NCP case Supreme court : राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!

अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला एका आठवड्याची मुदत


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह बहाल केलं. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, शरद पवार गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.


सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तो दाखल करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

"शेतकऱ्यांचे ऋण फेडण्याची वेळ"! अभिनेता सोनू सूदने पंजाबमधील पूरग्रस्तांना दिला आधार

पंजाब : कोविड काळात केलेल्या कार्यामुळे अभिनेता सोनू सूद अनेकदा चर्चेत आला होता . आता पुन्हा एकदा गरजूंना मदतीचा

देशात पहिलाच उपक्रम; दिल्लीत ‘हाय-टेक हॉटलाईन व्हॅन’चे अनावरण

नवी दिल्ली: दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आज राष्ट्रीय राजधानीची पहिली 'हॉटलाईन मेंटेनन्स व्हॅन'

पंतप्रधान मोदींच्या आईचा AI व्हिडिओ कोणी बनवला? दिल्ली पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) आणि त्यांच्या दिवंगत आई हिराबेन यांचा डीपफेक व्हिडिओ वादाला मोठे राजकीय

केंद्र सरकार मणिपूरच्या लोकांसोबत खंबीरपणे उभे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मणिपूरमधील लोकांना आश्वासन, केले शांततेचे आवाहन चुराचंदपूर: पंतप्रधान नरेंद्र

Surya VHF : अमेरिकेच्या F 35 आणि चीनच्या J 20 विमानाचा वेध घेण्यास सक्षम असलेले भारताचे रडार

नवी दिल्ली : भारताने पहिल्या स्वदेशी सूर्या व्हीएचएफ (व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी) रडारच्या क्षमतेत वाढ केली आहे. हे

मोदींचा मणिपूरमध्ये दीड तास रस्त्यावरुन प्रवास, मुसळधार पावसातून पीएमचा ताफा सभास्थळी

मणिपूर : कुकी आणि मैतेई समाजाच्या वांशिक हिंसेमुळे मणिपूरमध्ये काही काळ कायदा सुव्यवस्था बिघडली असल्याचे