Supreme Court : जिल्ह्यांच्या नामांतरप्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून राज्य सरकारला दिलासा!

नामांतराचा हक्क राज्य सरकारचा म्हणत विरोधकांची याचिका फेटाळली


नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून उस्मानाबाद (Usmanabad) आणि औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यांचे नामांतर अनुक्रमे धाराशिव (Dharashiv) आणि संभाजीनगर (Sambhajinagar) करण्याचा मुद्दा चर्चेत आहे. राज्य सरकारने या जिल्ह्यांचे नामांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल करण्यात आली होती. ही याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली आहे. नामांतर करण्याचा हक्क राज्य सरकारकडे असून त्यात हस्तक्षेप करु नये, असं कोर्टाने याचिकाकर्त्यांना म्हटलं आहे. त्यामुळे राज्य सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे.


राज्य सरकारने उस्मानाबादचे नामांतर 'धाराशिव' तर औरंगाबादचे नामांतर 'छत्रपती संभाजीनगर' करण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात दाखल झालेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. राज्य सरकारने घेतलेला निर्णय योग्य असल्याचं कोर्टाने म्हटलं होतं. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टात अपील केलं. मात्र, सुप्रीम कोर्टानेही ही याचिका फेटाळून लावली.



काय म्हटलं होतं याचिकेत?


निव्वळ राजकीय हेतूनेच हा निर्णय घेण्यात आल्याचे या याचिकेमध्ये म्हटले होते. यावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. यामध्ये कोर्टाने स्पष्ट केले की, नाव देण्याचा आणि बदलण्याचा अधिकार कायद्याने दिलेला आहे. जेव्हा नाव देण्याचे अधिकार असतात तेव्हा नामांतर करण्याचे सुद्धा अधिकार असतात. नाव बदलले की काही लोक समर्थनार्थ आणि विरोधात असणारच. त्यामुळे राज्य सरकारच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास कोर्टाने नकार दिला आहे व संबंधित याचिका फेटाळली आहे.

Comments
Add Comment

Madhuri Vantara : 'वनतारा'च्या उपचारांनी 'माधुरी' हत्तीण झाली ठणठणीत, लवकरच कोल्हापूरला परतणार

जामनगर: गंभीर आजारपण आणि दोन्ही पायांच्या हाडांच्या दुखापतीमुळे मृत्यूच्या छायेत असलेल्या 'माधुरी' नावाच्या

Study Tours For Maharashtra Govt School : सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांचे नशीब उजळले! आता 'NASA' आणि 'ISRO' ची सफर

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी

Made in India : दोन भारतीय इंजिनिअर्सनी उभी केली १४,१४५ कोटींची 'युनिकॉर्न' कंपनी

मुंबई: आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या जागतिक स्पर्धेत सध्या अमेरिकन कंपन्यांचा दबदबा आहे. मात्र, या शर्यतीत आता

Cough Syrups : औषधांच्या नियमात मोठा बदल; कफ सिरपसाठी आता डॉक्टरांची 'चिठ्ठी' बंधनकारक!

नवी दिल्ली : देशातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने एक अत्यंत महत्त्वाचा आणि धाडसी

Telegram Temporary Ban : NEET-UG 2026 परीक्षेपूर्वी सरकारचा मोठा निर्णय! पेपरफुटी रोखण्यासाठी टेलिग्रामवर तात्पुरती बंदी

NEET-UG 2026 पुनर्परीक्षेपूर्वी पेपरफुटी आणि ऑनलाइन फसवणुकीला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले

PM Narendra Modi : पंतप्रधान मोदींना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च सन्मान; ३३ देशांकडून मिळालेल्या पुरस्कारांच्या यादीत आणखी एका देशाची भर

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांना स्लोव्हाकियाचा सर्वोच्च नागरी सन्मान ‘ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस