NCP case Supreme court : राष्ट्रवादीच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश!

अजित पवार गटाला दोन तर शरद पवार गटाला एका आठवड्याची मुदत


नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (Nationalist Congress Party) फूट पडून एका वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, अद्याप खरी राष्ट्रवादी कोणाची यावर सर्वोच्च निकाल आलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) बहुमताच्या जोरावर अजित पवार गटाला (NCP Ajit Pawar Group) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं मूळ नाव आणि 'घड्याळ' हे चिन्ह बहाल केलं. तर शरद पवार गटाला (Sharad Pawar Group) 'तुतारी वाजवणारा माणूस' हे चिन्ह देण्यात आलं. मात्र, शरद पवार गटाने याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी न्यायालयाने अजित पवार गटाला काही महत्त्वाचे निर्देश दिले आहेत.


सुप्रीम कोर्टाकडून अजित पवार गटाला दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच अजित पवारांच्या उत्तरावर जर शरद पवार यांना प्रतिवाद सादर करायचा असेल तर एका आठवड्यात शरद पवारांनी तो दाखल करावा, असेही कोर्टाने म्हटले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑगस्टला होणार आहे. त्यामुळे पुढील सुनावण्यांमध्ये सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Comments
Add Comment

जीएसटी कपातीमुळे भारतात नवरात्रीमध्ये १० वर्षांत सर्वाधिक विक्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): मोदी सरकारच्या नेक्स्ट जेन जी. एस. टी. सुधारणांमुळे केवळ करांचे दर कमी झाले नाहीत तर

तरुणांसाठी ६२,००० कोटी रुपयांची मोठी योजना; मोदी आज करणार सुरू

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील तरुणांना कौशल्ये, शिक्षण आणि रोजगार (Skilling, education, and employment) देण्यासाठी अनेक

सावधान! भारतात ५० लाखांहून अधिक लोकांना चिकनगुनियाचा मोठा धोका

नवी दिल्ली: डासांमुळे होणाऱ्या चिकनगुनिया नावाच्या एका व्हायरल आजाराने भारतात सुमारे ५१ लाख (५.१ दशलक्ष) लोकांना

१,२०० कोटींच्या गोवा जमीन घोटाळ्यात शिवशंकर मायेकरला ED कडून अटक

नवी दिल्ली: सक्तवसुली संचालनालयाने (ED) आज सांगितले की, यशवंत सावंत आणि इतरांशी संबंधित असलेल्या जमीन

दहशतवाद्यांचा 'धर्म' नाही, आम्ही दहशतवादाला मारलं: राजनाथ सिंह यांचा सर्जिकल स्ट्राईकवर जोर

नवी दिल्ली: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज २०१६ चा सर्जिकल स्ट्राईक, २०१९ चा बालाकोट हवाई हल्ला आणि ऑपरेशन

अरबी समुद्रात धडकणार शक्ती चक्रीवादळ, सतर्कतेचा इशारा

मुंबई : अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्राने आता वादळाचे रूप धारण केले आहे. येत्या २४ तासात हे