Accident news : मुंबई नाशिक महामार्गावर ५ वाहने एकमेकांवर आदळली!

वाहनांचा चक्काचूर तर ११ ते १२ जण जखमी


नाशिक : गेल्या काही दिवसांत अपघाताच्या घटनांमध्ये (Accident News) प्रचंड वाढ झाली असून अनेक धक्कादायक घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आता कसारामधून (Kasara) आणखी एक दुर्घटना समोर आली आहे. मुंबई नाशिक महामार्गावर (Mumbai Nashik Highway) कसारा घाटात ५ वाहने एकमेकांवर विचित्र पद्धतीने आदळल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये वाहनांचा चक्काचूर झाला असून ११ ते १२ जण जखमी झाले आहेत. जखमींना सध्या उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई नाशिक महामार्गावर कसारा घाटात धबधबा पॉईंटनजीक सहा ते सात वाहनं थांबली होती. यावेळी मुंबईच्या दिशेने लोखंडी सळ्या घेऊन जाणाऱ्या कंटेनरने धडक दिल्याने वाहने एकमेकांवर आदळली. नवीन कसारा घाटत कंटेनरचा ब्रेक फेल झाल्याने चालकाचं नियंत्रण सुटलं. तसेच घाटात धुकं असल्यामुळे वाहनाचा अंदाज आला नाही आणि तब्बल सहा ते सात वाहनांना धडक दिली गेली. यात जवळपास तीन ते चार जण गंभीर जखमी झाले आहेत तर सात ते आठ जण किरकोळ जखमी झाले आहेत.


सुदैवाने उभ्या असलेल्या वाहनांमधील काही प्रवासी हे त्यांच्या पार्क केलेल्या वाहनांमध्ये नसल्याने मोठा अनर्थ टळला. यामध्ये आतापर्यंत कोणाच्याही जीवितहानीची नोंद नाही, परंतु कसारा घाट परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांनी वाहने रस्त्यात वाहने उभी केलेली होती. या ठिकाणी कोणतेही पोलीस सुरक्षा रक्षक तैनात नव्हते. जखमी झालेल्या नागरिकांना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव, सांताक्रूझ दरम्यान रात्रकालीन ब्लॉक

मध्य रेल्वेवर उद्या मेगाब्लॉक नाही मुंबई : पश्चिम रेल्वेवर ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या

'इंडिगो'ची सर्व उड्डाणे रद्द; प्रवाशांचे हाल, इतर विमानांचे दर दुप्पट

नवी दिल्ली : इंडिगो कंपनीने अचाकन आपल्या फ्लाईट रद्द केल्याने देशातील विविध महत्त्वाच्या विमानतळाची अवस्था बस

वरळीत शिउबाठाची दादागिरी; भाजपच्या कामगार संघटनेचा फलक लावण्यास विरोध

मुंबई : विधानसभा निवडणुकीत वरळीची जागा कशीबशी जिंकलेल्या शिउबाठाला अद्याप राजकीय स्थितीचे भान आलेले दिसत नाही.

पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून आरे कॉलनी व दिंडोशी वन क्षेत्रातील रहिवाश्यांना घरे द्या'

मुंबई : आरेमध्ये तसेच दिंडोशी येथील वन क्षेत्रात गेली अनेक वर्ष वास्तव्य रहिवाशी हि देखील माणसे असून ते मुलभूत

फडणवीस सरकारची ‘विकसित महाराष्ट्र २०४७’च्या दिशेने वाटचाल

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे; महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त विशेष संवाद मुंबई : “पंतप्रधान नरेंद्र

डॉ. अविनाश ढाकणे यांनी स्वीकारला महापालिका अतिरिक्त आयुक्त पदाचा कार्यभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) - मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) म्हणून डॉ. अविनाश ढाकणे यांनी