मुरुडमध्ये लोकन्यायालय : प्री लिटिगेशन ८७९ पैकी ३२ प्रकरणे निकाली

  34

मुरुड : मुरुड दिवाणी व फौजदारी न्यायालय (क, स्तर) व मुरुड तालुका विधी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने न्यायाधीश घनःश्याम तिवारी यांच्या अध्यक्षतेखाली २७ जुलै रोजी लोकन्यायालय घेण्यात आले.


सदर लोकन्यायालयात बीएसएनएल, महावितरण, बॅंक ऑफ इंडिया, मुरुड नगरपरिषद, पंचायत समिती, मुरुड न्यायालयातील प्रलंबित प्रकरणांचा समावेश करण्यात आला होता. यावेळी प्री लिटिगेशन असलेली एकुण ८७९ पैकी ३२ प्रकरणे निकाली निघाली.


मुरुड नगरपरिषदेची पाणीपट्टी-घरपट्टी, पंचायत समितीची कर वसुली, तसेच बँकांची कर्ज वसुली अशी एकुण रुपये १,१०,४८०/- वसुली करण्यात आली. तर दिवाणी व फौजदारी प्रलंबित प्रकरणांपैकी एकुण ६८ फौजदारी प्रकरणे व ०६ दिवाणी प्रकरणे निकाली काढण्यात आली.


लोकन्यायालयात पंच म्हणुन ॲड. डी. एन. पाटील यांनी काम पाहिले. सहाय्यक सरकारी अभियोक्ता मिलींद साळगांवकर, ॲड. संजय जोशी, ॲड. एम. जे. तांबडकर, ॲड. हुसेन, ॲड. अजित चोगले, ॲड. कुणाल जैन, रेवदंडा पोलीस ठाण्याचे डी. डी. काकडे, मुरुड पोलीस ठाण्याचे डी. के. पाटील, सहाय्यक अधिक्षक शीला काठे, मतीन अधिकारी वरिष्ठ लिपीक व कर्मचारी वर्ग यांचे विशेष सहकार्य लाभले.

Comments
Add Comment

वीज कोसळण्याचे अलर्ट देणारे अ‍ॅप

मुंबई : वीज कोसळून दरवर्षी अनेक शेतकऱ्यांचे आणि शेतमजुरांचे मृत्यू होतात. यावर उपाय म्हणून वीज कोसळणार असल्याची

कमी खर्चाच्या, नाविन्यपूर्ण कृषी तंत्रज्ञानाद्वारे शेतकऱ्यांची समृद्धी वाढवणे – कृषी मंत्री अ‍ॅड. माणिकराव कोकाटे

कृषी विभागातर्फे महाकृषी एआय धोरण कार्यशाळेचे उद्घाटन मुंबई: मानवरहित शेती, एआय-आधारित (AI Oriented) हवामान अंदाज,

शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी महत्वपूर्ण ठरतील !

कृषी आयुक्त सूरज मांढरे यांचे प्रतिपादन मुंबई: शेतीमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना शाश्वत विकासासाठी हातभार

नदी, नाल्यांकडे दुर्लक्ष, नालेसफाईत कोट्यावधी खर्च

कांदिवली (वार्ताहर) : कांदिवली, चारकोप आणि बोरिवली गोराईतील खाडीकिनारी असलेली खारफुटी नामशेष होत असून, तिथे

विठुरायाच्या दर्शनासाठी लालपरीलाच पसंती

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील भाविकांना आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी एसटी प्रशासनाकडून विशेष

Success Mantra: सकाळी उठताच लक्षात ठेवा या गोष्टी, जीवनात येणार नाही अडथळे

मुंबई: आचार्य चाणक्य हे भारताचे थोर विचारवंत होते. त्यांनी आपले अनुभव आणि ज्ञानाच्या जोरावर चाणक्य नितीमध्ये