Kolhapur news : कोल्हापुरात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटल्याने ८ जण वाहून गेले!

तीन जणांचा शोध लागला तर पाच जण बेपत्ता


कोल्हापूर : राज्यात पावसाने जोर (Heavy rainfall) धरल्यामुळे अनेक दुर्घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कोल्हापुरातून एक धक्कादायक बातमी (Kolhapur news) समोर आली आहे. कोल्हापुरात गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. अशातच शिरोळ तालुक्यात पुराच्या पाण्यात ट्रॅक्टर उलटून मोठी दुर्घटना घडली. ट्रॅक्टरमधील ८ जण वाहून गेले आहेत. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं आहे तर इतर ५ जणांचा शोध सुरु आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापुरात पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक गावांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. अशातच गावाला होणारा पाणीपुरवठा करण्यासाठी गावातील काही नागरिक ट्रॅक्टरमधून विद्युत पंप सुरू करण्यासाठी जात होते. या ट्रॅक्टरमधून ८ जण प्रवास करीत होते. त्याचवेळी शिरोळ तालुक्यात बस्तवड - अकिवाट मार्गावर पुराच्या पाण्यात अचानक ट्रॅक्टर उलटला. त्यामुळे ट्रॅक्टरमध्ये बसलेले आठही लोक पाण्यात बुडाले.


घटनास्थळी एनडीआरएफची टीम दाखल झाली असून पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं असून नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मात्र, अजूनही ५ जण बेपत्ता असून त्यांचा शोध सुरु आहे. या घटनेमुळे परिसरातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Comments
Add Comment

Pune Crime :  पुण्यात मध्यरात्री रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; ६० ते ७० तरुण-तरुणी ताब्यात, अमली पदार्थांचा संशय

पुणे : पुण्यात पुन्हा एकदा कथित रेव्ह पार्टीचा (Raid On Pune Rave Party) पर्दाफाश झाला असून गुन्हे शाखेच्या पथकाने मध्यरात्री

Ashadhi Wari 2026 : आषाढी पालखी सोहळ्याचे अधिकृत वेळापत्रक जाहीर; पुण्यात २ दिवस रंगणार भक्तीचा महोत्सव

पुणे : आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्र विठ्ठलभक्तीच्या रंगात रंगला आहे. संत ज्ञानेश्वर

Maharashtra Monsoon : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार! रविवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार सरींचा अंदाज; २५ जिल्ह्यांना येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात रविवारचा दिवस पावसाळी ठरण्याची शक्यता असून भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील २५

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Jalgaon : भीषण अपघातामुळे वाटेतच काळाची झडप, १ वर्षाच्या चिमुकलीसह चौघांचा हृदयद्रावक अंत

Jalgaon : जळगाव जिल्ह्यातील वरणगावजवळ मुंबई-नागपूर महामार्गावरील (Mumbai-Nagpur Highway) बायपासवर थरारक अशी भीषण रस्ते अपघाताची

Crime News : शिट्टी वाजवली, उसाच्या शेतातून 10 ते 12 जण बाहेर आले, अन.... स्वस्तात सोने मिळण्याचे आमिष महागात पडले

अहिल्यानगर : स्वस्तात सोने मिळणार असल्याचं आमिष दाखवत रायगडच्या जिल्हा परिषद सदस्यालाच सापळ्यात ओढून तब्बल 52