Marathi comedy show : अवघ्या तीन महिन्यांत 'हसताय ना हसायलाच पाहिजे' कार्यक्रम पडणार बंद!


मुंबई : मराठी वाहिन्यांवरील कॉमेडी शो (Marathi comedy show) प्रेक्षक आवडीने पाहतात. मात्र, हल्लीच्या काळात सर्वच वाहन्यांवर आलेल्या नवनव्या कॉमेडी शोजमध्ये टीआरपीसाठी (TRP) चढाओढ सुरु झाली आहे. त्यात प्रेक्षक टिकवून ठेवण्यासाठी प्रचंड कसरत करावी लागत आहे. कलर्स मराठी वाहिनीने (Colors marathi) देखील या स्पर्धेत उतरुन टॉपच्या विनोदी कलाकारांची निवड करत नवा कॉमेडी शो 'हसताय ना हसायलाच पाहिजे' (Hastay na hasaylach pahije) प्रेक्षकांच्या भेटीला आणला. या कार्यक्रमातून निलेश साबळे (Nilesh Sable), भाऊ कदम (Bhau Kadam) आणि ओंकार भोजने (Onkar Bhojane) हे कलाकार प्रेक्षकांना हसवत होते. मात्र, आता अवघ्या तीन महिन्यांतच हा कार्यक्रम प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.





निलेश साबळे सूत्रसंचालन करत असलेल्या आणि अनेक तगड्या मराठी विनोदवीरांची फौज असलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कॉमेडी शोने एक काळ गाजवला होता. मात्र, नंतरच्या काळात त्याला उतरती कळा लागली. हा शो बंद झाला आणि काही दिवसांतच कलर्स मराठीवर त्याच धाटणीचा 'हसताय ना हसायलाच पाहिजे' हा शो सुरु झाला. सुरुवातीला फारसं नावीन्य नसल्याने प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला तितकीशी पसंती दाखवली नाही. मात्र, हल्ली हळूहळू प्रेक्षकसंख्येत वाढ होऊ लागली होती. असं असतानाही अपेक्षित टीआरपी न मिळाल्यामुळे तसेच बिग बॉसचा पाचवा सीझन सुरु (Bigg Boss marathi season 5) होत असल्यामुळे हा कार्यक्रम अवघ्या तीन महिन्यांतच बंद होणार आहे.





हसताय ना हसायलाच पाहिजे हा कार्यक्रम २४ एप्रिल रोजी सुरु झाला होता. या कार्यक्रमाचं हे पहिलं पर्व होतं आणि लवकरच दुसरं पर्व प्रेक्षकांच्या भेटीला येईल असंही सांगितलं जात आहे. 'बिग बॉस मराठी ५' संपल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जोमाने या कार्यक्रमाचं दुसरं पर्व सुरू करण्यात येणार आहे. मात्र आता हा कार्यक्रम लवकर बंद केल्याने चाहतेही वाहिनीवर नाराज आहेत. कार्यक्रमाला किमान थोडा वेळ मिळायला हवा होता असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. तर दुसरीकडे प्रेक्षक 'बिग बॉस मराठी ५' साठी उत्सुक आहेत.


Comments
Add Comment

महाविकास आघाडीचे आक्षेप निवडणूक आयोगाने फेटाळले

मतदारयाद्या सदोष मुद्द्यांवर तपशीलवार खुलासा मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या

दादरमधील वाढत्या फटाक्यांच्या दुकानांना कुणाचे अभय? दुकानदारांसह नागरिकांचा जीव धोक्यात

मुंबई (खास प्रतिनिधी) : दीपावलीच्या सणा निमित्त केल्या जाणाऱ्या आतषबाजींकरता मुंबईतील काही प्रमुख दुकानांमध्ये

मालाड पूर्वेत भीषण आग! लाकडी गोदामात लागलेल्या आगीने घेतले रौद्ररूप: नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

मुंबई : मुंबईतील वर्दळीच्या आणि दाट लोकवस्ती असलेल्या मालाड पूर्व भागात आज दुपारी भीषण आगीची घटना घडली.

महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण, आयुक्तांनी दिले असे आदेश..

मुंबई (खास प्रतिनिधी) : मुंबईतील प्रमुख श्रद्धास्थानांपैकी एक असलेल्या महालक्ष्मी मंदिर परिसराचे सुशोभीकरण व

ट्रेन तिकीट बुकिंगमध्ये तांत्रिक बिघाड, पेमेंट अडकले? रिफंडसाठी ‘ही’ पद्धत अवलंबा.

दिवाळीसाठी रेल्वेने गावी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसला आहे. इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम

फटाक्यांच्या दरात २० टक्क्यांनी वाढ

मुंबई  : दिवाळीचा सण अगदीच एक-दोन दिवसांवर आला असताना यंदा देशभरातील बाजारात फटाक्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे.