Accident news : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहने एकमेकांवर आदळली!

वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी


नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली असून अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कसारामधून (Kasara) आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) कसारा घाटात ५ वाहने एकमेकांवर विचित्र पद्धतीने आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला असून ११ ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. नवीन कसारा घाटत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. तसेच घाटात धुकं असल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली गेली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.


सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

दिल्लीत झळकलेला महाराष्ट्राचा मानाचा चित्ररथ आता गिरगावात!

- कर्तव्यपथावर झळकलेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा मुंबईकरांना प्रत्यक्ष अनुभव मुंबई : नवी दिल्ली

गुढीपाडव्याच्या दिवशी बीकेसी पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मुंबई: मुंबईत एक धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत बीकेसीच्या पासपोर्ट कार्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

मिठी नदीच्या सफाईसाठी कुणी कंपनी पुढे येईना; स्थायी समितीत सविस्तर निवेदन करण्याचे अध्यक्षांचे प्रशासनाचे निर्देश

मुंबई: मुंबईतील मिठी नदीतील गाळ काढण्यासाठी नव्याने कंत्राटदार नियुक्त करण्यासाठी मागवलेल्या निविदेला