Mahavikas Aghadi : नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत मिठाचा खडा!

काँग्रेस आणि शरद पवार गट उबाठावर नाराज


नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच कटुता निर्माण झाली होती. याचा परिणामही दिसून आला आणि ठाकरेंचा पराभव झाला. मात्र, आता विधानसभेतही (Vidhansabha) ठाकरे गट पुन्हा तीच चूक करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. नाशिकच्या दिंडोरी जागेवर ठाकरे गटाने काँग्रेस (Congress) आणि शरद पवार गटासोबत (NCP Sharad Pawar Group) चर्चा न करता आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ठाकरेंच्या विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.


आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमुखाने हा ठराव करण्यात आला.


मात्र, अशा प्रकारे परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे, असा काँग्रेस बैठकीत ठराव झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील (hemlata patil) यांनी दिली आहे. तर ठाकरे गटाने उमेदवारांची नावे एकमताने ठरवली त्यामुळे त्यांना शुभेच्छा असा खोचक टोलाही शरद पवार गटाचे माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी लगावला आहे.

Comments
Add Comment

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर आणखी एक अपघात, वाहतुकीची कोंडीच कोंडी

पुणे : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ पुण्याकडून मुंबईच्या दिशेने प्रोपिलीन वायू

आपत्कालीन परिस्थितीतील वाहतूक आराखडा तत्काळ तयार करा - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल मिसिंग लिंकचे कामही लवकरात लवकर

अमरावती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी १२ हेक्टर जागा मंजूर

देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय १०० विद्यार्थी प्रवेश ⁠४३०

पुणे एक्सप्रेस वे अपघात प्रकरणी महाराष्ट्र राज्य परिवहन सेवेच्या १३९ फेऱ्या रद्द

मुंबई : पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या

एक्सप्रेवेवर प्रचंड मोठी वाहतूक कोंडी अन् २५ किलोमीटर पर्यंत रांगा; नेमकं पुण्यात घडलं काय ?

लोणावळा : मुंबई–पुणे द्रुतगती महामार्गावर मंगळवारी सायंकाळी घडलेल्या एका अपघातामुळे संपूर्ण मार्गावर

Congress: काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर, नगरसेवक थेट दिल्लीत पोहोचले, बैठकीत नेमकं घडलं काय?

दिल्ली: चंद्रपूर महापालिकेत सर्वाधिक जागा जिंकूनही काँग्रेसमध्ये गटातील राजकारणामुळे सत्ता गमावण्याची वेळ