Shreyas Iyer: श्रेयस अय्यरसाठी गुड न्यूज, टीम इंडियात मिळाली संधी

मुंबई: टीम इंडिया(team india) या महिन्याच्या अखेरीस श्रीलंका दौऱ्यावर जात आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यात वनडे आणि टी-२० मालिका खेळवली जाणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सिलेक्शन कमिटीने या दौऱ्यासाठी श्रेयस अय्यरला संधी दिली आहे. बऱ्याच काळापासून तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. मात्र आता तो वनडे संघाचा भाग झाला आहे. यासोबतच बीसीसीआय त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टही देऊ शकते.


श्रेयस अय्यरला वनडे संघात स्थान मिळाले आहे. यासोबतच बीसीसीआय लवकरच त्याला वार्षिक कॉन्ट्रॅक्टमध्ये सामील करू शकते. अय्यरने टीम इंडियासाठी शेवटचा वनडे सामना डिसेंबर २०२३मध्ये खेळला होता. तो टीम इंडियासोबत दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आला होता. अय्यरने या दौऱ्यात एकच वनडे सामना खेळला होता आणि ५२ धावा केल्या होत्या. दरम्यान तो पुन्हा पुनरागमन करू शकतो.


श्रेयस अय्यरचे आतापर्यंतचे रेकॉर्ड पाहिल्यास त्याने आतापर्यंत ५९ वनडे सामने खेळले आहेत. या दरम्यान त्याने टीम इंडियासाठी २३८३ धावा केल्यात. अय्यरने ५ शतके आणि १८ अर्धशतके ठोकली आहेत. त्याचा सर्वोत्कृष्ट वनडे स्कोर १२८ इतका आहे. अय्यरने भारतासाठी ५१ टी-२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने ११०४ धावा केल्या आहेत. या दरम्यान ८ अर्धशतक लगावले.

Comments
Add Comment

आयसीसीच्या ताज्या क्रमवारीतही जसप्रीत बुमराहच अव्वल

दुबई (वृत्तसंस्था): आयसीसीने बुधवारी त्यांची ताजी क्रमवारी जाहीर केली. भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि कुलदीप

महिला क्रिकेट विश्वचषक : भारतीय संघाला विजयी हॅट्ट्रिकची संधी

विशाखापट्टणम: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक मोहिमेची सुरुवात विजयाने

IND vs AUS : फक्त १० धावा करताच रोहित शर्मा रचणार इतिहास

पर्थ/मेलबर्न: शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ १९ ऑक्टोबरपासून ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तीन एकदिवसीय (ODI)

Asia Cup 2025 : बक्षीस मिळालेली कार अभिषेक शर्मा भारतात चालवू शकत नाही, जाणून घ्या कारण !

मुंबई : आशिया कप २०२५ मध्ये भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा याने चमकदार कामगिरी करत "प्लेअर ऑफ द टूर्नामेंट"चा किताब

IND vs PAK: वेल डन टीम इंडिया, वर्ल्डकपमध्ये भारताने पाकिस्तानला केले नेस्तनाबूत

कोलंबो: आयसीसी महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये हा रविवार पुन्हा एकदा भारताच्या नावावर राहिला. आजच्या या सामन्यात

पाकिस्तानपुढे २४८ धावांचे आव्हान

कोलंबो : आयसीसी महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत पाकिस्तान साखळी सामना सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून