Tamhini Ghat : मुसळधार पावसाचा ताम्हिणी घाटाला तडाखा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदीचे निर्देश जारी!

  134

पुणे : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) संपूर्ण राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच पुण्यातील ताम्हिणी घाटालाही (Tamhini Ghat) या पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड-पुणे (Raigad- Pune) जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटावरील रस्ता एका बाजूने खचला आहे. यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मार्ग पुढील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवसात याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे सध्या या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदीचे निर्देश जारी केले आहेत.


दरम्यान, रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून उपाययोजनाही करण्यात येत आहेत.



वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद


पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी वरंधा घाट आणि ताम्हिणी घाट असे दोन मार्ग आहेत. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यातच वरंधा घाटात अनेक अरुंद रस्ते व वळणे असल्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तीन टप्प्यात होणार!

येत्या सप्टेंबर -ऑक्टोबर महिन्यात मतदान निवडणूक खर्चात वाढ करण्याबाबतही विचार राज्य निवडणूक आयुक्तांनी दिली

महाराष्ट्रातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

नदीजोड प्रकल्पासह गावपातळीवरील जलसंधारणाच्या कामातून महाराष्ट्रातील पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु -

पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात किसान क्रेडिट योजना लाखो शेतकऱ्यांसाठी ठरली जीवनवाहिनी - निर्मला सीतारामन

प्रतिनिधी: सरकारची योजना किसान क्रेडिट कार्ड (KCC) हे भारतीय शेतकऱ्यांसाठी जीवनरेखा ठरली आहे असे प्रतिपादन

Gold Silver Rate: चार दिवस सनसनाटी वाढीनंतर गुंतवणूकदारांना चालून आली संधी सोने 'इतक्या' रुपयांनी स्वस्त चांदी 'जैसे थे'

प्रतिनिधी: चार दिवसांच्या सनसनाटी वाढीनंतर सोन्याच्या दराने विश्रांती घेतली आहे. आज सराफ बाजारात सोन्याच्या

Mehul Choksi Breaking : फरार उद्योगपती मेहूल चोक्सी सेबीच्या रडारवर त्यांच्या सगळ्या मालमत्ता यंत्रणेने जप्त केल्या

प्रतिनिधी: नीरव मोदीनंतर आता मेहूल चोक्सींची घेराबंदी सेबीने केली आहे. सेबी (Security Exchange Board of India) एजन्सीने उद्योगपती

Eknath Shinde : लाडक्या बहिणीला 'डेडिकेटेड टू कॉमन मॅन'चा आधार! उपचारासाठी किडनीग्रस्त महिलेला एकनाथ शिंदेंनी केली मदत

जळगाव : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल मुक्ताईनगरला संत मुक्ताबाई पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थित