Electric Bus : इलेक्ट्रिक एसटी बस वेळेत न पुरविणाऱ्या कंपनीकडून प्रवासी उत्पन्नाची वसुली करा!

एस. टी. कर्मचारी श्रीरंग बरगे यांची मागणी


मुंबई : एसटी महामंडळाने (ST Corporation) ५१५० विजेवरील बस (Electric Bus) कंत्राटी पद्धतीने घेण्याचा करार एका कंपनीशी केला असून सदर कंपनी दर महिन्याला २१५ बसेस देणार होती. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते या बसेसचे उद्घाटनही १३ फेब्रुवारी २०२४ रोजी करण्यात आले होते. परंतु मार्च ते जुलै या पाच महिन्यात एकही बस पुरवठादार कंपनीकडून एसटीला मिळाली नाही. त्यामुळे अशा कराराचा भंग करणाऱ्या कंपनीला मलमपट्टी करण्यापेक्षा तिच्यावर मार्च ते जुलै या कालावधीतील बुडालेले प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करण्यात यावे,अशी मागणी महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी केली.


मोठा गाजावाजा करीत करण्यात आलेल्या उद्घाटनाच्या वेळी ज्या २० बस पुरविण्यात आल्या त्यातील आज पर्यंत एकही बस पुरविण्यात आलेली नाही. ही बेपर्वाई असून कंपनीचा पूर्व इतिहास पाहिल्यास ते या पुढे निश्चित केलेल्या गाड्या निर्धारित वेळेत पुरवू शकत नाहीत, असा आरोप बरगे यांनी केला आहे.


चंदा दो, धंदा लो’ या वसुली योजनेतून सदर पुरवठादार कंपनीची मुख्य कंपनी असलेल्या कंपनीने २०२३ पर्यंत ९६६ कोटी रुपयांचे इलेक्ट्रोरल बॉण्ड खरेदी केले. यातील ५८५ कोटी रुपये सत्तेत असलेल्या एका पक्षाला देणगी म्हणून दिले असल्याने एसटीचे व्यवस्थापन सरकारच्या दबावाखाली कारवाई करण्याची हिम्मत दाखवत नाहीत. त्यामुळे आता सर्व सामान्य नागरिकांकडून होणाऱ्या टिकेमुळे या कंपनीला २ कोटी २० लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला असून अपयश आल्याने केलेली ही निव्वळ मलमपट्टी असून मार्च २०२४ ते जुलै २०२४ या कालावधीतील बुडालेले प्रती बस सरासरी दिवसाला १६ हजार रुपये प्रवासी उत्पन्न कंपनीकडून वसूल करण्यात आले पाहिजे, असे बरगे यांनी म्हटले आहे.



कंपनीवर सरकार मेहेरबान


त्याचप्रमाणे २० लाख रपये इतकी सबसीडी प्रत्येक बस मागे सरकार देणार असून 190 कोटी चार्जिंग सेंटर साठी खर्च आहेत. एकूण 172 ठिकाणी चार्जिंग स्टेशन बांधण्यात येणार असून त्यापैकी महावितरण कंपनीला १०० कोटी रुपये इतकी अनामत रक्कम भरण्यात आली आहे. तसेच गाड्या वेळेवर न आल्याने सरकारच्या पैशाचा नाहक अपव्यय होत आहे. त्यामुळे जो पर्यंत निश्चित केलेल्या वेळेत गाड्या येत नाहीत तो पर्यंत चार्जिंग स्टेशनसाठी गुंतवलेल्या रक्कमेचे व्याजही कंत्राटदार कंपनीकडून वसूल करण्यात यावे अशी मागणी देखील बरगे यांनी केली.



प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता


एकंदर सर्व परिस्थिती पाहिली तर महामंडळाकडे प्रवाशांसाठी गाड्या कमी पडत असून त्यांची गैरसोय होत आहे. या शिवाय खिडक्या तुटलेल्या व गळक्या गाड्या मार्गावर पाठवल्याने महामंडळाची बदनामी होत आहे.या सर्व प्रकाराला भाडे तत्वावर ई बस पुरवणारी कंपनी असून सदर कंपनीचे कंत्राट रद्द करण्याची हिम्मत सरकारने दाखवली पाहिजे व एसटीला स्व मालकीच्या नवीन गाड्या घेण्यासाठी निधी देण्यात आला पाहिजे अशी मागणीही बरगे यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Delhi: पार्किंगवरून महिला उपनिरीक्षक आणि वृद्ध व्यक्तीमध्ये वाद, पोलिसांनी काय कारवाई केली?

दिल्ली: दिल्लीतील उत्तर रोहिणी परिसरात पोलीस आणि नागरिकांमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. मिळालेल्या

Delhi Special Cell कडून कुर्ल्यातील १८ वर्षीय तरुणाला अटक; पोलिसांनी उधळला दहशतवादी हल्ल्याचा कट

- टॉय कारच्या माध्यमातून दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट दिल्ली पोलीस स्पेशल सेलकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Cbse Starts Digital Answer Sheet : उत्तरपत्रिका तपासणीत AI ची दणक्यात एंट्री! आता तुमची उत्तरं 'मशीन' वाचणार; CBSE चा नवा बदल वाचा

नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) यंदाच्या १२वीच्या परीक्षांच्या मूल्यांकन प्रक्रियेत एक

Middle East War : मध्यपूर्व युद्ध पुन्हा पेटलं! इराणचा भारताला संपर्क, उच्चस्तरीय चर्चा सुरु

मुंबई : इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष शांत होण्याचे नाव घेत नाहीये. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे

Iran Israel War, Tehran : तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

तेहरान : सोमवारी पहाटे इराणची राजधानी तेहरानच्या दक्षिण-पश्चिम भागातील इस्लामशहरजवळ एका निवासी इमारतीवर

Uttar Pradesh Accident: बोलेरोने मागून उभ्या असलेल्या टँकरला दिली धडक; अपघातात ५ जण ठार, अनेक जण जखमी

उत्तर प्रदेश: उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. सीबीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील