Dnyaneshwar Mauli Palkhi : ज्ञानोबांच्या पादुकांचे दर्शन न मिळाल्याने वारकऱ्यांचा रथासमोर ठिय्या!

  93

सायंकाळी समाज आरतीदरम्यान पुन्हा निषेध करु, वारकऱ्यांचे म्हणणे


पुणे : ज्ञानोबा माऊलींच्या (Dnyaneshwar Mauli Palkhi) पालखीचे आज सातारा (Satara) जिल्ह्यातून पुणे (Pune) जिल्ह्यामध्ये आगमन झाले. माऊलींच्या या परतीच्या प्रवासात निरामधील दत्त घाटावर जंगी स्वागत देखील करण्यात आले. तसेच परंपरेनुसार पुरंदर तालुक्यातील निरा येथे ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना निरास्नानही घातले गेले. परंतु या नीरास्नानानंतर दिंडीमधील वारकऱ्यांचा मोठा गोंधळ उडाला. दरवर्षीप्रमाणे यंदा काही वारकऱ्यांना पादुकांचे दर्शन न दिल्यामुळे वारकऱ्यांनी आक्रमक रुप धारण केले. तसेच तीव्र संताप व्यक्त करत ऐन पालखीसमोरच ठिय्या मांडल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला.

नेमके प्रकरण काय?


ज्ञानोबा माऊलींच्या पालखी सोहळा परतीच्या प्रवासात पादुकांना नीरा नदीच्या पाण्याने स्नान घालण्यात आले. दरवर्षी पादुकांचे स्नान झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाच्या पुढे आणि पाठीमागे असणाऱ्या सर्व दिंड्यांतील वारकऱ्यांना दर्शन मिळण्यासाठी या पादुका प्रत्येक दिंडीपर्यंत नेतात. मात्र यंदा तसे न करता वारकऱ्यांनी रथामध्ये येऊन दर्शन करावे असे सांगण्यात आले. या गोष्टीमुळे वारकरी आक्रमक होऊन त्यांनी रथासमोरच ठिय्या मांडला. तसेच दर्शन मिळेपर्यंत आम्ही मागे हटणार नाही असेदेखील वारकऱ्यांनी म्हटले.

दरम्यान, पालखीचा रथ आणि पालखी पुढील दिंड्या पुढे निघून गेल्या तर रथाच्या पाठीमागील दिंड्या या नीरा नदीच्या पुलावर थांबल्या होत्या. मात्र काही वेळानंतर या दिंड्या देखील मार्गस्थ झाल्याची माहिती मिळत आहे. परंतु सायंकाळी नित्याचे भजन करून समाज आरतीला आम्ही या गोष्टीचा निषेध करू असे दिंडीतील वारकऱ्यांचे म्हणणे आहे.
Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या