Sangli Earthquake : सांगलीतील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह (Marathwada) साताऱ्यातील कोयना नगर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता सांगली (Sangli News) परिसरही भूकंपाने (Earthquake) हादरला आहे. आज पहाटे सांगली येथील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. काही सेकंद जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. वारणावती परिसरात झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र पहाटेच्या वेळ संपूर्ण परिसरात निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना


दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने पावसाचा जोर वाढत चालला असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज झालेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे चांदोली धरणाला कोणताही नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

भारत - पाकिस्तान सामन्यावरुन मविआत बेबनाव

नाशिक : आशिया चषक टी २० क्रिकेट स्पर्धेच्या साखळी सामन्यात आज भारत आणि पाकिस्तान दुबईत आमनेसामने असतील. हा सामना

बीएसएनएलची टॉवर उभारण्याची योजना का मंदावली? २,७५१ ऐवजी केवळ ९३० गावांमध्येच टॉवर उभारणार!

बीएसएनएल '४जी' साठी ९३० गावांमध्ये जमीन देण्यास महाराष्ट्र सरकारची मंजुरी मुंबई: ग्रामीण आणि दुर्गम भागांमध्ये

Satara Gazette: जरांगे पाटलांची ती मागणी सुद्धा होणार मान्य, मराठा समाजाला दिलासा!

सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भात सरकारी हालचालींना सुरुवात  मुंबई: मराठा समाजाला आणखीन एक दिलासा देणारी बातमी

'आदिवासींच्या जीवनात ३ वर्षांत आमुलाग्र परिवर्तन घडेल'

यवतमाळ : आदिवासी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र शासनाने महत्वाच्या योजना हाती घेतल्या

साई मंदिरातील प्रसाद, दर्शन, सुरक्षा आता एआयच्या नियंत्रणात

स्मार्ट सुरक्षा प्रणालीमुळे अपप्रवृत्तीला बसणार आळा शिर्डी : श्री साईबाबा संस्थानात भाविकांच्या सुरक्षेसह

परतीचा पाऊस येत आहे रे.. सावधान!

महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा मुंबई: गणपती विसर्जनानंतर अनेक दिवस दडी मारून बसलेला