Maharashtra Rain : गडचिरोलीत पावसाचा हाहाकार! चौथ्या दिवशीही पूरजन्य स्थिती कायम

अनेक मार्ग बंद; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. यातच हवामान विभागाने (IMD) मागील तीन दिवस दिलेला अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देखील खरा ठरला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले. यातच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अजूनही ती कायम तशीच राहिली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून गडचिरोली विभागात पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतांमध्येही पाणी साचल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच ठेवल्याचे दिसून येत आहे. पाऊस सतत चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


दरम्यान, वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांवर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला; मोबाईलवर बोलत असलेल्या तरुणावर हल्ला, परिसरात भीती

पुणे : जिल्ह्यात बिबट्यांचा वावर झपाट्याने वाढत असून, रात्रीच्या वेळी नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर

सुधीर दळवी यांना शिर्डी संस्थानकडून ११ लाखांची मदत

मुंबई  : १९७७ साली प्रदर्शित झालेल्या ‘शिर्डी के साईबाबा’ या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांनी

अनाथ आरक्षणामुळे ८०० हून अधिक मुले झाली ‘स्वनाथ’

 सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथ मुलांशी साधला संवाद मुंबई : लहान वयात

मतमोजणी २१ डिसेंबरलाच! नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयावर सुप्रीम कोर्टाचा शिक्कामोर्तब

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये

पाच हजार कोटींच्या कांदा घोटाळ्याची चौकशी सुरू

मुंबई  : केंद्र सरकारने किंमत स्थिरीकरण योजनेअंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफला फार्मर प्रोड्युसर कंपन्यांकडून

राज्यातील निवडणूक वादावर आज 'सर्वोच्च' सुनावणी! नागपूर खंडपीठाच्या निर्णयाला स्थगिती मिळणार?

नवी दिल्ली: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. ज्यामध्ये