Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसाठी गुड न्यूज, टीम इंडियात मिळाली संधी

  99

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता तो वनडे संघाचा भाग झाला आहे. यासोबतच बीसीसीआय त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टही देऊ शकते.


श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच बीसीसीआय लवकरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू शकते. अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. तो टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. अय्यरने या दौऱ्यात एकच वनडे सामना खेळला होता आणि ५२ धावा केल्या होत्या. दरम्यान तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.


श्रेयस अय्यरचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिल्यास त्याने आतापर्यंत ५९ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी २३८३ धावा केल्यात. अय्यरने ५ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट वनडे स्कोर १२८ इतका आहे. अय्यरने भारतासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान ८ अर्धशतक लगावले.

Comments
Add Comment

French Open 2025 जिंकण्याचे जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले, उपांत्य फेरीत पराभव

पॅरिस : फ्रेंच ओपन २०२५ टेनिस स्पर्धा जिंकण्याचे सर्बियाच्या नोवाक जोकोविचचे स्वप्न अपूर्णच राहिले. टेनिसच्या

Shubhman Gill : १८ वर्षानंतर शुभमन गिल रचणार इंग्लंडमध्ये इतिहास?

नवी दिल्ली : टीम इंडियाचा नवनियुक्त कर्णधार शुभमन गिलला इंग्लंड दौऱ्यामध्ये मोठ्या अग्निपरीक्षेला सामोर जावे

Bangalore Stampede : चेंगराचेंगरी प्रकरणी विराट कोहलीवरही गुन्हा दाखल

बंगळुरू: बंगळुरूमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या विजयी परेड दरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणात स्टार

फिरकी गोलंदाज पियुष चावलाची निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज पियुष चावलाने क्रिकेटच्या सर्वच प्रकारातून निवृत्तीची घोषणा केली आहे.

गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यासाठी रवाना

मुंबई : रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर शुभमन गिलच्या नेतृत्वात भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना

ENG vs IND: जर गर्दीवर नियंत्रण ठेवता येत नसेल तर..., बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कोच गंभीरची प्रतिक्रिया

मुंबई: आयपीएल २०२५ संपल्यानंतर टीम इंडिया २० जूनपासून इंग्लंडमध्ये सुरू होत असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी