Sangli Earthquake : सांगलीतील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

  98

सांगली : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह (Marathwada) साताऱ्यातील कोयना नगर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता सांगली (Sangli News) परिसरही भूकंपाने (Earthquake) हादरला आहे. आज पहाटे सांगली येथील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. काही सेकंद जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. वारणावती परिसरात झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र पहाटेच्या वेळ संपूर्ण परिसरात निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना


दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने पावसाचा जोर वाढत चालला असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज झालेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे चांदोली धरणाला कोणताही नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

ST : राज्यातील सर्वात मोठे स्क्रॅपिंग सेंटर (भंगार केंद्र) एसटीच्या जागेवर उभारले जाणार, 'एसटी'साठी उत्पन्नाचा नवा स्त्रोत...

मुंबई : एसटी विभागीतल जुनी वाहने  स्क्रॅप करून त्याचे सुटे भाग पुन्हा वापरात येणार नाहीत, अशा पद्धतीने त्यांची

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या