Maharashtra Rain : वरुणराजा आणखी बरसणार! पुढील दोन दिवस महत्त्वाचे

  143

'या' जिल्ह्यांसाठी अलर्ट; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा


मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार (Maharashtra Rain) हजेरी लावली आहे. तर अजूनही अनेक भागात पावसाची रिपरिप सुरुच असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने (IMD) सांगितल्याप्रमाणे सलग तीन दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक तलावांच्या व धरणाच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली आहे. अशातच आणखी काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार (Heavy Rain Alert) असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.


हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पूर्व मध्य प्रदेश आणि छत्तीसगडवरील कमी दाबाचे क्षेत्र विरून गेले असल्यामुळे विदर्भातील पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. परंतु राज्याच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने किनारपट्टी भागात पावसाचा जोर कायम आहे. यामुळे पुढील दोन दिवस राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्याचबरोबर पाणीसाठ्यातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.


कोणत्या जिल्ह्यांना आज अलर्ट?

रायगड आणि सातारा भागात पावसाच्या संततधार कोसळत असल्यामुळे या जिल्ह्यांना हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. त्यासोबत सिंधुदुर्ग, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक भागात मुसळधार पावसाचा अंदाज असल्यामुळे याठिकाणी ऑरेंज अलर्ट दिला असून नंदूरबार, धुळे, जळगाव, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, अमरावती जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

छत्रपती संभाजीनगरला २४x७ शाश्वत पाणीपुरवठ्याचा मार्ग मोकळा; २६ द.ल.ली. जलशुद्धीकरण केंद्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहर पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पुढील २५-३० वर्षे शहराच्या अपेक्षित

मराठा आरक्षणासाठी समितीचे नवीन अध्यक्ष!

मुंबई: भाजपच्या नेतृत्वाखालील 'महायुती' सरकारने जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची मराठा समाजाच्या

दहावीच्या विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकाकडून लैंगिक अत्याचार

जळगाव : दहावीतील विद्यार्थिनीवर स्कूल बसचालकानेच शेतात नेऊन लैंगिक अत्याचार केल्याची घडली. जळगावच्या पाचोरा

निफाडमध्ये चक्क कुत्र्यानेच बिबट्याला नेले फरपटत

निफाड : संपूर्ण तालुक्यात बिबट्याची दहशत असल्याचे नागरिकांना पशुधन सांभाळण्यासाठी जागता पहारा द्यावा लागत आहे.

वसईत विद्यार्थ्याच्या अंगावर खांब कोसळला; सुदैवाने जीव वाचला, घटना सीसीटीव्हीत कैद

वसई शहरातील निष्काळजीपणाचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वसईमध्ये एका शाळकरी विद्यार्थ्याच्या अंगावर जुना

Hinjawadi Accident : बेदरकार मिक्सरने घेतला निष्पाप जीव! हिंजवडीत ११ वर्षीय मुलीचा मृत्यू; चालकासह मालकावरही दाखल केला सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात अवजड वाहनांमुळे होणाऱ्या अपघातांची वाढती संख्या पाहता हिंजवडी पोलिसांनी आता