Mumbai Rain : सानपाडामधील भुयारी मार्गात पाणी तुंबले! वाहनचालकांचे प्रचंड हाल

मुंबई : मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने (Mumbai Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना त्यातून पायवाट शोधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचाही मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. सानपाडामधील (Sanpada) भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणात पाऊसपाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडामधील भुयारी मार्गात ४ फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब होत असल्याने काहीकाळासाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे भर पावसात या ठिकाणी आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

Rain Update : मुंबईसह राज्यात मुसळधार पावसाचा धुमाकूळ

मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याचं पाहायला मिळालं.मुंबई,

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे