Sangli news : सांगलीतल्या पूरस्थितीमुळे कारागृहातील कैद्यांना कोल्हापूरमध्ये हलवलं

२० महिला आणि ६० पुरुष अशा ८० कैद्यांचा समावेश


कोल्हापूर : काल राज्यभरात पावसाने धुमाकूळ (Heavy Rain) घातला. पुण्यात (Pune) पुराचा धोका निर्माण होऊन जनजीवन विस्कळीत झालं. तर आता सांगलीमध्येही (Sangli) पुराचा धोका उद्भवला आहे. सांगली, कोल्हापूरमध्ये (Kolhapur) मुसळधार पावसामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे सांगलीतील जिल्हा कारागृहातील कैद्यांना कोल्हापुरातील कळंबा जेलमध्ये हलवण्यात आलं आहे. यामध्ये २० महिला कैदी आणि ६० पुरुष कैदी अशा ८० कैद्यांचा समावेश आहे.


सांगली कारागृह अधीक्षक महादेव होरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांगली जिल्हा कारागृहाने संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. ४५ फूटांच्या आसपास पाणी गेल्यानंतर कारागृहात पाणी जाण्यास सुरूवात होते. कृष्णा नदीची पाणी पातळी लक्षात घेऊन आणखी काही कैद्यांना हलवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. याशिवाय कारागृहातील अन्न धान्य , कागदपत्रे, शास्रात्रे, दारुगोळा सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेला आहे.


महादेव होरे म्हणाले की, सांगली जिल्हा कारागृह संभाव्य पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे. पूरस्थिती निर्माण झाल्यास आवश्क तो अन्नधान्यसाठा आणि इतर वस्तूंचा साठा करून ठेवण्यात आला आहे. त्याचबरोबर कारागृहातील संगणक कक्ष, कागदपत्रे सर्व गोष्टी पाणी पोहोचणार नाही अशा ठिकाणी ठेवण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

राज्यातील विमानतळांची विकासकामे कालबद्ध गतीने पूर्ण करावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

- वाढवण व विरार परिसरात नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ विकसित करण्यात येणार मुंबई : आशियातील सर्वात मोठे प्रस्तावित

RO-RO Ferry : मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी 'हाऊसफुल्ल' बुकिंग

- मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ! मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने मुंबई ते विजयदुर्ग

Yogesh Kadam : बांगलादेशी घुसखोरांविरुद्ध राज्यात कोम्बिंग ऑपरेशन! गृह राज्यमंत्री योगेश कदम यांची मोठी घोषणा

मुंबईत 'टास्कफोर्स' तैनात; दाट वस्त्यांमध्ये शोधमोहीम मुंबई : राज्यातील वाढत्या बांगलादेशी घुसखोरांच्या

Modi and Persian scripts : राज्यात मोडी व फारसी लिपी प्रचार-प्रसारासाठी वार्षिक पुरस्कार - मंत्री ॲड.आशिष शेलार

मुंबई : महाराष्ट्राच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक व प्रशासकीय वारशाचे जतन करण्यासाठी राज्य शासनाने मोडी व फारसी

ShivendraRaje Bhonsle : मुंबई-गोवा महामार्गाचे 'मे' अखेरपर्यंत काम पूर्णत्वास; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे विधानपरिषदेत आश्वासन

मुंबई : दरवर्षी होळी आणि गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या

Madhuri Misal : भटक्या श्वानांच्या उपद्रवावर राज्य सरकार मोठं पाऊल उचलणार; राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची सभागृहात घोषणा

शिक्षण संस्थांच्या सुरक्षिततेसाठी 'नोडल अधिकारी' नेमणार मुंबई : मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या