Mahavikas Aghadi : नाशिकच्या जागेवरुन महाविकास आघाडीत मिठाचा खडा!

Share

काँग्रेस आणि शरद पवार गट उबाठावर नाराज

नाशिक : लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) ठाकरे गटाने सांगलीच्या जागेवर परस्पर उमेदवार जाहीर केल्याने महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) चांगलीच कटुता निर्माण झाली होती. याचा परिणामही दिसून आला आणि ठाकरेंचा पराभव झाला. मात्र, आता विधानसभेतही (Vidhansabha) ठाकरे गट पुन्हा तीच चूक करत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत मिठाचा खडा पडला आहे. नाशिकच्या दिंडोरी जागेवर ठाकरे गटाने काँग्रेस (Congress) आणि शरद पवार गटासोबत (NCP Sharad Pawar Group) चर्चा न करता आपला उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी ठाकरेंच्या विरोधी भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाची महत्वाची बैठक काही दिवसांपूर्वी पार पडली. या बैठकीत नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तर नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाची निवडणूक माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) यांनी लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून एकमुखाने हा ठराव करण्यात आला.

मात्र, अशा प्रकारे परस्पर उमेदवारांच्या नावाचा ठराव करण्याला काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे. नाशिक मध्यची जागा कोणत्याही परिस्थितीत काँग्रेस पक्षाला सुटली पाहिजे, असा काँग्रेस बैठकीत ठराव झाल्याची माहिती काँग्रेस प्रवक्त्या हेमलता पाटील (hemlata patil) यांनी दिली आहे. तर ठाकरे गटाने उमेदवारांची नावे एकमताने ठरवली त्यामुळे त्यांना शुभेच्छा असा खोचक टोलाही शरद पवार गटाचे माजी आमदार नितीन भोसले (Nitin Bhosale) यांनी लगावला आहे.

Recent Posts

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, २१ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण अष्टमी, शके १९४७. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा, योग साध्व. चंद्र राशी…

49 minutes ago

Summer Tips : उन्हाळ्यात कशी घ्यावी डोळ्यांची काळजी, जाणून घ्या ‘या’ गोष्टी!

मुंबई : उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. कडक सूर्यप्रकाशात घराबाहेर पडणे त्रासदायक वाटू लागले आहे.…

1 hour ago

क्रिकेटपटूंच्या कराराची BCCI ने केली घोषणा, ३४ खेळाडूंशी करार; फक्त चार खेळाडूंचा ए+ मध्ये समावेश

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ३४ क्रिकेटपटूंसोबतच्या कराराची घोषणा केली आहे. रोहित…

2 hours ago

काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा २६/११ च्या हल्ल्यामागे अदृश्य हात, भाजपाच्या माधव भांडारींचा आरोप

मुंबई : मोहम्मद अजमल कसाबसह दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ रोजी हल्ला केला.…

2 hours ago

Benefits Of Watermelon : कलिंगड खा अन् हायड्रेट राहा!

ऊन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला हायड्रेट ठेवणं खूप महत्वाचं असते. ऊन्हाळ्याच्या दिवसांत खाण्यापिण्याच्या गोष्टींची विशेष काळजी घ्यावी…

2 hours ago