Maharshtra Rain : आजही मुसळणार! हवामान विभागाचा रेड अलर्ट


मुंबई : दोन दिवसाच्या अतिवृष्टीनंतर (Heavy Rain) पावसाने आज पहाटेपासून काहीशी विश्रांती घेतली आहे. मात्र अजूनही काही भागात पावसाची रिपरिप सुरूच असल्याचे पाहायला मिळत आहे. ही रिपरिप येत्या २४ तासात आणखी जोर पकडणार असून महाराष्ट्रासह काही राज्यात अतिमुसळधार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाने (IMD) दिला आहे.




हवामान विभागाने देशातील महाराष्ट्र, उत्तराखंड, गुजरात, गोवा आणि छत्तीगड या पाच राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला असून रेड अलर्ट (Red Alert) देखील जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडावे, असे आवाहन देखील केले आहे.


याशिवाय मध्य आणि पश्चिम भारतातील अनेक भागातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. या भागात हवामान खात्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट (Weather Update Orange Alert) जारी केला आहे. तसेच महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठा वाढला असल्याने अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.


महाराष्ट्रात कुठे कोसळणार पावसाच्या धारा ?


हवामान विभागाने महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, ठाणे, पालघर तसेच रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज दिला आहे. तर विदर्भातील अमरावती, नागपूर, भंडारा, अकोला, चंद्रपूर, गोंदिया आणि वाशिम जिल्ह्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलाय.


पुढील तीन दिवस या भागात मुसळधार पावसाचा अंदाज


हवामान विभागाने महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज म्हणजेच सर्व शहरांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्याचबरोबर रायगडमध्ये २१-२३ जुलैपर्यंत, रत्नागिरीत २१ आणि २२ जुलैला रेड देण्यात आला. तर २२ जुलै रोजी सिंधुदुर्गात मुसळधार पावसाचा अंदाज दिला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

रायगड : मुंबई-पुणे महामार्गावर बुधवारी सकाळी भीषण अपघात घडून तिघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत एकूण पाच

लातूर जिल्ह्यात काढणीच्या तोंडावर पाऊस; शेतकरी चिंतेत

लातूर : दोन तीन दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला होता. अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने नुकताच जाहीर केला

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी घेतले छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन

पुणे : छत्रपती संभाजी महाराज यांच्या ३३७ व्या बलिदान स्मरणदिनानिमित्त राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि पुणे

सातारा येथे २२ मार्चला चतुर्थ ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद'

मंदिर-संस्कृतीच्या रक्षणार्थ एक हजारांहून अधिक मंदिर प्रतिनिधींची उपस्थिती सातारा : लाखो वर्षांपासून हिंदु

पाणी समजून प्यायलं थिनर; चार वर्षांच्या चिमुकल्याच्या तोंडापासून ते पोटापर्यंत...

ठाणे : ठाण्याच्या इंदिरानगरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकल्याने चुकून पाणी समजून

मराठमोळ्या मुलीशी लग्न करुन आता पत्नीला बुरख्यातच ठेवतो; म्हणाल्या, पुरुष स्त्रियांकडे...

मुंबई: प्रसिद्ध युट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अदनान शेख सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत