Mumbai news : मुसळधार पावसाचा फटका! ग्रँट रोडमधील इमारतीचा काही भाग कोसळला

एका महिलेचा मृत्यू, तीनजण जखमी तर अनेकजण अडकल्याची माहिती


मुंबई : मुंबईसह राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटिंग (Heavy rainfdall) सुरु आहे. मात्र, पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर दुसरीकडे मुंबईच्या ग्रँट रोडमधील (Grant Road) नाना चौकात रुबिनिसा मंझिल या इमारतीचा काही भाग कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. अनेकजण इमारतीमध्ये अडकल्याची माहिती आहे. तर एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, ग्राउंड प्लस चार मजली इमारतीच्या बाल्कनी कोसळल्या. इमारत जुनी असून काही भाग सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोसळला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या होत्या तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा घटनास्थळी आले होते. जवळपास ४० जण आत अडकल्याची माहिती आहे तर काहींना बाहेर काढण्यात आले आहे. सध्या बचावकार्य सुरु आहे. मात्र, इमारतीचा आणखी काही भाग कोसळण्याची शक्यता आहे.


'एका तासाच्या आत सर्वजणांना बाहेर काढले जाईल. प्रशासनाने इमारतीला धोकादायक जाहीर केलं होतं. पण, काही लोक तेथेच राहिले होते. आतापर्यंत जीविनहानीची माहिती नाही. पण, काहीजण जखमी झाले आहेत. युद्धपातळीवर अग्निशमन दलाचे जवान जखमींना बाहेर काढण्याचं काम करत आहेत', असं मंगलप्रभात लोढा म्हणाले.

Comments
Add Comment

एक महिन्यात बोगस जन्मदाखले ताब्यात घ्या; डॉक्टर आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करा

नवनिर्वाचित महापौरांनी पहिल्याच बैठकीत बांग्लादेशी विरोधात ऍक्शन मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईमध्ये बोगस

मुंबईत आता फेरीवाल्यांची झाडाझडती

महापौरांच्या निर्देशानुसार फेरीवाल्यांचे ओळखपत्रे आणि कागदपत्रे तपासणार मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील

मुंबई महापालिकेचे सभागृह सुरु होणार घड्याळाच्या काट्यावरच

मुंबई (सचिन धानजी) : मुंबई महापालिकेचे सभागृह उबाठाच्या काळात निश्चित केलेल्या वेळेपेक्षा दीड ते दोन तास उशिराने

महाराष्ट्रातून थंडी जाणार पण काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडणार, कसं असेल हवामान ?

मुंबई : महाराष्ट्रातून थंडी गाशा गुंडाळण्याच्या तयारीत दिसत आहे. पण राज्यातील निवडक जिल्ह्यांमध्ये पावसाची

कांजूरमार्ग येथे पादचारी पुलाच्या गर्डरच्या कामासाठी ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेने शनिवारी आणि रविवारी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. मध्य रेल्वेच्या कांजूर रेल्वे

मत्स्यव्यवसाय विभागाचा ‘हाय-टेक’ कॅप्टन; प्रशासनात गतिमानता, पारदर्शकता आणि मच्छीमारांच्या जीवनमानातील सुधारणेसाठी प्रयत्न

मुंबई (सुहास शेलार) : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक आणि धडाकेबाज शैलीसाठी ओळखले जाणारे मंत्री नितेश