Sangli news : सांगलीतल्या पूरस्थितीमुळे कारागृहातील कैद्यांना कोल्हापूरमध्ये हलवलं

  142

२० महिला आणि ६० पुरुष अशा ८० कैद्यांचा समावेश


कोल्हापूर : काल राज्यभरात पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पुण्यात (Pune) पुराचा धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. तर आता सांगलीमध्येही (Sangli) पुराचा धोका उद्भवला आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी अशा ८० कैद्यांचा समावेश आहे.


सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ४५ फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.


महादेव होरे म्हणाले की, सांगली जिल्हा कारागृह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा आणि इतर वस्तूंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या