं असेल राज्याचं हवामान?

मुंबई : नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या अनेक भागांत झालेल्या पावसानंतर, आता महाराष्ट्रासह संपूर्ण

बांगलादेशी, रोहिंग्यांच्या घुसखोरी विरोधात कारवाई कडक करा: मंगलप्रभात लोढा यांची मागणी

मुंबई : एकीकडे मालाड आणि मालवणी परिसरात बांग्लादेशी आणि रोहिंगे घुसखोर राहत असल्याचे निदर्शनाला येत असतानाच

मुंबईकरांनो लक्ष द्या! मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, तुमच्या मार्गावरही आहे का?

मुंबई: मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवांचा वापर करणाऱ्या प्रवाशांसाठी रविवारी महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. १६

सात महिन्यांत ‘फुकट्यां’कडून मध्य रेल्वेची १४१ कोटींची दंड वसुली

मुंबई  : मध्य रेल्वेने २०२५-२६ मध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या २३.७६ लाख प्रवाशांकडून १४१ कोटी रुपये दंड वसूल