Solapur Accident : भीषण अपघात! चालकाला अचानक फिट आल्याने भरधाव बस उलटली

थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव


सोलापूर : परिवहन महामंडळाच्या बसला लाल परी (ST Bus) म्हणून लाखो नागरिक तिला हक्काची पसंती देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी बसच्या अपघाताचे (ST Bus Accident) सत्र वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच सोलापूरमधूनही (Solapur News) अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये एसटी चालकाला अचानक फिट आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. फिट आल्याने भरधाव वेगात असणारी बस पलटी होऊन रस्त्याखाली जावून कोसळल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना हा अपघात झाला. एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. आज सकाळी कुर्डूवाडी डेपोची बस ही वैरागवरुन स्वारगेटकडे जात असताना चालकाला फिट आल्याने पिंपळनेरजवळ दुर्घटना घडली. चालकाला फिट येऊन गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्याकडेला एका शेतात जावून कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून चालकाला केबिनवरच सीपीआर दिल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, एसटी बस अपघातात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा या बस अपघातांना बसची दुरावस्था कारणीभूत असल्याचेही दिसून येते. तर पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसचा आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.

Comments
Add Comment

Intelligence Bureau : पालघरमध्ये 'इंटेलिजन्स ब्युरो'साठी हक्काची जागा

- महसूल विभागाचा मोठा निर्णय; वसईत कार्यालय आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा मुंबई : पालघर जिल्ह्याच्या

Cyclone Shelter Center in Dapoli : दापोली तालुक्यातील चक्रीवादळ निवारा केंद्रासाठी महसूलकडून विनामूल्य जागा

मुंबई : कोकण किनारपट्टीवरील आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला

Onion processing industry: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी कांदा प्रक्रिया उद्योगास चालना देणार - मंत्री जयकुमार रावल

मुंबई : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा दरातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळून स्पर्धात्मक दर मिळावा,

Industries Minister Dr. Uday Samant : पांढरकवडा येथे 86 हेक्टरवर नवीन औद्योगिक क्षेत्र स्थापनेला गती - उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यात औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी केळापूर तालुक्यातील मौजे

Industries Minister Dr. Uday Samant - 'एमआयडीसी’कडे लवकरच हस्तांतरित करणार : उद्योग मंत्री डॉ.उदय सामंत

मुंबई : धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील विखरन येथील 250 मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित जमिनीपैकी

Ashok Kharat : 'लक्ष्मण' ते भोंदूबाबा 'अशोक खरात'; ४० वर्षांपूर्वीच गावकऱ्यांनी दिला होता बेदम चोप!

अहिल्यानगर : महिलांच्या लैंगिक शोषणाप्रकरणी सध्या तुरुंगात असलेल्या अशोक खरात याच्या कृत्यांची मुळं चाळीस