Shivaji Maharaj Waghnakhe : शिवप्रेमींसाठी आनंदवार्ता! लंडनमधील वाघनखांचे उद्या महाराष्ट्रात आगमन होणार

  119

मुंबई : महाराष्ट्रातील शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी लंडन (London) येथील असलेली बहुप्रतिक्षित वाघनखांबाबत (Waghnakhe) चर्चेचे उधाण पसरले होते. विरोधकांकडून ही वाघनखे शिवरायांची नसल्याचा आरोप केला जात होता. त्यावर सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी ही वाघनखे शिवरायांचीच असल्याचा दावा केला होता. त्यानंतर ही वाघनखे लवकरच महाराष्ट्रात येतील अशी घोषणाही त्यांनी केली होती. दरम्यान आता लवकरच लंडनमधील वाघनखांचे महाराष्ट्रात (Maharashtra) आगमन होणार आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज यांची लंडनमधील व्हिक्टोरीया अँड अल्बर्ड म्युझियमध्ये खासगी सुरक्षेत ठेवलेली वाघनखे उद्या महाराष्ट्रात आणली जाणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ती सातारा येथे नेली जाणार आहेत. विशेष विमानातून वाघनखे साताऱ्यात दाखल होणार असून राज्य सरकारच्या वतीने १९ जुलै रोजी या वाघनखांबाबत साताऱ्यात भव्यदिव्य सोहळ्याचे आयोजन देखील करण्यात आले आहे.



वाघनखे ठेवण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च


महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या वाघनखांसोबत छत्रपती शिवरायांच्या इतर शस्त्रांचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. त्यामुळे साताऱ्यामधील म्युझियमच्या डागडुजीसाठी आणि नुतनीकरणासाठी १४ लाख ८ हजार रुपयांचा खर्च झाला करण्यात आला आहे.

Comments
Add Comment

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! कल्याण-भिंवडी मेट्रो ५ चा विस्तार लवकरच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा...

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून लोकल ट्रेनची गर्दी कमी करण्यासाठी राज्य सरकारने नवीन पाऊले उचलली आहेत.

शेतीच्या वादावरून पुतण्याने केला काकी आणि चुलत भावाचा खून : वर्ध्यातील धक्कादायक प्रकार

वर्धा : शेती वाटपावरून २ जणांची कुऱ्हाडीने वार करत हत्या करुन , नंतर आरोपीने देखील विष पिऊन आत्महत्या केल्याचा

महिलांना नेतृत्वाची संधी ! जिल्ह्यातील ७७५ सरपंच पदाचं आरक्षण जाहीर, महिलांची आकडेवारी किती ?

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागात ७५५ ग्रामपंचायतींचे आरक्षण नुकतेच जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे २०११ च्या

Pune Metro : पुणेकरांची गर्दीतून सुटका! लवकरच मेट्रोच्या ताफ्यात १५ नव्या ट्रेन, ४५ डबे वाढणार अन्...

पुणे : पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. मेट्रोच्या ताफ्यात आगामी काळात १५ नव्या ट्रेन म्हणजेच एकूण १५ डबे

मुंबई-गोवा महामार्ग: १८ वर्षांची प्रतीक्षा, खड्डेमय प्रवास अन् अपघातांचा धोका कायम!

मुंबई : मुंबई-गोवा महामार्गाचे काम गेली १८ वर्षांपासून रखडलेले असतानाच, या पावसाळ्यातही प्रवाशांचे हाल कायम

राज्यात ५१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

नाशिक : राज्यातील ५१ पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये नाशिक