IT Sector Working Hours : आता कर्मचाऱ्यांना करावं लागणार १४ तास काम! आयटी कंपनीने घेतला मोठा निर्णय


मुंबई : प्रत्येक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ ८ तासांचा असतो. तर काही ठिकाणी जास्तीत जास्त १० तास कामाचा कालावधी असतो. मात्र आता आयटी (IT) कर्मचाऱ्यांना चक्क १४ तास काम करावे लागणार आहे. आयटी कंपनीने कामात आणखी सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा कामाचा वेळ १४ तास (14 Hours Working) करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत कंपनीने कर्नाटक सरकारला (Karnataka Government) प्रस्ताव पाठवला असून सरकार याचा निर्णय घेणार आहे. मात्र कंपनीच्या या निर्णयाला कर्मचाऱ्यांनी निषेध केला असून नाराजीचा सूर मारला आहे.





मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार कर्नाटक शॉप्स अँड कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट्स ऍक्ट, १९६१मध्ये सुधारणा करण्याचा विचार केला आहे. ज्यामध्ये आयटी कंपन्यांना त्यांच्या प्रस्तावाचा दुरुस्तीमध्ये समावेश करायचा आहे. त्यामुळे कायदेशीररित्या कर्मचाऱ्यांचे कामाचे तास १४ तासांपर्यंत वाढवले ​​जातील असे म्हटले आहे. यामध्ये १२ तास आणि २ तास ओव्हरटाइम अशा शिफ्टचा समावेश असेल.





आयटी कंपनीने प्रस्तावात काय म्हटले





आयटी सेक्टरने कामगार कायद्यासाठी पाठवलेल्या नवीन प्रस्तावात म्हटले आहे की, 'IT/ITeS/BPO क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिवसातून १२ तासांपेक्षा जास्त आणि सतत तीन महिन्यांत १२५ तासांपेक्षा जास्त काम करण्याची आवश्यकता असल्याने त्यासंदर्भात परवानगी दिली जाऊ शकते'. याबाबत सरकारने प्राथमिक बैठक घेतली असून लवकरच पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती मिळत आहे.





कर्मचाऱ्यांचा तीव्र संताप





कामाचे तास वाढवण्याच्या निर्णयाबाबत कर्नाटक राज्य आयटी आणि आयटीईएस एम्प्लॉईज युनियनकडून (KITU) विरोध करण्यात आला आहे. 'कामाचे तास वाढवल्यास शिफ्टवर परिणाम होईल. कामगारांच्या शिफ्टची संख्या कमी झाल्यामुळे एक तृतीयांश कर्मचारी बेरोजगार होतील. यामुळे कंपन्यांना सध्या अस्तित्वात असलेल्या तीन शिफ्ट प्रणालीऐवजी दोन शिफ्ट कराव्या लागली आणि यामुळे एक तृतीयांश कर्मचारी कामावरुन काढले जातील', असे युनियनने म्हटले आहे.


Comments
Add Comment

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

India Slam Pakistan at UN : 'खोट्या गोष्टी पसरवण्याची पाकिस्तानला सवय', संयुक्त राष्ट्रात काश्मीर प्रश्नावर भारताची स्पष्ट भूमिका

नवी दिल्ली : भारताने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रांमध्ये (UN) त्याची खरी जागा पुन्हा एकदा दाखवून दिली आहे. जम्मू आणि

Cockroach Janta Party : नावात 'कॉकरोच' पण दिल्लीच्या उन्हात निघाली हवा! 'VIP' नेते सौरव दास यांचा सरंजामशाही चेहरा उघडा

नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत एकीकडे 'नीट २०२६' (NEET 2026) परीक्षेतील गैरव्यवहाराविरोधात विद्यार्थ्यांचा आक्रोश

KCET UGCET निकाल २०२६ जाहीर : यंदाच्या निकालात विद्यार्थिनींचा डंका; मुलांपेक्षा तब्बल ४१ हजार अधिक मुलींची परीक्षेला उपस्थिती

बंगळुरू : कर्नाटक परीक्षा प्राधिकरणाकडून (KEA) घेण्यात आलेल्या बहुचर्चित 'कर्नाटक सामायिक प्रवेश परीक्षेचा' (KCET UGCET 2026)

Punjab Accident: एका क्षणात होत्याचं नव्हतं; अस्थी विसर्जनासाठी निघालेल्या कुटुंबाचा भीषण अपघात, ९ जण जागीच ठार

पंजाब : पंजाबमधील फिरोजपूर येथे शनिवारी सकाळी झालेल्या भीषण रस्ता अपघातात (Road Accident) ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर

Ludhiana Blast : रेल्वे स्थानकावर अचानक भीषण स्फोटाचा आवाज! लुधियाना स्टेशनवर खळबळ; सुरक्षा यंत्रणा सतर्क

लुधियाना : पंजाबमधील लुधियाना रेल्वे स्थानक शुक्रवारी (५ जून) सकाळी झालेल्या एका रहस्यमय स्फोटामुळे हादरून गेले.