Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला 'अशी' करा विठुरायाची घरच्या घरी पूजा!

  419

जाणून घ्या महत्त्व, मुहूर्त, साहित्य, विधी


मुंबई : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2024) अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षी पंढरपूर (Pandharpur) नगरी विठू (Vitthal) माऊलीच्या गजराने दुमदुमून निघते. यंदा आषाढी एकादशी १७ जुलै रोजी साजरी केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणाहून विविध दिंडी विठुनामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेने निघाल्या आहेत. त्यासोबत लाखो भाविकांनीही पंढरपूरला हजेरी लावली आहे. मात्र अनेकांना आषाढी एकादशीला पंढरीला जाणे शक्य नसल्याने भाविक जवळच्या विठ्ठल मंदिरात जाऊन किंवा घरच्या घरी पूजा करतात. यासाठी जाणून घ्या पूजेचे महत्त्व साहित्य, विधी आणि इतर माहिती.



काय आहे आषाढी एकादशीचे महत्त्व?


हिंदू धर्मात आषाढी एकादशीला विशेष महत्त्व असते. आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी या नावाने देखील ओळखले जाते. या दिवसानंतर श्रीविष्णू निद्रावस्थेत जातात आणि चातुर्मास सुरु होतो. भागवत सांप्रदायांसाठी हा दिवस विशेष मानला जातो.


भविष्योत्तर पुराणात, कृष्णाने युधिष्ठिराला शयनी एकादशीचे महत्त्व सांगितले आहे, कारण निर्माता-देव ब्रह्मदेवाने त्याचा पुत्र नारदांना एकदा त्याचे महत्त्व सांगितले होते. राजा मंडताची कथा याच संदर्भात सांगितली आहे. धर्मनिष्ठ राजाच्या देशात तीन वर्षे दुष्काळ पडला होता, परंतु राजाला पर्जन्य देवतांना प्रसन्न करण्याचा उपाय सापडला नाही. अखेरीस, अंगिरस ऋषींनी राजाला देव-शयनी एकादशीचे व्रत पाळण्याचा सल्ला दिला. असे केल्यामुळे विष्णूच्या कृपेने राज्यात पाऊस पडला. त्यामुळे आषाढी एकादशीला अनेक भाविक विठुरायासाठी उपवास करुन पूजा-अर्चना करतात.



मुहूर्त आणि शुभ योग


हिंदू पंचांगानुसार आषाढी शुक्ल पक्षातील एकादशी तिथी १६ जुलैला रात्री ८.३३ वाजेपासून १७ जुलै रात्री ९.३३ वाजेपर्यंत असणार आहे. तसेच देवशयनी एकादशीला अनुराधा नक्षत्रासह सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग, शुभ योग आणि शुक्ल योग असणार आहे. सकाळी ७.०४ पर्यंत शुभ योग आणि त्यानंतर शुक्ल योग असणार आहे.



पूजा साहित्य


आषाढी एकादशीला विठुरायाच्या पुजेसाठी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती, पाणी, पंचामृत, चंदन आणि हळद मिश्रित पाणी, हळद कुंकू, अष्टगंध, बुक्का, तुळशी पत्र, नवीन वस्त्र, ५ फळे, विडाचे पान, सुपारी, तांदूळ, गुलाबाचे फुल, केळी, अगरबती आणि कापूर हे साहित्य लागणार आहेत.



अशी करा विठ्ठलाची पूजा



  • आषाढी एकादशीला संपूर्ण दिवस उपवास असतो. सकाळी उठल्यावर स्नान करुन घरातील देवाची पूजा करा. त्यानंतर विठ्ठलाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घाला. आता स्वच्छ कपड्याने मूर्ती पुसून तिला अष्टगंध आणि बुक्का लावा.

  • विठुरायाला नवीन वस्त्र परिधान करा आणि हार घाला. उपवासाच्या पदार्थाचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवा. विठुरायाची आरती करा. आषाढी एकादशीला तुळस तोडू नयेत. पण आदल्या दिवशी तुळस तोडून ठेवा आणि ती विठुरायाला अर्पण करावी.

Comments
Add Comment

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या

मोठी बातमी! सोलापूर पोलिस प्रशिक्षण केंद्रात तब्बल १७० पोलिसांना अन्नातून विषबाधा

सोलापूर: सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा झाल्याने मोठी खळबळ उडाली.