Mumbai Rain : सानपाडामधील भुयारी मार्गात पाणी तुंबले! वाहनचालकांचे प्रचंड हाल

  117

मुंबई : मुंबईमध्ये आज पहाटेपासूनच पावसाने (Mumbai Rain) चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक सखल भागात पाणी साचले असून नागरिकांना त्यातून पायवाट शोधून काढण्यासाठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर वाहनचालकांचाही मनस्ताप झाल्याचे पाहायला मिळत आहे. सानपाडामधील (Sanpada) भुयारी मार्गातही मोठ्या प्रमाणात पाऊसपाणी साचल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, सानपाडामधील भुयारी मार्गात ४ फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. नागरिकांना देखील या पाण्यातून प्रवास करताना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने हे पाणी काढण्यासाठी देखील विलंब होत असल्याने काहीकाळासाठी हा मार्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहनचालकांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे. त्यामुळे भर पावसात या ठिकाणी आणखी वाहतूक कोंडी होण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

Comments
Add Comment

मुंबईत भाजपा घेणार वॉर्डनिहाय आढावा, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांची घोषणा...

मुंबई : आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका लक्षात घेता निवडणुकीत भाजपाला अपेक्षत यश मिळवण्याच्या दृष्टीने

पाणी चिंता मिटली ! मुंबईकरांच्या धरणात किती टक्के पाणीसाठा?

मुंबई :  मे आणि जून महिन्यात जास्त पाऊस पडल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांमधील पाणीसाठ्यात

वरळी येथे अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृत्यू

मुंबई : वरळीतील हाजी अली जवळच्या लोटस जेट्टीवर शनिवारी अस्थी विसर्जनासाठी गेलेले तीन व्यक्ती समुद्रात बुडाले.

Police Officers Transfer: महाराष्ट्रात ५१ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणत्या पोलिस अधिकाऱ्यांना मिळाली महत्वाची जबाबदारी...

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने (Home Department) ५१ भारतीय सेवा अधिकारी (IPS) आणि ८१ राज्य पोलिस सेवा

अभिनेत्री निशा रावलने सांगितला पती करण मेहराकडून झालेला संतापजनक छळ

मुंबई : अभिनेत्री निशा रावलने तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेता करण मेहरा

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.