Hardik-Natasa : आधी प्रेग्नंसी, मग ३ लग्न...अशी होती हार्दिक-नताशाची लव्हस्टोरी

  124

मुंबई: हार्दिक पांड्या(Hardik pandya) आणि नताशा(natasa) का वेगळे झाले याचे कारण समोर आले नाही मात्र अभिनेत्रीने मुलासोबत आपल्या माहेरी गेल्यानंतर चाहत्यांसमोर स्पष्ट केले की आता त्यांच्यात कोणतेही नाते राहिलेले नाही.


नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट त्यांच्या चाहत्यांसाठी जितका शॉकिंग आहे तितकेच धक्कादायक त्यांचे लग्नही होते. हार्दिक आणि नताशा यांची पहिली भेट मुंबईच्या नाईट क्लबमध्ये २०१८मध्ये झाली होती. येथून त्यांची मैत्री सुरू झाली. नताशाला तेव्हा माहीत नव्हते की हार्दिक क्रिकेटर आहे.


पहिल्या भेटीतच हार्दिक नताशाच्या प्रेमात पडला. या भेटीनंतर हार्दिकने नताशाला आपल्या वाढदिवसाला बोलावले. ही पहिलीच वेळ होती जेव्हा दोघेही एकत्र दिसले. हार्दिकने खुद्द याची कहाणी सांगितली होती. तो म्हणाला होता, नताशाला काहीच आयडिया नव्हती की मी कोण आहे. आम्ही एकमेकांशी बोललो आणि हळू हळू जवळ येत गेलो.


त्यानंतर हार्दिक आणि नताशा अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र दिसत होते. २०२०च्या आधी कधीही दोघांनी उघडपणे आपल्या नात्याचा खुलासा केला नाही. हार्दिकला वाटले की नताशा योग्य व्यक्ती आहे जिच्यासोबत तो आपले आयुष्य घालवू शकतो. यानंतर २०२०मध्ये फिल्मी स्टाईलमध्ये त्याने तिला प्रपोज केले होते.





यातच कोरोनामुळे लॉकडाऊनची घोषणा झाली आणि एक दिवस अचानक दोघांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना हैराण केले. २०२०मध्ये या जोडप्याने कोर्ट मॅरेज केले आणि काही दिवसांनी समजले की नताशा प्रेग्नंट आहे. अभिनेत्री प्रेग्नंट असल्याच्या बातमी ते पुन्हा चर्चेत आले. खरंतर चर्चा अशी सुरू झाली की अभिनेत्री लग्नाआधीच प्रेग्नंट होती. यामुळेच तिला घाई घाईत लग्न करावे लागले.


जुलै २०२०मध्ये हार्दिक आणि नताशाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्याचे नाव अगस्त्य आहे. मुलाच्या जन्माच्या तीन वर्षानंतर २०२३मध्ये हार्दिक आणि नताशाने पुन्हा लग्नाचा निर्णय घेतला. दोघांनी आधी हिंदू परंपरेनुसार आणि त्यानंतर ख्रिश्चन रितिरिवाजानुसार लग्न केले.

Comments
Add Comment

सकाळी उठल्यावर वॉलपेपर लावले Believe आणि ठरवले देशासाठी जिंकायचे, ओव्हल विजयानंतर सिराजची प्रतिक्रिया

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या ओव्हल कसोटीत भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या

IND vs ENG : चक दे इंडिया! ओव्हल कसोटीत टीम इंडियाने रचले अनेक विक्रम, इतिहासात होईल नोंद

लंडन: लंडनच्या ओव्हल मैदानावर पाचव्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने केवळ इंग्लंडला पराभूतच केले नाही तर अनेक

उत्कंठावर्धक सामन्यात मोहम्मद सिराजनं तारलं

लंडन : केनिंग्टन ओव्हल स्टेडियममध्ये रंगलेल्या भारत - इंग्लंड कसोटी सामन्यात भारत जिंकला. या उत्कंठावर्धक

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट