Nashik news : गिरणा नदीत अडकलेल्या १२ जणांची हेलिकॉप्टरने सुखरुप सुटका!

  101

तब्बल १५ तासांहून अधिक काळ अडकून पडले होते मासेमार


नाशिक : मुंबईत पाऊस काही काळाने विश्रांती घेत असला तरी राज्यभरात पावसाचे थैमान सुरुच आहे. नाशिक जिल्ह्यातही गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. धरणांच्या पाण्याची पातळी देखील वाढली आहे. त्यातच मालेगाव (Malegaon) येथील गिरणा नदीला (Girna River) देखील पूर आला आहे. या नदीवर काल मासेमारी करण्यासाठी गेलेले १२ मासेमार काल पुराच्या पाण्यात अडकले. या सर्वजणांनी उंच खडकाचा आधार घेतल्यामुळे ते सुखरुप राहिले. एक रात्र त्यांनी या खडकावरच काढली. ते अडकून तब्बल १५ तासांहून अधिक काळ लोटल्यानंतर अखेर आता त्यांना हेलिकॉप्टरद्वारे (Helicopter) पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले आहे.


नाशिकच्या सात धरणांमधून सध्या विसर्ग सुरु असल्याने नद्यांना पूर आल्याचे चित्र आहे. त्यातच काल गिरणा नदीच्या पाण्यात मासे पकडायला गेलेले १२ जण अडकल्याची घटना घडली. नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने या १२ जणांना तब्बल १५ तासांहून अधिक कालावधी उलटूनही नदीपात्रातून बाहेर काढण्यात अनेक अडचणी येत होत्या. अखेर त्यांची लष्कराच्या हेलिकॉप्टरद्वारे सुखरुप सुटका करण्यात आली. मनपा प्रशासन, अग्निशमन दल, एसडीआरएफ (SDRF) जवान, तसेच स्थानिक नागरिक या सर्वांनीच या बचावकार्यात शर्थीचे प्रयत्न केले.


दरम्यान, या तरुणांना वाचविण्यासाठी धुळे येथून एसडीआरएफची टीम रात्री घटनास्थळी दाखल झाली. मात्र रात्री अंधारामुळे बचावकार्य थांबविण्यात आले होते. सकाळी अग्निशमन दल आणि नागरिकांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन राबविण्यास सुरुवात करण्यात आली. पुराच्या पाण्यात वाढ झाली असल्याने बचावकार्यात अडचणी येत होत्या. मात्र, पाण्यात अडकलेले सर्वजण एका उंच खडकावर बसून राहिल्यामुळे सुखरूप होते.


नाशिकच्या जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse), आमदार मौलाना मुफ्ती मोहम्मद (Maulana Mufti Mohammad) हे परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. अडकलेल्या तरुणांना जेवण देखील पोहचवण्यात आले होते. दरम्यान, अशा आपत्कालीन परिस्थितीत आता हेलिकॉप्टरची मदत घेवून २१ जणांना बाहेर काढण्यात येणार असल्याची माहिती मालेगाव महापालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव यांनी दिली होती. अखेर आता त्यांची सुटका झाली आहे.

Comments
Add Comment

राज्य सरकारने शालेय बस वाहतुकीसंदर्भात लागू केले नवीन नियम

शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान आणि औषध चाचणी पुणे : विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत

Air Indiaकडून प्रवाशांच्या नातेवाईकांसाठी विशेष मदत उड्डाणांची व्यवस्था

अहमदाबाद : अहमदाबादमध्ये Air India च्या विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर, Air India ने प्रवाशांचे नातेवाईक आणि

अहमदाबाद : शिकाऊ डॉक्टरांनी मारल्या इमारतीतून उड्या

हॉस्टेलवर विमान कोसळल्याने एकच हल्लकल्लोळ अहमदाबाद : गुजरातच्या अहमादाबाद येथे आज, गुरुवारी एअर इंडियाचे विमान

बनावट खतांचा साडेसात लाखाचा साठा जप्त ; कृषी विभागाची राहुरीत मोठी कारवाई

राहुरी - बनावट खत विक्री करत असलेल्या दुकानावर छापा मारत तब्बल साडेसात लाखाचा साठा कृषी विभागाने जप्त केला आहे.

आजच्याच दिवशी ७५ वर्षांपूर्वी झाला होता मोठा विमान अपघात, समुद्रात पडले होते विमान

मुंबई: गुजरातच्या अहमदाबाद एअरपोर्टजवळ विमान अपघाताच्या ठिकाणी धुराचे लोळ आणि अपघाताची दृश्ये ही हृदय हेलावून

चमत्कार, Air India अपघातातून सीट 11A वरील प्रवासी वाचला

अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबाद येथे गुरुवारी Air India च्या बोईंग 787-8 Dreamliner विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातात बहुतांश