Nagpur Company Blast : नागपूरमधील वीट कारखान्यात भीषण स्फोट! एकाचा मृत्यू, ९जण जखमी

  77

नागपूर : नागपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नागपूरमधील (Nagpur News) मौदा तालुक्यातील झुल्लर गावात वीट बनवणाऱ्या एका खासगी कंपनीमध्ये भीषण स्फोट (Company Blast) झाला आहे. यामध्ये एका कामगाराचा जागीच मृत्यू झाला असून ६ ते ७ कामगार गंभीर जखमी असल्याची माहिती मिळत आहे. मात्र पहाटे झालेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मौदा तालुक्यातील झुल्लर येथे श्रीजी ब्लॉक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काल रात्री कंपनीत विटा बनवण्याचे काम सुरू होते. त्यामुळे काही कामगार रात्रीच्या वेळी कंपनीत हजर होते. दरम्यान, आज मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास कंपनीत काम सुरु असताना अचानक बॉयलरचा स्फोट (Massive Explosion) झाल्याने हा अपघात घडला. हा स्फोट इतका भीषण होता की, जवळपासच्या परिसराला हादरे बसले. तसेच या घटनेत कंपनीत काम करणाऱ्या एका कामगाराचा मृत्यू झाला असून इतर नऊ कामगार जखमी झाले आहेत.


दरम्यान, स्फोटाचा जोरदार आवाज झाल्यामुळे स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले. सध्या जखमींवर नागपूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच पोलिसांकडूनही घटनेचा अधिक तपास घेतला जात आहे.

Comments
Add Comment

अशोक नगरमधील पालिकेच्या मैदानाला तलावाचे स्वरूप

नागरिकांनी वारंवार तक्रार करूनही पालिकेचे दुर्लक्ष कांदिवली : कांदिवली पूर्वेला अशोक नगरमधील एकमेव असलेल्या

पुण्यात भिडे पूल दीड महिना बंद

पुणे : सदाशिवपेठेतून डेक्कन मेट्रो स्थानकात जाण्यासाठी महामेट्रोकडून भिडे पुलावरून लोखंडी पादचारी पूल

महिला सक्षमीकरणात शिक्षणाची भूमिका मोलाची

आरबीएलतर्फे विद्यार्थिनींना सायकलसह शालेय साहित्याचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे

ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री ८ वाजता

पुणे : आषाढी वारीतील संत ज्ञानेश्‍वर माउलींचा पालखी प्रस्थान सोहळा यंदाच्या वर्षी रात्री आठ वाजता होणार आहे.

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली