Indapur News : इंदापूर मार्गावर शेकडो वर्षे जुने वडाचे झाड कोसळले; वाहतूक ठप्प!

  118

पाच तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटविण्यास यश


मुरुड : पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोर धरला असून अजूनही काही भागात मुसळधार पाऊस सुरुच आहे. मात्र अनेक ठिकाणी या पावसाचा जोरदार फटका बसत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाऱ्याच्या वेगासह आलेल्या पावसामुळे काही ठिकाणी इमारतीचा भाग कोसळत आहे तर अनेक ठिकाणी झाडे झुडुपही कोसळल्याच्या घटना घडत आहेत. अशातच आज पहाटे सहाच्या सुमारास मुरुड रोहा इंदापूर (Indapur) मार्गावर भलेमोठे वडाचे झाड (Banyan tree) कोसळल्याची (Collapsed) माहिती मिळत आहे.


मुरुड रोहा इंदापूर मार्गावरील खार आंबोली भागात शेकडो वर्षे जुने असलेले वडाचे झाड कोसळल्याने या मार्गावरून होणारी वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे याठिकाणी रोह्याकडे जाणारी वाहतूक केळघर या पर्यायी मार्गावर तर इंदापूर, माणगाव, म्हसलाकडे जाणारी वाहने राजपुरी मार्गे वळविण्यात आली होती.


दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभाग, मुरुड नगरपरिषद प्रशासन दाखल झाले. तसेच स्थानिक ग्रामस्थ व दोन जेसीपीच्या मदतीने हे भले मोठे वडाचे झाड हटविण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले. जेसीपी व दोन कटर मशिनच्या सहाय्याने अवघ्या पाच तासांच्या प्रयत्नानंतर झाड हटविण्यास यश आले असून दुपारी साडेबाराच्या सुमारास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.

Comments
Add Comment

XI Admission List: अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर, कुठं पाहाल यादी? जाणून घ्या

अकरावी प्रवेशाची यादी दोन दिवसांआधीच जाहीर  मुंबई :   अकरावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी

कोल्हापुरात जुन्या मराठी सिनेमांचं होणार मोफत प्रदर्शन, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची घोषणा...

कोल्हापूर : येणाऱ्या वर्षभरात ‘कलापूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये सांस्कृतिक कार्य विभागाकडून

किनारपट्टीवर 3.8 मीटर उंच लाटा धडकणार, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना...

मुंबई : राज्यात पुढील २४ तासात पुणे घाट, सातारा घाट परिसरात ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून भारतीय राष्ट्रीय महासागर

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या