Dengue : नाशकात डेंग्यूचे थैमान! आठवड्याभरात १०० हून अधिक जणांना प्रादुर्भाव

  67

नाशिक : राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये (Maharashtra Rain) पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, हिवताप असे अनेक आजार डोकावत असतात. अशातच नाशिक शहरात (Nashik News) डेंग्यूच्या (Dengue) साथीने थैमान घातल्याचे चित्र दिसून येत आहे. नाशिकमध्ये डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रकरणावर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभाग (Health Department) सतर्क झाले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मागील आठवड्यात नाशिकमध्ये डेंग्यूचे ९६ रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता पुन्हा तब्बल १०४ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. यामध्ये सिडको विभागात ३७ रुग्ण तर नाशिकरोड विभागात २२ रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर नाशिक पूर्व आणि पंचवटी विभागात प्रत्येकी १६ रुग्ण, नाशिक पश्चिममध्ये ११ तर सातपूर विभागात १० रुग्ण आढळून आले आहेत. यासोबत डेंग्यूच्या एकूण रुग्णसंख्येचा आकडा ४६९ वर पोहोचला आहे. सध्या रुग्णांवर सरकारी तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


दरम्यान, डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यासाठी आरोग्य विभागाकडून शहरातील विविध भागात सातत्याने तपासणी करण्यात येत आहे. मात्र तरीही डेंग्यूवर नियंत्रण मिळवण्यास आरोग्य विभाग अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.



डेंग्यूची लक्षणे


डेंग्यू ताप आल्यानंतर सुरुवातीला रुग्णाला अचानक थंडी वाजून येते. याशिवाय डोकेदुखी, अंगदुखी, हाडं आणि सांध्यांमध्ये वेदना जाणवू लागतात. अशक्तपणा, मळमळ, अंगावर सूज आणि पुरळ येणे, नाकातून किंवा हिरड्यांमधून रक्तस्राव, अशी लक्षणे दिसतात. ही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : हिंदी ही राष्ट्रभाषा आहे आणि तिला विरोध करणं योग्य नाही, रामदास आठवलेंची प्रतिक्रिया...

मुंबई : राज्यात शाळांमध्ये त्रिभाषा सूत्र राबण्याचा सरकारने घेतलेला निर्णय वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. याच

Madhuri Misal : नागरिकांना मिळणार दिलासा ! मिळकतकरासंदर्भातील प्रस्ताव महापालिकेने राज्यसरकारकडे पाठवावा...

पुणे :  मिळकत करावर दंड आणि व्याज लावला जात असल्याने राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी नागरिकांसाठी मोठा निर्णय

Navi Mumbai Airport : नवी मुंबई विमानतळावर प्रवाशांना भरवा लागणार युजर शुल्क

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळ कधी सुरु होणार या प्रतिक्षेत गेल्या अनेक महिन्यांपासून नवी मुंबईकर आहेत. परंतू

Nitin Gadkari : दुचाकी चालकांकडून कोणत्याही टोल घेतला जाणार नाही, नितीन गडकरी यांची सोशल मीडियावरती पोस्ट...

मुंबई : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १५ जलै २०२५ पासून दुचाकी वाहन चालकांकडून टोल वसूल करण्यात येईल. अशा

Devendra Fadanvis 'आम्ही सर्व जनतेचे सेवक', लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्र्यांची स्पष्ट भूमिका...

मुंबई : भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विधानावरुन अडचणीत वाढ

पंचवटीसह द्वारका परिसरात सलग पाचव्या दिवशी पाणीटंचाई

नागरिक त्रस्त : निलगिरी बाग केंद्रावर तांत्रिक बिघाड जैसे थे नाशिक : निलगिरी बाग जलशुद्धीकरण केंद्राला