Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसाठी गुड न्यूज, टीम इंडियात मिळाली संधी

  111

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता तो वनडे संघाचा भाग झाला आहे. यासोबतच बीसीसीआय त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टही देऊ शकते.


श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच बीसीसीआय लवकरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू शकते. अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. तो टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. अय्यरने या दौऱ्यात एकच वनडे सामना खेळला होता आणि ५२ धावा केल्या होत्या. दरम्यान तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.


श्रेयस अय्यरचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिल्यास त्याने आतापर्यंत ५९ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी २३८३ धावा केल्यात. अय्यरने ५ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट वनडे स्कोर १२८ इतका आहे. अय्यरने भारतासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान ८ अर्धशतक लगावले.

Comments
Add Comment

IND vs ENG: चौथ्या दिवसाचा खेळ संपला, इंग्लंडला विजयासाठी हव्यात ३५ धावा, भारताला चमत्कार वाचवणार का?

लंडन: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचव्या कसोटी सामन्याचा चौथ्या दिवशीचा खेळ संपला आहे. चौथ्या दिवशी पावसामुळे

यशस्वी जायसवालने शतक ठोकत रवी शास्त्रींना टाकले मागे, टीम इंडियानेही रचला खास विक्रम!

लंडन: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात युवा सलामीवीर यशस्वी जायसवालने पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची

India vs England 5th Test: ओव्हल कसोटीत भारताने इंग्लंडला दिले ३७४ धावांचे लक्ष्य, सुंदरची 'सुंदर' खेळी

India vs England 5th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी २०२५ चा शेवटचा कसोटी सामना लंडनमधील ओव्हल क्रिकेट

"आम्ही पुन्हा प्रयत्न करत आहोत" सायना नेहवाल आणि पी. कश्यपच्या नात्यात यु टर्न

नवी दिल्ली: बॅडमिंटनपटू सायना नेहवाल (Saina Nehwal) आणि पारुपल्ली कश्यप (Parupalli Kashyap) या दोघांच्या नात्यात पुन्हा एकदा गोडवा

जसप्रीत बुमराहच्या आशिया कप खेळण्यावर प्रश्नचिन्ह

नवी दिल्ली:  आशिया कप २०२५ पुढील महिन्यात खेळवला जाणार आहे आणि चाहते या स्पर्धेबद्दल खूप उत्सुक आहेत. पण

ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुखला शासनाकडून ३ कोटींचे बक्षीस, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सत्कार

नागपूर: महाराष्ट्राच्या दिव्या देशमुखने फिडे महिला बुद्धीबळ विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यामुळे, महाराष्ट्र