Sangli Earthquake : सांगलीतील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह (Marathwada) साताऱ्यातील कोयना नगर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता सांगली (Sangli News) परिसरही भूकंपाने (Earthquake) हादरला आहे. आज पहाटे सांगली येथील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. काही सेकंद जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. वारणावती परिसरात झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र पहाटेच्या वेळ संपूर्ण परिसरात निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना


दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने पावसाचा जोर वाढत चालला असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज झालेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे चांदोली धरणाला कोणताही नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

पंढरपूरमध्ये कार्तिकी यात्रेला प्रारंभ, २४ तास दर्शनाची सुविधा!

पंढरपूर : पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भक्तीच्या

नातेवाईकांना भेटण्यासाठी गेलेले मराठवाड्याचे प्राध्यापक येताना पत्नीसह भीषण अपघात दगावले...

पुणे : छत्रपती संभाजीनगरातील पडेगाव परिसरात शनिवारी सायंकाळी घडलेल्या भीषण अपघातात विद्यापीठाचे निवृत्त

पिंपरीत भाजप स्वबळावर लढणार

भाजप-अजित पवार गट आमने-सामने पिंपरी : महायुती सरकारमध्ये सहभागी असलेले राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे

डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांचा फलटण दौरा

सातारा: फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी आतापर्यंत दोन आरोपींना अटक झाली आहे.

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार: फडणवीस

नाशिक : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या व्यासपीठावर मनोज जरांगे येणार का?

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे