Sangli Earthquake : सांगलीतील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के! नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

सांगली : काही दिवसांपूर्वी मराठवाड्यासह (Marathwada) साताऱ्यातील कोयना नगर परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण देखील निर्माण झाले होते. हे प्रकरण ताजे असतानाच आता सांगली (Sangli News) परिसरही भूकंपाने (Earthquake) हादरला आहे. आज पहाटे सांगली येथील चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के बसले. या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच हा भूकंप झाला. काही सेकंद जमीन हादरल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे ४ वाजून ४७ मिनिटांच्या सुमारास चांदोली धरण परिसरात ३ रिश्टर स्केलचा भूकंप झाल्याची माहिती मिळत आहे. वारणावती परिसरात झालेल्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. मात्र पहाटेच्या वेळ संपूर्ण परिसरात निरव शांतता असल्यामुळे हा धक्का परिसरात जाणवला होता. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.



नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना


दरम्यान, मागील काही दिवसापासून सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच असल्याचे दिसून येत आहे. सातत्याने पावसाचा जोर वाढत चालला असून नदी, नाल्यांची पाणीपातळी वाढली आहे. यामुळे पुरजन्य स्थिती निर्माण झाल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच आज झालेला हा भूकंप सौम्य स्वरूपाचा असून यामुळे चांदोली धरणाला कोणताही नसल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Comments
Add Comment

आधी निवडणुकीचा गुलाल, मग मुलाला खांदा; नवनिर्वाचित नगरसेवकावर कोसळला दु:खाचा डोंगर

 बीड: निवडणुकीच्या विजयी गुलालात बापाला खांद्यावर घेऊन नाचला आणि मग बापानेच मुलाला खांदा दिल्याची धक्कादायक

ताडोबातल्या तारा वाघिणीचा पाटणमध्ये मुक्त संचार, नागरिकामध्ये भीतीचं वातावरण

पाटण : सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात एक वाघीण मुक्त संचार करताना आढळली. ही तारा नावाची वाघीण ताडोबा

नागपुरात सकाळी गोळीबाराचा थरार; प्राध्यापकासह तिघे जण जखमी

नागपूर : नागपुरात बुधवारी पहाटेच्या सुमारास गोळीबाराच्या घटनेने खळबळ उडाली आहे. नागपूर जिल्ह्यातील हिंगणा

भीमाशंकरला जाण्याचे नियोजन करत असाल तर थांबा; विकासकामांच्या पार्श्वभूमीवर मंदिर राहणार तीन महिने बंद

पुणे: ज्योतिर्लिंग म्हणजे भारतीयांसाठी फार जवळचा विषय. मात्र तुम्ही जर बारा ज्योतिर्लिंगांचे किंवा भीमाशंकरला

Pankaj Bhoyar : "ठाकरे बंधूंच्या युतीचा मुंबईत काहीही परिणाम होणार नाही"; गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा जालन्यातून टोला

जालना : "आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी कोणाशीही किंवा एकमेकांशी युती केली

Navneet Rana : "हिंदूंनी किमान ३-४ मुलांना जन्म द्यावा"; लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून नवनीत राणांचा 'हुंकार', मौलाना कादरीला सडेतोड उत्तर

अमरावती : लोकसंख्या वाढीच्या मुद्द्यावरून अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी पुन्हा एकदा आक्रमक