Tourist points : अतिवृष्टीमुळे मुळशी आणि मावळमधील पर्यटनस्थळे ५ दिवस बंद!

नागरिकांना पर्यटनस्थळांना भेटी न देण्याच्या सूचना


पुणे : पुण्यात गेल्या २४ तासांपासून पावसाने हाहाकार (Pune rain) माजवला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या, पूरस्थिती निर्माण झाल्याच्या तर भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी प्रशासन कामाला लागलं आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्याच्या मावळ (Maval) आणि मुळशी (Mulshi) भागातील पर्यटनस्थळे (Tourist points) ५ दिवस बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दोन्ही तालुक्यातील धरण व नदी परिसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मावळ आणि मुळशी तालुक्यातील सर्व धरणांच्या पाण्याच्या पातळीत प्रचंड वाढ झालेली आहे. ओढे यांचा प्रवाह वाढल्याने धबधब्यातील पाणी प्रचंड वेगाने वाहत आहे. त्यामुळे येथील पर्यटनस्थळे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मावळ व मुळशी विभागाचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले यांनी हा निर्णय दिला आहे. २९ जुलैला सकाळी ८ वाजेपर्यंत ही पर्यटनस्थळे बंद राहणार आहेत. या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याच्या सूचना करण्यात आल्या असून धरणपरिसरासह या सर्व ठिकाणी फिरता बंदोबस्त ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


अतिवृष्टीमुळे मावळ आणि मुळशी दोन्ही तालुक्यातील पर्यटनस्थळे, धरणे आणि सभोवतालचा परिसर, नदीपात्र धोकादायक स्थितीत आले आहे. त्यामुळे जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता असल्याने सर्व गर्दीच्या पर्यटन ठिकाणामधील धोकादायक ठिकाणी प्रतिबंधित करणे आवश्यक असल्याचे प्रशासनाने सांगितले.

Comments
Add Comment

उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा व्हॅनिटी व्हॅन टोला

दसऱ्याच्या पवित्र मुहूर्तावर महाराष्ट्राच्या राजकारणात दोन शिवसेनांचे मेळावे झाले. एकनाथ शिंदे यांच्या

सोलापूरच्या चिंचोली एमआयडीसीतील कंपनीला मोठी आग

सोलापूर : चिंचोली एमआयडीसीतील तुळजाई केमिकल्स कंपनीला शुक्रवारी ३ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी आग लागली. आग

हिंसा नव्हे, लोकशाही मार्गच परिवर्तनाचा खरा उपाय - मोहन भागवत

विजयादशमीच्या औचित्याने नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या शताब्दी

केंद्राकडून महाराष्ट्राला ६,४१८ कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता, उपमुख्यमंत्री पवारांकडून आभार

मुंबई : केंद्र सरकारने राज्य सरकारांना कराचे अग्रीम हस्तांतरण केले असून त्यापैकी महाराष्ट्राला ६ हजार ४१८ कोटी

IMD Weather Update : तिहेरी संकट! महाराष्ट्रासह १४ राज्यांवर पावसाचा धोका; IMD कडून 'हाय अलर्ट' जारी

नवी दिल्ली : भारताच्या समुद्र क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा मोठी नैसर्गिक घडामोड झाली असून, एकाच वेळी दोन कमी दाबाचे

Jejuri Dussehra : मर्दानी दसऱ्याची सांगता! फक्त ४ मिनिटांत ९० वेळा फिरवली ४२ किलो वजनाची खंडा तलवार

जेजुरी : कुलदैवत असलेल्या खंडोबाच्या जेजुरी गडावर आज 'खंडा स्पर्धे'ने मर्दानी दसरा उत्सवाची सांगता झाली. या