Maharashtra Rain : गडचिरोलीत पावसाचा हाहाकार! चौथ्या दिवशीही पूरजन्य स्थिती कायम

अनेक मार्ग बंद; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. यातच हवामान विभागाने (IMD) मागील तीन दिवस दिलेला अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देखील खरा ठरला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले. यातच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अजूनही ती कायम तशीच राहिली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून गडचिरोली विभागात पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतांमध्येही पाणी साचल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच ठेवल्याचे दिसून येत आहे. पाऊस सतत चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


दरम्यान, वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांवर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

आरोग्य समितीच्या अध्यक्षपदी हरिष भांदिर्गे, बाजार - उद्यान समिती अध्यक्षपदी हेतल गाला

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य समिती आणि बाजार व उद्यान समिती अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष

त्र्यंबक-नाशिक कुंभमेळ्यासाठी २२ हजार १८१ कोटी रुपयांच्या कामांना मान्यता

मुंबई: त्र्यंबक- नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळ्याचे आयोजन २०२७ मध्ये करण्यात येत असून या कुंभमेळ्यात

मांजरानं पोपटाचा पिंजरा पाडला, दोन शेजाऱ्यांतला वाद हाणामारीपर्यंत गेला

पुणे : पुणे तिथे काय उणे असं म्हणतात , हे अगदी बरोबर कारण आता तिथे गुन्हेगारीच्याही काही कमतरता उरलेल्या नाही आहेत.

बळजबरीने धर्मांतर केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास; ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य अधिनियम २०२६’मध्ये कठोर तरतुदी

मुंबई: राज्यात गेल्या काही काळापासून प्रलोभने, फसवणूक आणि बळजबरीने होणाऱ्या धर्मांतराच्या घटनांमध्ये वाढ झाली

Ratnagiri: रत्नागिरीत भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीती

रत्नागिरी: कोकणात सध्या अनेक गावात पालखी येते.त्यामुळे कोकणवासियांची कोकणात प्रचंड गर्दी जमली आहे. अनेक

आपले सरकार सेवा केंद्र व्यवस्थापकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; राज्यमंत्री योगेश कदम यांची माहिती

मुंबई: राज्यातील 'आपले सरकार सेवा केंद्र' प्रकल्पात कार्यरत असलेल्या तालुका, जिल्हा आणि ब्लॉक व्यवस्थापकांच्या