Maharashtra Rain : वरुणराजा आणखी बरसणार! पुढील दोन दिवस महत्त्वाचे

  124

'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने (IMD) सांगितल्याप्रमाणे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलावांच्या व धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अशातच आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार (Heavy Rain Alert) असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट?

रायगड आणि सातारा भागात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यासोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे याठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून