मुंबईच्या महिलेला शेअर मार्केटचा मोह पडला भारी, गमावले तब्बल इतके लाख रूपये

मुंबई: सायबर गुन्ह्याच्या दर दिवसाला काही ना काही केसेस समोर येत असतात. अशीच एक केस समोर आली आहे. येथे महिलेची फसवणूक करण्यात आली आहे.


महिलेला सायबर गुन्हेगारांनी काही दिवसांत पैसे डबल करणार असल्याची स्वप्ने दाखवली होती. यानंतर महिलेला ऑनलाईन ट्रेडिंगबद्दल सांगितले. ज्यातून तिला मोठी कमाई करण्याचे लालूच दाखवले.


४२ वर्षीय ही महिला या जाळ्यात अडकली आणि तिने आपले तब्बल १३ लाख रूपये गमावले. पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत महिलेने म्हटले की, ती इन्स्टाग्राम पाहत होती. यावेळेस तिला एक ऑनलाईन ट्रेडिंग स्कॅमची जाहिरात दिसली.


येथे तिला हाय रिटर्नची लालूच दाखवण्यात आली होती. येथे काही दिवसांतच तुम्हाला पैसे डबल करून मिळतील असे सांगण्यात आले होते. या जाळ्यात ही महिला अडकली आणि तिने त्यावर क्लिक केले.


मिडिया रिपोर्ट्सनुसार महिलेने जेव्हा जाहिरातीवर क्लिक केले तेव्हा तिला एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. तेथे स्टॉक मार्केटसंबंधित टिप्स दिल्या.यानंतर महिलेची फसवणूक सुरू होती. तब्बल २ महिने असे सुरू होती. यादरम्यान १२ ट्रान्झॅक्शनद्वारे १३.८३ लाख रूपये ट्रान्सफर करण्यात आले.


दरम्यान, जेव्हा महिलेने आपले काही पैसे काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला ते पैसे काढता येईना यावेळेस तिला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. महिलेने जेव्हा या प्रकरणातील डिटेल्स मागितल्या तेव्हा ३० टक्केच्या हिशेबाने तिच्याकडे ३.९० लाख रूपयांची मागणी करण्यात आली. जेव्हा तिने हे पैसे देण्यास नकार दिला तेव्हा तिला ग्रुपमधून काढून टाकण्यात आले.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता