Tamhini Ghat : मुसळधार पावसाचा ताम्हिणी घाटाला तडाखा; पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडून वाहतूक बंदीचे निर्देश जारी!

पुणे : गेल्या आठवड्यापासून मुसळधार पावसाने (Maharashtra Rain) संपूर्ण राज्यात चांगलीच हजेरी लावली आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. दरड कोसळणे, झाडे पडणे, रस्ता खचणे, माती वाहून जाणे अशा घटना सातत्याने घडत आहेत. त्यातच पुण्यातील ताम्हिणी घाटालाही (Tamhini Ghat) या पावसाचा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे रायगड-पुणे (Raigad- Pune) जिल्ह्याला जोडणारा ताम्हिणी घाटावरील रस्ता एका बाजूने खचला आहे. यामुळे पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा मार्ग पुढील दोन दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मौजे आदरवाडी व डोंगरवाडी गाव येथील घाट परिसरात राष्ट्रीय महामार्ग क्र.७५३ एफ वरील रस्त्याच्या एका बाजूस अतिवृष्टीमुळे तडा गेल्याने रस्ता खचला आहे. दरम्यान पुढील काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्यास हा रस्ता आणखी खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यातच शनिवार व रविवार या विकेंडच्या दिवसात याठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी जमते. त्यामुळे सध्या या महामार्गावरील वाहतूक बंद ठेवण्याबाबत पुणे जिल्हाधिकारी यांनी वाहतूक बंदीचे निर्देश जारी केले आहेत.


दरम्यान, रस्ता खचलेल्या ठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून वाहतूक सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून उपाययोजनाही करण्यात येत आहेत.



वरंधा घाट ३० सप्टेंबरपर्यंत बंद


पुणे येथून कोकणाकडे जाण्यासाठी वरंधा घाट आणि ताम्हिणी घाट असे दोन मार्ग आहेत. पावसाळ्यात घाटामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होते. त्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याचा धोका असतो. त्यातच वरंधा घाटात अनेक अरुंद रस्ते व वळणे असल्यामुळे याठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे हा घाट वाहतुकीसाठी ३० सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत व्हिव्हिपॅट नाहीच; काय दिलं निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅटच्या वापराबाबत कायद्यांत तरतूद नाही मुंबई : स्थानिक

Maharashtra Local Body Election : १० नोव्हेंबरआधी आचारसंहिता लागू होणार? मोठी अपडेट आली समोर

मुंबई : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी माहिती

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी वातावरण पोषक

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन मुंबई  : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि

Navneet Rana : भाजप नेत्या नवनीत राणांना अश्लील शिवीगाळ, पत्राद्वारे 'गँगरेप' आणि 'जीवे मारण्याची' धमकी; राजापेठ पोलिसांकडून तपास सुरू

अमरावती : भाजप नेत्या आणि अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा ( Navneet Rana) यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर

दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात पुन्हा वाढ

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांवर वाढीव भार अलिबाग : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने

पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांनी मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल

चिपळूण : पाऊस थांबल्यानंतर तीन महिन्यांत मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा विश्वास माजी केंद्रीय