Kolhapur Rain : पावसाची मुसळधार! कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट

नागरिकांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा


कोल्हापूर : मागच्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने चांगलाच जोर धरला होता. त्यातच कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण आठवडाभर पावसाची संततधार (Heavy Rain) कोसळत असल्यामुळे कोल्हापूरमध्ये पूरस्थिती (Flood) निर्माण झाली होती. यामध्ये अनेकांचे मोठे नुकसान झाले होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला असल्यामुळे येथील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. परंतु आता पुन्हा पावसाच्या मुसळधार सरी कोसळत असल्यामुळे कोल्हापूरवर आणखी एकदा पूराचे सावट ओढले गेले आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर कोल्हापूरच्या धरणक्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. या पावसामुळे ७० बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तसेच राधानगरी धरणही १०० टक्के भरल्यामुळे येथील ७ स्वयंचलित दरवाजे उघडले आहेत. या धरणातून भोगावती नदीमध्ये ११,५०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे. त्यासोबत पंचगंगा नदी देखील धोक्याच्या पातळीवर असल्यामुळे या पाणीपातळीत कधीही वाढ होण्याची शक्यता आहे, यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


दरम्यान, कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यात पूरस्थिती अजूनही कायम राहिल्याचे चित्र दिसून येत आहे. संपूर्ण शेती पाण्याखाली गेल्याने शेतकरीवर्ग चिंताग्रस्त झाला आहे. त्यातच पुन्हा पूर येण्याची शक्यता असल्यामुळे सर्व नागरिक आणखी चिंतेत आले आहेत. त्यामुळे आम्हाला सरकारी अनुदान नको पण या पुराचा कायमचा बंदोबस्त करा, अशी विनंती शेतकऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांना केली जात आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक