Food Poisioning: फूड पॉईझनिंग झाल्यावर काय करावे, घ्या जाणून

मुंबई: जर काहीही खाल्ल्यावर पोटदुखीचा त्रास , दर अर्ध्या तासाला उलटी-जुलाब, जेवण न पचणे, डोकेदुखी, अधिक थकवा असे वाटत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


फूड पॉईझनिंग एक प्रकारचे इन्फेक्शन असते जे बॅक्टेरिया, व्हायरस आणि फंगस पसरू शकते. जेव्हा बॅक्टेरिया अथवा फंगसने संक्रमण झालेले पदार्थ कोणी खात असेल तर हे बॅक्टेरिया पोटातील चांगल्या बॅक्टेरियांना मारतात. यामुळे पचनक्रिया बिघडते. खराब पाणी, एक्सपायर झालेले पॅकेज्ड फूड, बराच वेळ बनवून ठेवलेले खाणे खाल्ल्याने त्रास होतो.


३२ ते ३५ डिग्री सेल्सियसपेक्षा अधिक तापमान झाल्यास बॅक्टेरिया आणि फंगस निर्माण होऊ लागतात. अनेक अभ्यासाअंती हे समोर आले आहे की ३७ डिग्रीपेक्षा अधिक तापमान बॅक्टेरिया आणि फंगससाठी अनुकूल असते.


याचकारणामुळे अधिक उन्हाळा आणि पावसाळ्याच्या दिवसांत जेवण लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. यामुळे ताजे जेवण जेवण्याचा सल्ला दिला जातो.


आरोग्य तज्ञांच्या मते जर काहीही खाल्ल्यानंतर पोटात खूप दुखत असेल, दर अर्ध्या तासाला उलटी तसेच जुलाब होत असतील, डोकेदुखी, अधिक थकवा आणि कमजोरी जाणवत असेल तर फूड पॉईझनिंगची लक्षणे असू शकतात.


जर काहीही खराब खाल्ल्याने उलटी-जुलाबसोबत ताप, सतत उलटी होणे, उलटीद्वारे शरीरातील पाणी कमी होणे, तोंड सुकत राहणे, शरीरावर रॅशेस येणे अशा प्रकारच्या समस्या तीन दिवसांपेक्षा दिसत असतील तर लगेचच डॉक्टरांकडे जा.

Comments
Add Comment

International Yoga Day 2026 : 'Yoga for Healthy Ageing' या संकल्पनेतून निरोगी आयुष्याचा मंत्र

२१ जून हा दिवस संपूर्ण जगासाठी आरोग्याचा उत्सव म्हणून ओळखला जातो. 'आंतरराष्ट्रीय योग दिन' जवळ येत असताना,

Magic of Science : आता 'मेंढीची लोकर' जोडणार मानवाची तुटलेली हाडे; संशोधनाला मोठे यश

LONDON: स्वेटर किंवा शालीसाठी वापरली जाणारी मेंढीची लोकर आता मानवी शरीराच्या उपचारासाठी वापरली जाणार आहे, हे ऐकून

शहरी जीवनातील वाढता मानसिक तणाव: ८२ टक्के नागरिक विळख्यात; अहवालातून धक्कादायक वास्तव समोर

आजच्या धावपळीच्या आणि स्पर्धात्मक युगात प्रगतीची शर्यत जिंकण्याच्या नादात माणूस स्वतःच्या आरोग्याकडे

JAMUN : हवामान बदलाचा 'गोड' साक्षीदार: उन्हाळ्याचा निरोप घेताना जांभळाचा मनसोक्त आनंद घ्या!

कडक उन्हाचा तडाखा आता ओसरू लागला असून, पावसाळ्याच्या पहिल्या सरींची चाहूल लागली आहे. ऋतू बदलाच्या या काळात

EAT GOOD : तुम्ही तुमच्या अन्नामुळेच आजारी पडत आहात का? जाणून घ्या सुरक्षित आहाराचे महत्त्व!

अन्न हे केवळ भूक भागवण्याचे साधन नसून ते आपल्या आरोग्याचा मुख्य आधार आहे. निरोगी जीवनासाठी सुरक्षित, पौष्टिक आणि

Thyroid : थायरॉईडच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका ; वेळीच लक्ष द्या !

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत थकवा किंवा वजनातील बदल या गोष्टी सामान्य मानल्या जातात. मात्र अनेकदा ही लक्षणे