Solapur Accident : भीषण अपघात! चालकाला अचानक फिट आल्याने भरधाव बस उलटली

  135

थोडक्यात वाचला प्रवाशांचा जीव


सोलापूर : परिवहन महामंडळाच्या बसला लाल परी (ST Bus) म्हणून लाखो नागरिक तिला हक्काची पसंती देतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून एसटी बसच्या अपघाताचे (ST Bus Accident) सत्र वाढल्याचे दिसून येत आहे. अशातच सोलापूरमधूनही (Solapur News) अशीच एक घटना घडल्याचे समोर आले आहे. सोलापूरमध्ये एसटी चालकाला अचानक फिट आल्यामुळे भीषण अपघात झाला आहे. फिट आल्याने भरधाव वेगात असणारी बस पलटी होऊन रस्त्याखाली जावून कोसळल्याची माहिती मिळत आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरीही या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, टेंभुर्णीवरून कुर्डूवाडीला जात असताना हा अपघात झाला. एसटीमध्ये ३५ ते ४० प्रवासी होते. आज सकाळी कुर्डूवाडी डेपोची बस ही वैरागवरुन स्वारगेटकडे जात असताना चालकाला फिट आल्याने पिंपळनेरजवळ दुर्घटना घडली. चालकाला फिट येऊन गाडीवरचे नियंत्रण सुटल्यामुळे ही बस रस्त्याकडेला एका शेतात जावून कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांनी बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. मात्र अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना कुर्डूवाडी शासकीय रुग्णालयात दाखल केले असून चालकाला केबिनवरच सीपीआर दिल्याची माहिती मिळत आहे.


दरम्यान, एसटी बस अपघातात वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनेकदा या बस अपघातांना बसची दुरावस्था कारणीभूत असल्याचेही दिसून येते. तर पावसाळ्यात चक्क बसच्या टपांमधून पाणी गळत असल्याचे व्हिडिओही समोर आले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धावणाऱ्या बसचा आणि बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा यानिमित्ताने पुढे आला आहे.

Comments
Add Comment

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक

Chandrashekhar Bawankule: मर्सिडीजमधून फिरणाऱ्या, आणि फार्म हाऊसवाल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही; महसूलमंत्री बावनकुळे स्पष्टच बोलले

अमरावती: राज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी जोर धरत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या

ST : विना तिकिट प्रवास करणाऱ्यांवर कारवाई, एसटीने वसूल केला ३ लाखांचा दंड...

पुणे : विना तिकिट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यासाठी सुरवात केली आहे. २०२४-२०२५ या

Samruddhi Mahamarg Accident : समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, आलिशान मर्सिडीजने ३ वेळा पलटी घेतली अन्...;

नाशिकच्या प्रसिद्ध उद्योजकाचा मृत्यू नागपूर : समृद्धी महामार्गावर (Samruddhi Mahamarg) भीषण अपघाताची (Accident News) आणखी एक घटना

Pandharpur Vitthal Mandir: आषाढी वारीनिमित्त विठुरायाचं आजपासून २४ तास दर्शन सुरू

पंढरपूर: पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव असतो. या वारीत