देशभरात पावसाचे धुमशान, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशभरात पाऊस नुसता धुमशान घालत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. याच्यामुळे मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने २३ जुलैला मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा आणि गोवामधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.


पुढील २४ तासांत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिणी राजस्थानात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्वोत्तर भारत, सिक्कीम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल.


याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, अंदमान-निकोबार बेट, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.



राज्यात ही स्थिती


राज्यातही कोकणसह मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला