Maharashtra Rain : मुंबईत मुसळधार पाऊस! पुढील तीन दिवस महत्त्वाचे

'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी


मुंबई : काल मुंबईत दिवसभर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्रीपासून मुंबईसह अनेक उपनगरात (Mumbai Rain) जोरदार हजेरी लावली. अशातच हवामान विभागाने (IMD) अतिवृष्टीचा (Heavy Rain Alert) इशारा देऊन अलर्ट जारी केला आहे. आज सकाळी ५.३० वाजे पर्यंत दक्षिण मुंबईत ५१.८ मिमी तर पश्चिम उपनगरात २७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. पुढील तीन दिवस पावसाचा जोर असाच कायम राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास घराबाहेर पडा असे आवाहन केले आहे.


हवामान विभागानुसार, गुजरातच्या किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यंत हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे किनारपट्टीवर पावसाचा जोर राहणार आहे. त्यातच कोकण किनारपट्टी आणि विदर्भात पुढील तीन दिवस पावसाच्या सरी कोसळणार आहेत. तर रत्नागिरीत काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे हवामान विभागाकडून आज रत्नागिरीसाठी रेड अलर्ट तर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.



विदर्भात पावसाचा जोर वाढणार


बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने पूर्व विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. यामुळे विदर्भ आणि विदर्भाला जोडून असलेल्या मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून उद्यापासून पूर्व विदर्भात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Comments
Add Comment

Drugs Case : मीरा रोडमध्ये २३.३ लाख रुपयांचे ड्रग्स जप्त, तिघांना अटक

मीरा रोड : मुंबईलगतच्या मीरा-भाईंदर शहरात पोलिसांनी गेल्या दोन दिवसांत वेगवेगळ्या कारवाईत एकूण तेवीस लाख तीस

Ashok Kharat Case : धर्माच्या आड काळे कारनामे! ‘भोंदू’ अशोक खरात प्रकरणात नवे धक्कादायक खुलासे

मुंबई : धर्माच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण आणि कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेला अशोक खरात (Ashok

Toll Exemption : सिंधुदुर्गवासियांना ‘टोल माफ’, पालकमंत्री नितेश राणेंनी दिला दिलासा

सावंतवाडी : ओसरगाव टोल नाक्यावर मी आमदार असताना सिंधुदुर्ग जिल्हावासियांना टोल लागू दिला नव्हता. आता महामार्ग

Nashik Simhastha Kumbh Mela : 'कुंभमेळा कामांना अधिक गती देणार'

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे कामे समाधानकारकरितीने होत असून आगामी

River Linking : 'नदीजोड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य दुष्काळमुक्त करणार'

नाशिक : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या

E-KYC Mandatory for Teachers : शिक्षकांसाठी ई-केवायसी अनिवार्य; मे महिन्याच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता

मुंबई : राज्य शासनाच्या वित्त विभागाने दिलेल्या आदेशानुसार शालार्थ प्रणालीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व