Nitesh Rane : वक्फ बोर्ड कायद्यात बदल करणं हे एनडीए सरकारचं मोठं पाऊल!

भारताच्या इस्लामीकरणात मोठा अडसर येणार; हिंदूंच्या जमिनी परत मिळणार


नितेश राणे यांनी मानले एनडीए सरकारचे आभार


मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारने (NDA Government) वक्फ बोर्ड कायद्यात (WAQF Board) बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हिंदूंना त्यांच्या जमिनी पुन्हा मिळण्याची शक्यता आहे. यावर आज भाजपा आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी आपली भूमिका मांडली. सरकारने घेतलेल्या या धाडसी निर्णयाबद्दल त्यांनी सकल हिंदू समाजाच्या वतीने सरकारचे आभार मानले.


नितेश राणे म्हणाले की, मोदींजींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार उद्या वक्फ बोर्ड कायद्यात अमेंडमेंट करणार आहे, ही अतिशय स्वागतार्ह बाब आहे. कारण या वक्फ बोर्डच्या सगळ्या हालचालींमुळे असंख्य हिंदू लोकांच्या जमिनी हडपण्याचा जो प्रकार सुरु आहे, या भारताला इस्लाम राष्ट्र बनवण्यामद्ये वक्फ बोर्ड एक मोठी भूमिका निभावत आहे. या कायद्यात बदल करण्याची तयारी आमच्या सरकारने दाखवली आहे त्यामुळे असंख्य हिंदूंना त्यांच्या हडपलेल्या जमिनी परत मिळणार आहेत. तसेच भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याच्या यांच्या मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात अडसर निर्माण होईल, यामुळे मी एनडीए सरकार आणि मोदी साहेबांचे सकल हिंदू समाजाच्या वतीने मनापासून आभार मानतो, असं नितेश राणे म्हणाले.



वक्फ म्हणजे काय?


कोणतीही जमीन वक्फ (WAQF) होणे म्हणजे त्यावर कोणाचाही मालकी हक्क नाही. अशा स्थितीत ती जमीन वक्फ बोर्डाची मालमत्ता बनते आणि नंतर ती सार्वजनिक कामांसाठी वापरली जाते. एवढेच नाही तर, एखादी मालमत्ता वक्फ झाल्यानंतर ती पुन्हा खाजगी होऊ शकत नाही. तुमची मालमत्ता वक्फची आहे आणि तुमची नाही, असे वक्फ बोर्डाने सांगितले तर तुम्ही न्यायालयातही जाऊ शकत नाही. कोणताही मुस्लिम त्याच्या कोणत्याही मालमत्तेला वक्फ करू शकतो.



Comments
Add Comment

Manoj Jarange : मनोज जरांगेंकडून २९ ऑगस्टला आझाद मैदानात आंदोलनासाठी पत्र

मुंबई : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलनाची हाक दिली असून, त्यासाठी मुंबईतील

Pandharpur Rehabilitation Policy Approved : श्री क्षेत्र पंढरपूर पुनर्वसन धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी

- ३ हजार ९९३ कोटी ९० लाख रुपयांच्या विकासकामांना गती मिळणार मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

Vande Mataram : ‘वंदे मातरम्’च्या गायनात अडथळा आणल्याप्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधी व खरगे यांच्याविरोधात पोलिसात तक्रार

नव्या कायद्यानुसार कारवाई करण्याची संभाजीनगर येथील भाजपा नगरसेवक नंदकुमार गवळी यांची मागणी मुंबई : नवी दिल्ली

Jalgaon News : ग्रामसभेत गोंधळ, शिवीगाळ अन्...; ग्रामसेवकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Jalgaon Crime News: जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील शिवरे येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ग्रामसभेत (Gram Sabha) झालेला

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग आरपीएफची 'ऑपरेशन नारकोस 'अंतर्गत मोठी कारवाई, १० लाखांचा गांजा जप्त

Bhusawal : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) "ऑपरेशन नारकोस" अंतर्गत भुसावळ रेल्वे स्थानकावर

Mangalagaur 2026 : आजपासून मंगळागौरला सुरूवात...जाणून घ्या शुभ मुहूर्त, सोपी पूजा पद्धत अन् पौराणिक कथा!

श्रावणातील पहिल्या मंगळवारी मंगळागौरीचे आगमन श्रावण महिन्याची चाहूल लागताच संपूर्ण महाराष्ट्रात सणांची