देशभरात पावसाचे धुमशान, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशभरात पाऊस नुसता धुमशान घालत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. याच्यामुळे मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने २३ जुलैला मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा आणि गोवामधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.


पुढील २४ तासांत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिणी राजस्थानात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्वोत्तर भारत, सिक्कीम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल.


याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, अंदमान-निकोबार बेट, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.



राज्यात ही स्थिती


राज्यातही कोकणसह मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Bolivia Plane Crash : बोलीवियात नोटांनी भरलेलं विमान थेट रस्त्यावर कोसळलं; १५ जणांचा जागीच मृत्यू, दुर्घटनेनंतर रस्त्यावर विखुरला पैशांचा खच!

दक्षिण अमेरिकेतील बोलीविया देशातून शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) एक अतिशय भीषण बातमी समोर आली. राजधानी ला पाझजवळील

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर