Palghar News : पालघरमधील आश्रमशाळेतील ७६ विद्यार्थीनींना जेवणातून विषबाधा!

पालघर : गेल्या काही दिवसांपासून अंगणवाडीसह विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलेल्या आहारामध्ये (Nutrition Food) किडे, मुंग्या, आळ्या आढळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला. अशातच आता पालघरमधील (Palghar News) एका आश्रम शाळेतील विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा (Food Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. डहाणू आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत येणाऱ्या रणकोळ आश्रम शाळेतील वसतिगृहात राहणाऱ्या ७६ विद्यार्थ्यांना जेवणामधून विषबाधा झाली. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र या प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, नेहमीप्रमाणे काल रात्री या आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना नेहमीप्रमाणे जेवण देण्यात आले. त्यानंतर सर्व विद्यार्थी आश्रमशाळेतील रुमवर गेले. मात्र, आज सकाळी काही विद्यार्थ्यांना मळमळ होऊ लागली. तर अनेक विद्यार्थिनींना उलट्या होऊ लागल्या. सुरुवातीला २८ विद्यार्थ्यांना त्रास सुरू झाल्याने उपचारासाठी त्यांना रात्री अडीच वाजता कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतरही बाकीच्या विद्यार्थ्यांनाही मळमळ उलटी जुलाब असा त्रास सुरू झाल्याने वानगाव ग्रामीण रुग्णालयात १६ विद्यार्थ्यांना तर ऐने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ३० विद्यार्थ्यांना उपचारासाठी दाखल केले. विद्यार्थ्यांच्या उपचारादरम्यान यांना अन्नातून विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. सध्या सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरु असून अनेकांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांवर उपचार सुरू असून नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचे कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाने रात्रीचे जेवण तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी ताब्यात घेतले असून ते प्रयोगशाळेत पाठवले जाणार आहेत, असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

Comments
Add Comment

शनिवार वाड्यावर नमाज पठण, निषेधासाठी भाजपच्या नेतृत्वात हिंदुत्ववाद्यांचे आंदोलन

पुणे : शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून

शनिवार वाड्यात नमाज पठण? ऐन दिवाळीत पुण्यात वादाची ठिणगी !

पुणे : पुण्यातील ऐतिहासिक शनिवार वाडा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भाजप खासदार

तोच फोटो ठरला शेवटची आठवण, एकाचवेळी झाला सात मित्रांचा मृत्यू

नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील सातपुड्यातील अस्तंबा अर्थात अश्वस्थामा यात्रेतून परतणाऱ्या यात्रेकरूंना

मराठा आरक्षणामुळे ओबीसी आरक्षणावर परिणाम झाल्याचा पुरावा आहे का ?

मुंबई : मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारने मराठा समाजाला संविधानाच्या चौकटीत राहून आरक्षण दिले

यंदाच्या दिवाळीत प्रदूषण नियंत्रण मंडळ १५८ ठिकाणी फटाक्यांच्या आवाजाची तीव्रता मोजणार

मुंबई : दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या आवाजामुळे मोठ्या प्रमाणात वायू आणि ध्वनी प्रदूषण होते. त्यामुळे पर्यावरण

ऐन दिवाळीत 'काळाचा घाला'! नाशिकजवळ कर्मभूमी एक्स्प्रेसमधून पडून २ युवकांचा दुर्दैवी अंत, १ गंभीर

नाशिक: मुंबईत पोटापाण्यासाठी गेलेल्या आणि दिवाळीच्या सणासाठी आपल्या कुटुंबीयांना भेटायला बिहारच्या दिशेने