देशभरात पावसाचे धुमशान, महाराष्ट्र-गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

नवी दिल्ली: देशभरात पाऊस नुसता धुमशान घालत आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये दमदार पाऊस कोसळत आहे. याच्यामुळे मात्र अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने २३ जुलैला मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र, उत्तराखंड, ओडिशा आणि गोवामधील काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे.


पुढील २४ तासांत छत्तीसगड, तेलंगणा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकचा किनारी भाग आणि दक्षिणी राजस्थानात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर पूर्वोत्तर भारत, सिक्कीम, ओडिशा, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम उत्तर प्रदेशात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळेल.


याशिवाय पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, केरळ, अंदमान-निकोबार बेट, लक्षद्वीप, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल.



राज्यात ही स्थिती


राज्यातही कोकणसह मुंबईत पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. याशिवाय पश्चिम तसेच उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Comments
Add Comment

Rasgulla Fight Cancels Bihar Wedding : रसगुल्ल्यामुळे झाला कुस्ती हल्ला! लग्नात दिसेल ते फेकून मारलं; नवरदेव-नवरीची गाठ पडण्याआधीच पाहुण्यांमध्ये 'डब्ल्यू डब्ल्यू इ'!

बिहार : लग्न समारंभ हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत आनंदाचा आणि संस्मरणीय क्षण असतो. हा क्षण खास

भाडेकरूंना दिलासा! घरभाड्याबाबत नवा निर्णय लवकरच होणार लागू, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: वाढत्या महागाईमुळे घरांच्या किमतीमध्ये सुद्धा लक्षणीय वाढ झाली असल्याने देशातील लाखो लोक

Doctor Death News : युवा डॉक्टरांचे स्वप्न भंगले; भरधाव कारची ट्रकला धडक, वेगामुळे झालेल्या अपघातात चौघांचा दुर्दैवी अंत

उत्तर प्रदेश : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यामध्ये बुधवारी (३ डिसेंबर २०२५) रोजी एक हृदय पिळवटून टाकणारी आणि

८७ बेकायदेशीर 'लोन ॲप'वर कारवाई : केंद्र सरकारची लोकसभेत माहिती

नवी दिल्ली : डिजिटल फसवणुकीचे वाढते प्रमाण आणि अवैध ऑनलाइन कर्ज व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक लूट

आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टी बांधकामात मशि‍दीचा अडथळा

कोलकाता: सर्वाधिक व्यस्त विमानतळांपैकी एक असणाऱ्या कोलकात्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ

रेल्वेचा नवीन नियम लागू; आता खिडकीवर तिकीट खरेदी करताना सुद्धा लागणार 'ओटीपी'

मुंबई: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. भारतीय रेल्वेने तात्काळ तिकीट बुकिंगच्या