Satara News : सेल्फी काढताना तरुणी २५० फूट दरीत कोसळली आणि...

  112

पुढे जे घडलं ते वाचून अंगावर येतील शहारे...


घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर


सातारा : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सोशल मीडियावर स्टंटबाजी (Social media stunts) करण्याच्या नादात तरुण आपला जीव धोक्यात घालत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. यात अनेक तरुणांचा जीवही गेला. अशा धक्कादायक घटना घडत असतानाही काही तरुणांना मात्र उंच कड्यावरुन सेल्फी (Selfie) आणि व्हिडीओ काढायचा मोह आवरत नाही. आता साताऱ्यातून (Satara news) देखील अशीच एक घटना समोर आली आहे, ज्यात तरुणी उंच कड्यापाशी जाऊन सेल्फी काढायला लागली आणि तिचा तोल गेल्याने ती २५० फूट दरीत कोसळली. नशीब बलवत्तर म्हणून ४० फूट खाली कोसळल्यानंतर ती एका झाडात अडकली आणि तिचा जीव वाचला. मात्र, घडलेल्या घटनेने खळबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, साताऱ्यातील ठोसेघर येथील सज्जनगड परिसरातील बोरडे घाटात ‘मंकी पॉईंट’ परिसरात ही घटना घडली. या ठिकाणी संततधार पाऊस सुरू असल्याने जमीन अतिशय निसरडी झाली आहे, त्यामुळे ही घटना घडली. डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना एका मुलीचा तोल गेला आणि ती २५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने, ४० फुटावर ती एका झाडात अडकली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला.


या घटनेची माहिती मिळताच महाबळेश्वर ट्रेकर आणि शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्या मुलीला सुखरूप बाहेर काढले. तिला साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. दुखापत झाल्याने मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती देखील समोर आली आहे. त्यामुळे अशा प्रकारे सेल्फीचा मोह जीवावर बेतू शकतो, याचा धडा तरुण पिढीने घेणं गरजेचं आहे.



घटनेचा थरारक व्हिडीओ आला समोर


या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून यात दिसत आहे की, रेस्क्यू टीमचे सदस्य तरुणीला वर घेऊन येत आहेत. यावेळी ती जखमी झाली असून, तिला नीट उभे राहणेही जमत नाही आहे. वर येतानाच ती दोन वेळा पुन्हा खाली पडताना ओरडताना दिसत आहे. यावेळी रेस्क्यू टीममधील सदस्यांनी स्वत:च्या जीवाची बाजी लावून या तरुणीला बाहेर काढले आहे.






 
Comments
Add Comment

कोकण रेल्वे मुंबई-मडगाव मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी

रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर १४ जून रोजी एकतर्फी विशेष गाडी मुंबई मडगाव मार्गावर धावणार आहे. या गाडीचे आरक्षण

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती