Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसाठी गुड न्यूज, टीम इंडियात मिळाली संधी

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता तो वनडे संघाचा भाग झाला आहे. यासोबतच बीसीसीआय त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टही देऊ शकते.


श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच बीसीसीआय लवकरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू शकते. अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. तो टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. अय्यरने या दौऱ्यात एकच वनडे सामना खेळला होता आणि ५२ धावा केल्या होत्या. दरम्यान तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.


श्रेयस अय्यरचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिल्यास त्याने आतापर्यंत ५९ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी २३८३ धावा केल्यात. अय्यरने ५ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट वनडे स्कोर १२८ इतका आहे. अय्यरने भारतासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान ८ अर्धशतक लगावले.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026 : इंग्लंड विरुद्धच्या उपांत्य सामन्यापूर्वी खेळाडूंनी घेतला बाप्पाचा आशीर्वाद

मुंबई : टी२० विश्वचषक २०२६ च्या उपांत्य सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघातील काही क्रिकेपटूंनी मुंबईतील

T20 World Cup : खेळाडूवर दुःखाचा डोंगर; रिंकू नंतर आणखी एका खेळाडूच्या वडिलांचे निधन

मुंबई : वर्ल्ड कपचा अंतिम सामना जसजसा जवळ येऊ लागला आहे, तसतशी प्रेक्षकांमध्ये सामन्याबद्दलची उत्सुकता वाढली

Smriti Mandhana : कौतुकास्पद! स्मृती मानधना पुन्हा ठरली आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत अव्वल

आयसीसी क्रमवारीमध्ये भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मानधना एकदिवसीय फलंदाजांमध्ये अव्वल स्थानावर

CSK New Jersey : चेन्नई सुपर किंग्जच्या नव्या जर्सीचे अनावरण

पाच वेळा विजेत्या चेन्नई सुपर किंग्जने म्हणजेच सीएसकेने आयपीएल २०२६ च्या आधी त्यांची नवीन जर्सीचे अनावरण केले

T20 World Cup 2026 Ind vs WI : वेस्ट इंडिज विरुद्धच्या विजयी खेळीनंतर संजू सॅमसन भावुक

टी-२० विश्वचषकामध्ये सुपर ८ च्या एका महत्त्वाच्या सामन्यात वेस्ट इंडिजला पाच विकेट्सनी पराभूत करत भारताने

IND vs WI: एका ओव्हरमध्येच सगळंच बदललं; भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात सर्वात मोठा टर्निंग पॉईंट कधी झाला?

मुंबई : भारताने दक्षिण आफ्रिका संघाचा पाच विकेटने पराभव करत सेमी फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे.