मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा २०२३ या परीक्षेचा निकाल (MPSC Result) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. हा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. (MPSC) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या (https://mpsc.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या (https://mpsc.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असे आयोगाकडून सांगण्यात आले आहे.
राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येईल. त्या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण आयोगाकडून कळवण्यात येणार आहे.
निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे, असे आयोगाकडून सांगण्यात आले. लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे.
मुख्य परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रक प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे.
गीतांजली वाणी ज्ञानदायी स्रोत असते पुस्तक आवड जयास उजळ मस्तक नवी जीवनाची प्रगती आणि विकास…
फॅमिली काऊन्सलिंग : मीनाक्षी जगदाळे आजकाल आपण दररोज बघतोय की, अगदी लहान अथवा तरुण मुलं…
महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे-गोरे यांच्या हत्येप्रकरणी खाकी वर्दीतला एकेकाळचा सहकारी पोलीस अधिकारी अभय कुरुंदकरला…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…
मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…
मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…