Maharashtra Rain : गडचिरोलीत पावसाचा हाहाकार! चौथ्या दिवशीही पूरजन्य स्थिती कायम

  93

अनेक मार्ग बंद; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत


गडचिरोली : गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात (Maharashtra Rain) जोरदार हजेरी लावली आहे. यातच हवामान विभागाने (IMD) मागील तीन दिवस दिलेला अतिवृष्टीचा (Heavy Rain) इशारा देखील खरा ठरला आहे. मुंबईसह अनेक जिल्ह्यांत पावसाने धुमाकूळ घातल्याने अनेक रस्त्यांना नदीचे स्वरुप आले असून नागरिकांचे जनजीवन देखील विस्कळीत झाले. यातच गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली होती. अजूनही ती कायम तशीच राहिली असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील तीन दिवसांपासून गडचिरोली विभागात पावसाची संततधार सुरु असल्याने अनेक भागात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच शेतांमध्येही पाणी साचल्यामुळे शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यासोबत जिल्ह्यातून गेलेल्या तीन राष्ट्रीय महामार्गांसह २३ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी अजूनही बंदच ठेवल्याचे दिसून येत आहे. पाऊस सतत चालू असल्यामुळे पाण्याची पातळी कमी होत नाही, यामुळे नागरिक हैराण झाले आहेत.


दरम्यान, वाहतूक बंद असणाऱ्या रस्त्यांवर पोलीस प्रशासनांकडून बॅरिकेट्स देखील लावण्यात आले आहेत. तसेच सलग दुसऱ्या दिवशीही शाळा, महाविद्यालयांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यासोबत गोसेखुर्द धरणाच्या पाण्यामुळे वैनगंगा नदीला पूर आल्याने वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

Comments
Add Comment

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत

Pune Airport: प्रवाशांना घेऊन विमान पुण्यात तर आलं, पण सामान मागेच राहीलं!

स्पाइसजेटच्या दुबई-पुणे विमानाने इंधन भारामुळे प्रवाशांचे सामान न घेताच पुण्यात लँडिंग केले.  पुणे:  दुबईहून