Road Pits : रस्त्यांची झाली चाळण; वाहनचालक हैराण

वाडा : वाडा तालुक्यातील कोंढले-म्हसवल-खैरे रस्ता हा अनेक गावांना मुख्य बाजारपेठेस जोडणाऱ्या रस्त्याची अक्षरश: चाळण झाली आहे. रस्त्यावर मीठमोठे खड्डे पडले असून या रस्त्यावर वाहन चालवणे जिकिरीचे व कठीण होऊन बसल्याने वाहनचालक हैराण झाले आहेत. वाडा तालुक्यातील सर्वात खराब मार्ग म्हणून या रस्त्याची ओळख निर्माण झाली आहे. या खराब रस्त्यासंदर्भात वारंवार तक्रारी करून देखील सबंधित अधिकारी या रस्त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचा आरोप भाजपा महीला आघाडीच्या तालुका अध्यक्षा अंकिता दुबेले यांनी केला आहे. या रस्त्यावरील सापरोंडे ते दिनकरपाडा दरम्यान काँक्रीट मार्ग करण्यात आला आहे.


मात्र निकृष्ट दर्जामुळे तोही दुभंगला गेला आहे. दिनकरपाडा रस्त्यावर खड्डे पडले असून वाहनचालक आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करीत आहेत. चंद्रपाडा व पुढे खैरे गावाकडे जाणारा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बनविण्यात आला होता. मात्र बनविल्यापासूनच या मार्गाची अवस्था गंभीर असल्याने लोकांच्या नशिबात सहा महिनेही चांगला प्रवास आला नाही.

Comments
Add Comment

Mumbai-Goa Highway Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भीषण दुर्घटना! गोव्याहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला; ३ जणांचा जागीच मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पुन्हा एकदा भीषण अपघात झाला असून गोव्याहून मुंबईकडे परतणाऱ्या एका कुटुंबावर

जयंत पाटील, तटकरे आणि प्रफुल्ल पटेल मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर

मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अनपेक्षित बातमी समोर आली असून, शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील हे

'होय मीच माझ्या पत्नीचा खून केलाय'....; सायको पती मृतदेहासोबत थेट पोलीस ठाण्यात

समृध्दी महामार्गावर पत्नीची हत्या करून आरोपी पती पोहचला थेट पोलीस ठाण्यात वाशिम : समृद्धी महामार्गावर ( Samruddhi Mahamarg)

Dashavatar : दशावतार कलाकार सर्वेक्षणासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष नोंदणी मोहीम

- जिल्ह्यातील आठही तालुक्यांमध्ये पंचायत समिती आणि तहसील कार्यालयात विशेष कक्ष मुंबई : महाराष्ट्राच्या समृद्ध

Sunetra Pawar : सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड घटनेनुसारच!

- प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे; सच्चिदानंद सिंह यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करणार मुंबई : राष्ट्रवादी

Farmer Loan Waiver : ऐतिहासिक कर्जमाफीबद्दल 15 जुलैला मुख्यमंत्री फडणवीसांचा शेतकऱ्यांकडून जाहीर सत्कार

मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू