Dengue : नाशकात डेंग्यूचे थैमान! आठवड्याभरात १०० हून अधिक जणांना प्रादुर्भाव

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. अशातच नाशिक शहरात (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue) साथीने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १०४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये सिडको विभागात ३७ रुग्ण तर नाशिकरोड विभागात २२ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ४६९ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.



डेंग्यूची लक्षणे


डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी मंत्री शेतक - यांच्या बांधावर

राज्यात अवकाळी पावसामुळे १ लाख २२ हजारहून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान पुणे : राज्यात वादळी वारा व गारांच्या

उद्योगांना एलपीजीचा सुरळीत पुरवठा व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील - राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल

मुंबई : महाराष्ट्रात कार्यरत असलेली प्रत्येक विदेशी कंपनी ही राज्याचीच आहे, या भूमिकेतून राज्य शासन सर्वतोपरी

मंत्रालय प्रवेशासाठी लागणारी १० हजार ओळखपत्रे गायब

मुंबई : मंत्रालयातील प्रवेश प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘डिजी प्रवेश’ प्रणालीतील १०

Ladaki Bahin Yojna E Kyc : ई-केवायसी न केल्याने लाडकी बहीण योजनेतील ६८ लाख खाती बंद

मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहिण योजना’ संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अनिवार्य

ऑपरेशन टायगर? : शिवसेनेच्या मेजवानीला ‘उबाठा’च्या खासदारांची हजेरी

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांनी जोर धरलेला असतानाच, बुधवारी रात्री राजधानी

SSC Exam 2026 Major Reform : कागदपत्रांचा गोंधळ संपणार! आता 'मार्कशीट' आणि 'पासिंग सर्टिफिकेट' मिळणार...बोर्डाचा नवीन निर्णय काय ?

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक