ST Bus : चाकरमान्यांसाठी आनंदवार्ता! गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या जादा गाड्या धावणार

मुंबई : येत्या ७ सप्टेंबर रोजी संपूर्ण देशभरात सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे (Ganeshotsav 2024) आगमन होणार आहे. या गणरायाच्या आगमनासाठी अनेक चाकरमानी कोकणात धाव घेतात. त्यामुळे गणेशोत्सवाच्या दोन ते तीन महिने आधीच तिकीट बुकींग करण्यासाठी चाकरमान्यांची एकच गर्दी उसळते. नागरिकांची मोठी गर्दी पाहता मध्य आणि पश्चिम रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा (Special Railway) निर्णय घेतला आहे. रेल्वेनंतर आता एसटी (ST Bus) बसने देखील चाकरमान्यांचा प्रवास सुखाने आणि वेगाने होण्यासाठी जादा बस गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, दरवर्षीप्रमाणे गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या कालावधीत मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. तसेच यामध्ये व्यक्तिगत आरक्षणासोबत गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना ५० टक्के तिकिट दरातही सवलत मिळणार आहे.


त्याचबरोबर या प्रवासादरम्यान एसटीची वाहतूक सुरळीत होण्यासाठी बसस्थानक व बसथांब्यावर एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखेखाली कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. तसेच कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी वाहनदुरुस्ती पथक देखील तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांना नैसर्गिक विधीसाठी तात्पुरत्या स्वरूपाची प्रसाधनगृह उभारण्यात येणार आहेत.


दरम्यान, सदर बसेस आरक्षणासाठी npublic.msrtcors.com या अधिकृत संकेतस्थळावर तिकीटे उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सदर बसेसचे आरक्षण बसस्थानकावर किंवा महामंडळाच्या MSRTC Bus Reservation ॲपव्दारे उपलब्ध होणार आहे.

Comments
Add Comment

नागपूर AIMS मधील विद्यार्थ्यांच्या जेवणात आढळल्या चक्क अळ्या..... सोशल मीडियावर चर्चेला उधाण

नागपूर : अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी आपल्या घरापासून दूर असतात. अशावेळी जेवणाची सोय होते ती खाणावळीतून किंवा

Pune ZP News : पुणे : राजकीय हालचालींना वेग; अध्यक्षपदाची खुर्ची कोणाची? निवडीची तारीख ठरली

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचा धुराळा शांत झाल्यानंतर आता खऱ्या

DA Hike: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

मुंबई: राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वीच मोठी आनंदवार्ता जाहीर करण्यात आली आहे.

राज्यात रस्ता अपघाती मृत्यूंमध्ये ८ टक्क्यांची घट; परिवहन विभागाकडून आकडेवारी जाहीर

- २०३० पर्यंत अपघात निम्म्यावर आणण्याचे परिवहन विभागाचे उद्दिष्ट मुंबई : राज्यात रस्ता सुरक्षेसाठी परिवहन

भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट; पाच दिवसात तरुणीने बदलला निर्णय

पुणे : महाष्ट्राभर चर्चा असलेल्या भिगवण प्रकरणात अनेक दावे , प्रतिदावे समोर येत होते, पण आता स्वतः मुलीनेच

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून ४२ मौलिक ग्रंथांचे प्रकाशन

मुंबई : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळातर्फे यंदा ४२ मौलिक ग्रंथांचे